शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ललिताने केला सुवर्णासह शेवट गोड

By admin | Updated: February 14, 2015 00:24 IST

महाराष्ट्राच्या ललिता बाबरने महिलांच्या ३ हजार मीटर स्टेपचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शेवट गोड केला. १

तिरुअनंतपूरम : महाराष्ट्राच्या ललिता बाबरने महिलांच्या ३ हजार मीटर स्टेपचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकून ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शेवट गोड केला. १३ व्या दिवशी महाराष्ट्र संघाला एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कास्यपदकांवर समाधान मानावे लागले. रांची येथील स्पर्धेत पदक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या महाराष्ट्राला यावेळी चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.अ‍ॅथलेटिक्स : महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात इचियोन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कास्यपदकविजेती ललिता बाबरने शर्यतीच्या सुरुवातीपासून वर्चस्व राखत आघाडी घेतली होती. तिने ही शर्यत ९ मिनिटे ४२.६३ सेकंदाची वेळ नोंदवून आपल्या संघाला या क्रीडाप्रकारातील शेवटचे सुवर्ण जिंकून दिले. याच प्रकारात जयश्री बोरगीने शर्यत १० मि. ०४.३० से. पूर्ण करून कास्य तर पुरुषांच्या याच क्रीडाप्रकारात सचिन पाटीलने ९ मि. ००.२७ सेकंदाची वेळ नोंदवून कास्यपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. पुरुषांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये लियोन टी., सनी पाटील, दत्ता झोडगे व किरण डोइफोडे यांच्या जिगरबाज पळतीमुळे आपल्या संघाला कास्यपदक जिंकून दिले. कबड्डी : महाराष्ट्राच्या महिला संघाना अंतिम फेरीत हरियानाकडून १७-२० गुणांनी पराभव पत्करावा लागला. लढतीच्या शेवटच्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या महिलांनी आतताईपणा केल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र संघाकडून सायली केरीपाळे, सुवर्णा बारटक्के, मीनल जाधव, अभिलाषा म्हात्रे व स्नेहल शिंदे यांनी आपल्या संघाचा पराभव टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. तायक्वाँदो : महाराष्ट्राच्या अंकिता पाटीलने ४९ किलो गटात कास्यपदक जिंकले. वुशू : महाराष्ट्राच्या श्रावणी कटकेने जियान वुशू प्रकारात ७.०३ गुण संपादन करून कास्यपदक जिंकले. रग्बीमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाला अंतिम फेरीत ५-१७ गुणांनी पराभव पत्करावा लागला. त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)