शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाला धक्का, लोकेश राहुल बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 18:29 IST

भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का

ऑनलाइन लोकमत

कोलंबो, दि. 24 - भारतीय क्रिकेट संघ तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी-20 सामन्यासाठी श्रीलंकेमध्ये आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल पहिल्या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही. तीन महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टवेळी दुखापत झाल्यामुळे राहुल आयपीएल, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वेस्ट इंडिज दौऱ्यातही खेळू शकला नव्हता. आता ताप आल्यामुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावं लागणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआई) सोमवारी याबाबत माहिती दिली. 
 
26 जुलै रोजी टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळाचा आहे.  राहुल आणि मुरली विजयच्या अनुपस्थितीत अभिनव मुकुंद आणि शिखर धवन भारताच्या डावाची सुरूवात करतील.  टेस्ट सीरिजसाठी मुरली विजयचीही निवड करण्यात आली होती. पण मनगटाची दुखापत बरी झाली नाही म्हणून शेवटच्या क्षणी त्यानं या दौऱ्यातून माघार घेतली. त्यामुळे मुरली विजयऐवजी शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. 
 
श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याने शानदार 54 धावा फटकावल्या होत्या. पण आता ताप आल्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. 
भारत - श्रीलंका बोर्ड सराव सामना अनिर्णीत-
कर्णधार विराट कोहलीसह आघाडीच्या भारतीय फलंदाजांनी श्रीलंका बोर्ड एकादशविरुद्ध शनिवारी अनिर्णीत संपलेल्या दोन दिवसांच्या सराव सामन्यात जोरदार फटकेबाजी करीत ९ बाद ३१२ धावा उभारल्या.
 
शुक्रवारच्या ३ बाद १३५ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघासाठी कोहलीने अर्धशतक फटकाविले. मधल्या फळीतील अजिंक्य रहाणे (४०), रोहित शर्मा (३८) आणि शिखर धवन (४१) यांनीही योगदान दिले. कोहली-रहाणे यांनी शनिवारी आठ षटके खेळल्यानंतर सहकाऱ्यांना संधी दिली. कोहलीने ७८ चेंडूंत आठ चौकार, तर रहाणेने ५८ चेंडंूत तीन चौकार मारले. रोहित आणि शिखर यांनी ८० धावांची भागीदारी केली. हे दोघे १६ षटके खेळून निवृत्त झाले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ब्रेक घेणाऱ्या रोहितने ४९ चेंडू खेळून एक षट्कार व चौकार मारला. शिखरने ४८ चेंडूंत सात चौकार मारले. यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने नाबाद ३६, अष्टपैलू हार्दिक पांड्या याने १३ आणि रवींद्र जडेजाने ३२ चेंडूंत १८ धावा केल्या. श्रीलंकेसाठी कुशालने १४ षटकांत ८१ धावा देत दोन गडी बाद केले. विश्वा फर्नांडो याने दोन आणि विकुम संजया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी शुक्रवारी भारतीय गोलंदाजांनी लंका बोर्ड एकादश संघाला १८७ धावांत रोखले होते. यादवने ४, तर जडेजाने ३ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक-
श्रीलंका अध्यक्ष एकादश सर्वबाद १८७ धावा. भारत ९ बाद ३१२ धावा (लोकेश राहुल ५४, विराट कोहली ५३, अजिंक्य रहाणे ४०, रोहित शर्मा ३८, शिखर धवन ४१, रिद्धिमान साहा नाबाद ३६, रवींद्र जडेजा १८. फर्नांडो २/३७, कौशल २/८१.)