शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

लंका क्रिकेट जोड

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

भारताने १९८५ सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने त्यावेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्यावेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळल्या गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.

भारताने १९८५ सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने त्यावेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्यावेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळल्या गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने १९९७ मध्ये श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळले, पण हे दोन्ही सामने अनिर्णीत संपले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विदेशात यश मिळवले, पण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेत श्रीलंका संघाला पराभूत करण्याचा पराक्रम करता आला नाही.
गांगुली २००१ मध्ये श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार होता. तीन सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने निकाली ठरले, पण श्रीलंका संघ २-१ ने मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला. अजंता मेंडिसच्या फिरीकपुढे भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी भारताने एका लढतीत विजय मिळवला होता.
श्रीलंकेत धोनीच्या नेतृत्वाखालीही संघाचे नशीब बदलले नाही. २०१० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतील संघाला मालिकेत पराभव स्वीकारावा लागला नसला तरी विजयही मिळवता आला नाही. तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत संपली. त्यामुळे १९९३ पासून भारताला श्रीलंकेत मालिका विजय साकारता आलेला नाही.