शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

अल्प पावसामुळे रब्बी हंगामावर परिणाम कककक आणेवारीकडे नजरा : सोयाबीनचा उतारा निम्म्यावऱ़़

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकूण २८ हजार ५०० हेक्टर्स लावगडीयोग्य जमीन असून, त्यापैकी १७ हजार ६५६ हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या राशीवर अनेक संसारिक गणिते घातली होती़ परंतु, सुरुवातीला पावसाने आणि आता रोगाने सोयाबीन पुर्णता: करपले आहे़ त्यात पावसाने पुन्हा दडी मारली आहे़ दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आल्याने अनेकजण राशीसुद्धा करीत आहेत़ राशी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरी घोर निराशाच पडत आहे़ कारण काळ्या कसदार जमिनीतील सोयाबीनसुद्धा एकरी चार पोतेच निघत आहे़ माळरान जमिनीतील सोयाबीच्या राशी करण्याचासुद्धा खर्च निघत नाही़ लागवड खर्च तर दुरच राहिला़
पावसाने मोठा ताण दिल्याने ऐन बहरात सोयाबीनची वाढ खुंटली़ त्यातच रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला़ परिणामी सोयाबीन, ज्वारीच्या आकाराचे बनल्याने उतारा निम्याने घटला आहे़ त्याचबरोबर सोयाबीन आहे की ज्वारी आहे हेच प्रथमदर्शनी समजत नाही़
सोयाबीन काढण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धावपळ सुरु झाली आहे़ परंतु, सध्या निवडणुका सुरु असल्याने मजूर कार्यकर्ते झाले आहेत़ त्यामुळे शेतकरी चोहीकडून त्रस्त झाले आहेत़