शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

महामुकाबला LIVE: भारतीय फलंदाजांची हाराकिरी, पराभवाच्या छायेत

By admin | Updated: June 18, 2017 20:57 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब

ऑनलाइन लोकमत
ओव्हल, दि. 18 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारतीय फलंदाजीचं अक्षरशः कंबरडं मोडलं. त्याने पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा भोपळाही न फोडता बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज निराश केलं. वैयक्तिक दुस-या षटकात मोहम्मद आमिरने त्याला केवळ 5 धावांवर शादाब खानकरवी झेलबाद केलं. तर त्यानंतर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनलाही त्याने 21 धावांवर यष्टीरक्षक कर्णधार सरफराज अहमदकडे झेल देण्यास भाग पाडलं. भरवशाच्या युवराज आणि धोनीनेही आज सपशेल निराशा केली. अनुक्रमे 22 आणि 4 धावा काढून दोघं बाद झालं.
 
यापुर्वी बेभरवशाच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन करताना भारतासमोर 339 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर फखर जमानने झळकावलेल्या शानदार शतकाने पाकिस्तानसाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.  फखरने 106 चेंडूत 114 धावा फटकावल्या. अखेर 34 व्या षटकात हार्दिक पांड्याने त्याला रविंद्र जडेजाकरवी झेलबाद केलं.
 
 याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीची काही षटकं भारतीय गोलंदाजांनी चांगली टाकली, ज्यात पाकिस्तानचे फलंदाज चाचपडताना दिसले. मात्र त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताकडून भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी केली मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. भुवनेश्वर, जाधव आणि पांड्या यांनी प्रत्येकी  एक गडी बाद केला तर एक फलंदाज धावचीत झाला.
 
 त्यापुर्वी फखर जमानसोबत सलामीसाठी आलेल्या अझहर अलीनेही महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.  दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतक झळकावत पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली मात्र 23 व्या षटकात अर्धशतकवीर अझहर अली याला धावचीत करण्यात भारताला यश आलं. त्याने 71 चेंडूत 59 धावा काढल्या. याशिवाय पाकिस्तानकडून शोएब मलिकने 12 धावा  आणि बाबर आझमने 46 धावा केल्या. त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अर्धशतकवीर मोहोम्मद हाफिझ (57) आणि  इमाद वासिमने(25) झटपट फलंदाजी करत भारतीय संघासमोर 339 धावांचं आव्हान दिलं.