शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाला धक्का, लोकेश राहुल बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:29 IST

भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. 24 - भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल पहिल्या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही. तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टवेळी दुखापत झाल्यामुळे राहुल आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्ट इंडिज दौऱ्यातही खेळू शकला नव्हता. आता ताप आल्यामुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआई) सोमवारी याबाबत माहिती दिली. 
 
26 जुलै रोजी टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळाचा आहे.  राहुल आणि मुरली विजयच्या अनुपस्थितीत अभिनव मुकुंद आणि शिखर धवन भारताच्या डावाची सुरूवात करतील.  टेस्ट सीरिजसाठी मुरली विजयचीही निवड करण्यात आली होती. पण मनगटाची दुखापत बरी झाली नाही म्हणून शेवटच्या क्षणी त्यानं या दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळे मुरली विजयऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. 
 
श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने शानदार 54 धावा फटकावल्या होत्या. पण आता ताप आल्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. 
भारत - श्रीलंका बोर्ड सराव सामना अनिर्णीत-
कर्णधार विराट कोहलीसह आघाडीच्या भारतीय फलंदाजांनी श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत संपलेल्या दोन दिवसांच्या सराव सामन्यात जोरदार फटकेबाजी करीत ९ बाद ३१२ धावा उभारल्या.
 
शुक्रवारच्या ३ बाद १३५ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघासाठी कोहलीने अर्धशतक फटकाविले. मधल्या फळीतील अजिंक्य रहाणे (४०), रोहित शर्मा (३८) आणि शिखर धवन (४१) यांनीही योगदान दिले. कोहली-रहाणे यांनी शनिवारी आठ षटके खेळल्यानंतर सहकाऱ्यांना संधी दिली. कोहलीने ७८ चेंडूंत आठ चौकार, तर रहाणेने ५८ चेंडंूत तीन चौकार मारले. रोहित आणि शिखर यांनी ८० धावांची भागीदारी केली. हे दोघे १६ षटके खेळून निवृत्त झाले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ब्रेक घेणाऱ्या रोहितने ४९ चेंडू खेळून एक षट्कार व चौकार मारला. शिखरने ४८ चेंडूंत सात चौकार मारले. यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने नाबाद ३६, अष्टपैलू हार्दिक पांड्या याने १३ आणि रवींद्र जडेजाने ३२ चेंडूंत १८ धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुशालने १४ षटकांत ८१ धावा देत दोन गडी बाद केले. विश्वा फर्नांडो याने दोन आणि विकुम संजया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी शुक्रवारी भारतीय गोलंदाजांनी लंका बोर्ड एकादश संघाला १८७ धावांत रोखले होते. यादवने ४, तर जडेजाने ३ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक-
श्रीलंका अध्यक्ष एकादश सर्वबाद १८७ धावा. भारत ९ बाद ३१२ धावा (लोकेश राहुल ५४, विराट कोहली ५३, अजिंक्य रहाणे ४०, रोहित शर्मा ३८, शिखर धवन ४१, रिद्धिमान साहा नाबाद ३६, रवींद्र जडेजा १८. फर्नांडो २/३७, कौशल २/८१.)