शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महामुकाबला LIVE: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, पराभवाच्या छायेत

By admin | Updated: June 18, 2017 20:57 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब

ऑनलाइन लोकमत
ओव्हल, दि. 18 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारतीय फलंदाजीचं अक्षरशः कंबरडं मोडलं. त्याने पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज निराश केलं. वैयक्तिक दुस-या षटकात मोहम्मद आमिरने त्याला केवळ 5 धावांवर शादाब खानकरवी झेलबाद केलं. तर त्यानंतर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनलाही त्याने 21 धावांवर यष्टीरक्षक कर्णधार सरफराज अहमदकडे झेल देण्यास भाग पाडलं. भरवशाच्या युवराज आणि धोनीनेही आज सपशेल निराशा केली. अनुक्रमे 22 आणि 4 धावा काढून दोघं बाद झालं.
 
यापुर्वी बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना भारतासमोर 339 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर फखर जमानने झळकावलेल्या शानदार शतकाने पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.  फखरने 106 चेंडूत 114 धावा फटकावल्या. अखेर 34 व्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला रविंद्र जडेजाकरवी झेलबाद केलं.
 
 याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही षटकं भारतीय गोलंदाजांनी चांगली टाकली, ज्यात पाकिस्तानचे फलंदाज चाचपडताना दिसले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताकडून भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी केली मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. भुवनेश्वर, जाधव आणि पांड्या यांनी प्रत्येकी  एक गडी बाद केला तर एक फलंदाज धावचीत झाला.
 
 त्यापुर्वी फखर जमानसोबत सलामीसाठी आलेल्या अझहर अलीनेही महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.  दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतक झळकावत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली मात्र 23 व्या षटकात अर्धशतकवीर अझहर अली याला धावचीत करण्यात भारताला यश आलं. त्याने 71 चेंडूत 59 धावा काढल्या. याशिवाय पाकिस्तानकडून शोएब मलिकने 12 धावा  आणि बाबर आझमने 46 धावा केल्या. त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अर्धशतकवीर मोहोम्मद हाफिझ (57) आणि  इमाद वासिमने(25) झटपट फलंदाजी करत भारतीय संघासमोर 339 धावांचं आव्हान दिलं.