शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
2
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
3
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
4
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
5
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
6
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
7
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
8
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
9
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
10
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
11
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
12
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
13
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
14
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
15
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
16
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
17
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
18
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
19
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
20
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट

टीम इंडियात सातत्याचा अभाव : व्यंकटराघवन

By admin | Updated: February 6, 2015 02:10 IST

विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे

चेन्नई : विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. याशिवाय, सलामीच्या जोडीचा प्रश्न सुटलेला नाही, असे मत माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी नोंदविले. १९७५ आणि १९७९च्या विश्वषकात भारतीय संघाचे कर्णधार राहिलेले व्यंकटराघवन म्हणाले, ‘‘सध्याच्या संघात सातत्याचा अभाव आहे. आघाडीची आणि मधल्या फळीतील फलंदाजी, गोलंदाजीदेखील कमकुवत आहे. सातत्यपूर्ण कामगिरी ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते आणि भारतीय संघात नेमकी हीच बाब आढळत नाही. आघाडीच्या क्रमावर आमच्याकडे स्थिर संयोजन नाही. वन डे क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात करायची झाल्यास संयोजन मोलाचे ठरते.’’ त्यांनी धोनीच्या फलंदाजीचे आणि सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले. कर्णधार हा प्रेरणादायी आणि अनुभवी असल्याचे सांगितले; पण गोलंदाजीची त्याला साथ लाभत नाही, याविषयी चिंता वर्तवली. गोलंदाजी चिंतेचा विषय असून आमचे आघाडीचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांपुढे टिकत नाहीत. शिवाय, क्षेत्ररक्षणही कुचकामी असते, असे सांगून त्यांनी १९८३च्या विश्वषकाच्या अंतिम सामन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘कपिलच्या मिडविकेटवरील एका उत्कृष्ट झेलामुळे सामन्याचे चित्र पालटले. चांगले क्षेत्ररक्षण सामना फिरवू शकते; शिवाय गोलंदाजांनाही स्फूरण चढते, याचे तो सामना उत्तम उदाहरण ठरला.’’आॅस्ट्रेलियात वन डेत फिरकी गोलंदाजी मोलाची भूमिका वठवेल. खेळपट्टीचा वेध घेत आम्ही दोन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. न्यूझीलंडमधील स्थिती वेगळी असेल. तेथे गवत असेल. तेथे वेगवान माऱ्याला वाव असल्याने ईशांत आणि भुवनेश्वर संघात असावेत. उपांत्य फेरी भारत गाठेलच. त्यासाठी विराट कोहली आणि रोहित यांनी मोठी खेळी करायलाच हवी, असेही व्यंकटराघवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आजचे खेळाडू स्वत:ला पूर्णपणे खेळात झोकून देत नाहीत, खेळाडू महत्त्वाकांक्षी आहेत आणि खेळण्यास उत्साही आहेत; पण मैदानावर कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पंच राहिलेले एलिट पॅनलचे माजी सदस्य व्यंकटराघवन यांच्या मते भारत पहिल्या ४ संघांत स्थान मिळवू शकतो असे व्यंकटराघवन म्हणाले़