शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
2
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
3
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'
4
‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा
5
'पाण्याचा शस्त्राप्रमाणे वापर...', शाहबाज शरीफ बरळले, सिंधू पाणी कराराची गाझाशी केली तुलना
6
Pakistan : पाकच्या अडचणी वाढणार! नद्या सुकणार, पाण्याचं मोठं संकट कोसळणार; अभ्यासातून आले समोर
7
INS Vikrant: सागरी सुरक्षेतील 'बाहुबली'! 'आयएनएस विक्रांत' पाहून पाकिस्तानलाही भरेल धडकी
8
या संरक्षण क्षेत्रातील कंपनीचा शेअर बनलाय रॉकेट, किंमत विक्रमी उच्चांकावर! क्षेपणास्त्रांच्या मोठ्या ऑर्डरवर कंपनीची नजर
9
'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका
10
देशातील आणखी एका प्रमुख राजकीय पक्षात वाद, बहिणीने भावावर केले असे आरोप  
11
"आता वेळ आलीय..." रशियाचा मास्टरस्ट्रोक! भारताबाबत असं केले विधान, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
12
'...तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते', राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरुन मोठा खुलासा
13
IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी!
14
Garud Puran: गरुड पुराणानुसार रोज 'या' पाच चुका घडत असतील तर नरकाचे तिकीट फिक्स!
15
महिलेला दीड महिना साखळदंडाने बांधून ठेवले, कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार, समोर आलं असं कारण
16
Palmistry: तळहातावर किंवा बोटांवर असलेला तीळ दर्शवतो तुमच्या यशापयशाचा आलेख!
17
शतकांचं महाशतक ठोकणाऱ्या सचिनलाही मोडता आले नाहीत हे ४ विक्रम, मोडले असते तर...!
18
Gokul Milk : 'गोकुळ'मधील पेच सुटला; अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांची निवड
19
काळाचा घाला! लग्नाची वरात सासरी पोहोचण्यापूर्वीच नववधूचा मृत्यू, नवरदेवाची मृत्यूशी झुंज
20
पाकिस्तानचे तुकडे अटळ?; बलूचिस्ताननंतर आता आणखी एका प्रांताने केली स्वतंत्र देशाची मागणी

लंका क्रिकेट जोड

By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST

भारताने १९८५ सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने त्यावेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्यावेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळल्या गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.

भारताने १९८५ सर्वप्रथम श्रीलंकेचा दौरा केला होता. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने त्यावेळी तीन कसोटी सामने खेळले, पण मालिका १-० ने गमावली. त्यानंतर १९९३ मध्ये अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने एसएससी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात २३५ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा त्यावेळी विदेशात खेळल्या गेलेल्या २७ कसोटी सामन्यांतील हा पहिला विजय होता. या दौऱ्यात कँडी व पीएसएस कोलंबोमध्ये खेळल्या गेलेले उर्वरित दोन कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने १९९७ मध्ये श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळले, पण हे दोन्ही सामने अनिर्णीत संपले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विदेशात यश मिळवले, पण त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेत श्रीलंका संघाला पराभूत करण्याचा पराक्रम करता आला नाही.
गांगुली २००१ मध्ये श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार होता. तीन सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने निकाली ठरले, पण श्रीलंका संघ २-१ ने मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला. अजंता मेंडिसच्या फिरीकपुढे भारतीय संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन लढतीत पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी भारताने एका लढतीत विजय मिळवला होता.
श्रीलंकेत धोनीच्या नेतृत्वाखालीही संघाचे नशीब बदलले नाही. २०१० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतील संघाला मालिकेत पराभव स्वीकारावा लागला नसला तरी विजयही मिळवता आला नाही. तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत संपली. त्यामुळे १९९३ पासून भारताला श्रीलंकेत मालिका विजय साकारता आलेला नाही.