शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

टीम इंडियात सातत्याचा अभाव : व्यंकटराघवन

By admin | Updated: February 6, 2015 02:10 IST

विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे

चेन्नई : विश्वचषकाआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. याशिवाय, सलामीच्या जोडीचा प्रश्न सुटलेला नाही, असे मत माजी भारतीय कर्णधार श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी नोंदविले. १९७५ आणि १९७९च्या विश्वषकात भारतीय संघाचे कर्णधार राहिलेले व्यंकटराघवन म्हणाले, ‘‘सध्याच्या संघात सातत्याचा अभाव आहे. आघाडीची आणि मधल्या फळीतील फलंदाजी, गोलंदाजीदेखील कमकुवत आहे. सातत्यपूर्ण कामगिरी ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते आणि भारतीय संघात नेमकी हीच बाब आढळत नाही. आघाडीच्या क्रमावर आमच्याकडे स्थिर संयोजन नाही. वन डे क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात करायची झाल्यास संयोजन मोलाचे ठरते.’’ त्यांनी धोनीच्या फलंदाजीचे आणि सकारात्मक वृत्तीचे कौतुक केले. कर्णधार हा प्रेरणादायी आणि अनुभवी असल्याचे सांगितले; पण गोलंदाजीची त्याला साथ लाभत नाही, याविषयी चिंता वर्तवली. गोलंदाजी चिंतेचा विषय असून आमचे आघाडीचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांपुढे टिकत नाहीत. शिवाय, क्षेत्ररक्षणही कुचकामी असते, असे सांगून त्यांनी १९८३च्या विश्वषकाच्या अंतिम सामन्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘कपिलच्या मिडविकेटवरील एका उत्कृष्ट झेलामुळे सामन्याचे चित्र पालटले. चांगले क्षेत्ररक्षण सामना फिरवू शकते; शिवाय गोलंदाजांनाही स्फूरण चढते, याचे तो सामना उत्तम उदाहरण ठरला.’’आॅस्ट्रेलियात वन डेत फिरकी गोलंदाजी मोलाची भूमिका वठवेल. खेळपट्टीचा वेध घेत आम्ही दोन फिरकी गोलंदाजांसह खेळू शकतो. न्यूझीलंडमधील स्थिती वेगळी असेल. तेथे गवत असेल. तेथे वेगवान माऱ्याला वाव असल्याने ईशांत आणि भुवनेश्वर संघात असावेत. उपांत्य फेरी भारत गाठेलच. त्यासाठी विराट कोहली आणि रोहित यांनी मोठी खेळी करायलाच हवी, असेही व्यंकटराघवन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)आजचे खेळाडू स्वत:ला पूर्णपणे खेळात झोकून देत नाहीत, खेळाडू महत्त्वाकांक्षी आहेत आणि खेळण्यास उत्साही आहेत; पण मैदानावर कामगिरी करण्यात अपयशी ठरतात. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पंच राहिलेले एलिट पॅनलचे माजी सदस्य व्यंकटराघवन यांच्या मते भारत पहिल्या ४ संघांत स्थान मिळवू शकतो असे व्यंकटराघवन म्हणाले़