शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियात सातत्याचा अभाव : व्यंकटराघवन

By admin | Updated: February 6, 2015 02:10 IST

विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे

चेन्नई : विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. याशिवाय, सलामीच्या जोडीचा प्रश्न सुटलेला नाही, असे मत माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी नोंदविले. १९७५ आणि १९७९च्या विश्वषकात भारतीय संघाचे कर्णधार राहिलेले व्यंकटराघवन म्हणाले, ‘‘सध्याच्या संघात सातत्याचा अभाव आहे. आघाडीची आणि मधल्या फळीतील फलंदाजी, गोलंदाजीदेखील कमकुवत आहे. सातत्यपूर्ण कामगिरी ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते आणि भारतीय संघात नेमकी हीच बाब आढळत नाही. आघाडीच्या क्रमावर आमच्याकडे स्थिर संयोजन नाही. वन डे क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात करायची झाल्यास संयोजन मोलाचे ठरते.’’ त्यांनी धोनीच्या फलंदाजीचे आणि सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले. कर्णधार हा प्रेरणादायी आणि अनुभवी असल्याचे सांगितले; पण गोलंदाजीची त्याला साथ लाभत नाही, याविषयी चिंता वर्तवली. गोलंदाजी चिंतेचा विषय असून आमचे आघाडीचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांपुढे टिकत नाहीत. शिवाय, क्षेत्ररक्षणही कुचकामी असते, असे सांगून त्यांनी १९८३च्या विश्वषकाच्या अंतिम सामन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘कपिलच्या मिडविकेटवरील एका उत्कृष्ट झेलामुळे सामन्याचे चित्र पालटले. चांगले क्षेत्ररक्षण सामना फिरवू शकते; शिवाय गोलंदाजांनाही स्फूरण चढते, याचे तो सामना उत्तम उदाहरण ठरला.’’आॅस्ट्रेलियात वन डेत फिरकी गोलंदाजी मोलाची भूमिका वठवेल. खेळपट्टीचा वेध घेत आम्ही दोन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. न्यूझीलंडमधील स्थिती वेगळी असेल. तेथे गवत असेल. तेथे वेगवान माऱ्याला वाव असल्याने ईशांत आणि भुवनेश्वर संघात असावेत. उपांत्य फेरी भारत गाठेलच. त्यासाठी विराट कोहली आणि रोहित यांनी मोठी खेळी करायलाच हवी, असेही व्यंकटराघवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आजचे खेळाडू स्वत:ला पूर्णपणे खेळात झोकून देत नाहीत, खेळाडू महत्त्वाकांक्षी आहेत आणि खेळण्यास उत्साही आहेत; पण मैदानावर कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पंच राहिलेले एलिट पॅनलचे माजी सदस्य व्यंकटराघवन यांच्या मते भारत पहिल्या ४ संघांत स्थान मिळवू शकतो असे व्यंकटराघवन म्हणाले़