शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लोकेश राहुलचे अर्धशतक, दिवसअखेर भारत 1 बाद 120

By admin | Updated: March 17, 2017 17:30 IST

तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 451 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानेही चांगली सुरुवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 17 - भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 451 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारतानेही चांगली सुरुवात केली आहे. दुस-या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 120 धावा झाल्या आहेत. भारत अजूनही 331 धावांनी पिछाडीवर आहे. लोकेश राहुल (67) आणि मुरली विजय नाबाद (42) या दोन्ही सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. 
 
दोघांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा लोकेश राहुल (67) धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने वाडेकडे झेल दिला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पूजाराने पडझड होऊ दिली नाही. तो (10) धावांवर नाबाद आहे.
 
तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 451 धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी वर्चस्व ठेवलेला ऑस्ट्रेलिया संघ दुस-या दिवशी मात्र सातत्य ठेवू शकला नाही. दुस-या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलिया 4 विकेट्स 299 धावांवर खेळत होती. मात्र दुस-या दिवशी फक्त 152 धावा करत 451 धावांचा टप्पा संघाने पार केला. जाडेजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत दुस-या दिवशी चार विकेट घेतले. कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या करिअरमधील एक सर्वोत्तम खेळी केली. स्टीव्ह स्मिथ 178 धावांवर नाबाद राहिला.
 
भारताकडून जाडेजा सर्वात प्रभावी गोलदांज ठरला असून त्याने पाच विकेट्स घेतल्या तर उमेश यादवने तीन विकेट्स घेतल्या. अश्विनच्या खात्यात फक्त एकच विकेट जमा झाली. कर्णधार स्टीव्हन स्मिथचे शतक व त्याने ग्लेन मॅक्सवेलसोबत केलेल्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध गुरुवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर ४ बाद २९९ धावांची मजल मारली होती.
 
दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएसमुळे वाद निर्माण झाला होता; पण स्मिथने सर्व विसरून आज १९ वे कसोटी शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी शतकवीर स्मिथला अडीच वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा ग्लेन मॅक्सवेल अर्धशतक झळकावित साथ देत होता. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ४७.४ षटकांत १५९ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच अर्धशतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांसाठी पहिला दिवस खडतर ठरला. त्यात आणखी एका वाईट वृत्ताची भर पडली. कर्णधार विराट कोहली क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो एका सत्रापेक्षा अधिक वेळ मैदानाबाहेर होता. कोहलीच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले.
 
पहिला दिवस ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने गाजवला. त्याने भारताविरुद्ध गेल्या सात सामन्यांतील आपले सहावे कसोटी शतक झळकावले. सुरुवातीला खेळपट्टी संथ होती. भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीकडून विशेष साथ लाभली नाही. आश्विन (२३ षटकांत ७८ धावांच्या मोबदल्यात १ बळी) आणि जडेजा (३० षटकांत ८० धावांच्या मोबदल्यात १ बळी) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उमेशचा मारा सावधपणे खेळून काढल्यानंतर स्मिथने भारताच्या अन्य गोलंदाजांना सहजपणे तोंड दिले. मुरली विजयच्या गोलंदाजीवर लाँग आॅन बाऊंड्रीवर चौकार वसूल करीत स्मिथने या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. दरम्यान, स्मिथ कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा पल्ला सर्वांत जलद गाठणारा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमनने ३६ व्या, तर सुनील गावस्कर यांनी ५२ व्या कसोटी सामन्यांत पाच हजार धावांचा पल्ला गाठण्याची कामगिरी केली होती.