शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

अल्प पावसामुळे रब्बी हंगामावर परिणाम कककक आणेवारीकडे नजरा : सोयाबीनचा उतारा निम्म्यावऱ़़

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामातील नगदी पीक असलेल्या सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर आर्थिक गणिते आहेत़ परंतु, रोगांच्या प्रादुर्भावाने आणि पावसाने दगा दिल्याने सोयाबीन होरपळत असून उतारा निम्याने घटला आहे़ परिणामी, खरीप हंगामात झालेला खर्च कसा काढायचा आणि रबी हंगामाची पेरणी कशी करायची असा प्रश्न तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर उभा आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता आणेवारीकडे लागल्या आहेत़ आणेवारी योग्य पद्धतीने घ्यावी़ त्यामुळे शेतकर्‍यांना विम्याचा तरी लाभ मिळेल, अशा अपेक्षा व्यक्त होत आहे़
शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकूण २८ हजार ५०० हेक्टर्स लावगडीयोग्य जमीन असून, त्यापैकी १७ हजार ६५६ हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकर्‍यांनी सोयाबीनच्या राशीवर अनेक संसारिक गणिते घातली होती़ परंतु, सुरुवातीला पावसाने आणि आता रोगाने सोयाबीन पुर्णता: करपले आहे़ त्यात पावसाने पुन्हा दडी मारली आहे़ दसरा, दिवाळीचा सण तोंडावर आल्याने अनेकजण राशीसुद्धा करीत आहेत़ राशी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरी घोर निराशाच पडत आहे़ कारण काळ्या कसदार जमिनीतील सोयाबीनसुद्धा एकरी चार पोतेच निघत आहे़ माळरान जमिनीतील सोयाबीच्या राशी करण्याचासुद्धा खर्च निघत नाही़ लागवड खर्च तर दुरच राहिला़
पावसाने मोठा ताण दिल्याने ऐन बहरात सोयाबीनची वाढ खुंटली़ त्यातच रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला़ परिणामी सोयाबीन, ज्वारीच्या आकाराचे बनल्याने उतारा निम्याने घटला आहे़ त्याचबरोबर सोयाबीन आहे की ज्वारी आहे हेच प्रथमदर्शनी समजत नाही़
सोयाबीन काढण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धावपळ सुरु झाली आहे़ परंतु, सध्या निवडणुका सुरु असल्याने मजूर कार्यकर्ते झाले आहेत़ त्यामुळे शेतकरी चोहीकडून त्रस्त झाले आहेत़