शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कुंबळे यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त : विराट

By admin | Updated: July 4, 2016 18:03 IST

नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा प्रदीर्घ अनुभव संघासाठी उपयुक्त सिद्ध होईल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे गोलंदाज व फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. ४ : नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा प्रदीर्घ अनुभव संघासाठी उपयुक्त सिद्ध होईल आणि त्यांच्या उपस्थितीमुळे गोलंदाज व फलंदाजांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी व्यक्त केली. विंडीज दौºयावर रवाना होण्यापूर्वी सोमवारी कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत बोलत होता.
 
विराट म्हणाला,‘कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसांच्या सराव शिबिरात मेहनत घेतली. फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांना कुंबळे यांच्या उपस्थितीचा लाभ झाला. आमच्या प्रशिक्षकांकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव आहे. फलंदाजांचे मनोधैर्य उंचावण्यास त्यांच्या टिप्स उपयुक्त ठरल्या.’
 
विराट पुढे म्हणाला,‘रविवारी कुंबळे यांनी संघासाठी एक ‘सरप्राईज’ ठेवले होते. त्यामुळे खेळाडूंना एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळाली व संघात चांगले वातावरण निर्माण करण्यास मदत झाली. कुंबळे सरांचा हा प्रयत्न चांगला होता. कारण अनेकदा संघामध्ये चांगले वातावरण निर्माण करण्याचा विसर पडतो. संघामध्ये चांगले वातावरण असणे महत्त्वाचे आहे. महेंद्रसिंग धोनीही यावेळी उपस्थित होता. सर्वांना याचा आनंद मिळला. विंडीज दौ-यापूर्वी आमच्यासाठी ही महत्त्वाची बाब ठरली.’ भारतीय संघ २१ जुलै ते २२ आॅगस्ट या कालावधीत विंडीज दौ-यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २१ जुलैपासून अ‍ॅन्टिग्वामध्ये खेळल्या जाईल.  
 
विंडीज दौ-यात फलंदाजी व गोलंदाजी विभागाच्या तयारीबाबत बोलताना विराट म्हणाला,‘अनेक विभागांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, याची आम्हाला कल्पना आहे. फलंदाजीमध्ये मोठ्या भागीदारी करण्यावर भर देणे आवश्यक आहे. खेळाडूंनी एकमेकांना समजून घेतले तर सर्वकाही सुरळीत होते. गेल्या काही मालिकांमध्ये आम्ही संयम गमावित चुकीचे फटके खेळले. त्यामुळे आता संघ म्हणून कामगिरीत सुधारणा करावी लागेल.’
 
गोलंदाजीबाबत बोलताना विराट म्हणाला,‘मायदेशात फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करीत आहेत. गेल्या काही लढतींमध्ये त्यांनी संघाला विजय मिळवून दिला आहे. विंडीजमध्ये रिव्हर्स स्विंगसाठी अनुकूल स्थिती असते. आमच्या गोलंदाजांची योजना बघता कर्णधार म्हणून माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळाली आहे.’
 
विंडीज दौरा निश्चितच भारतीय संघासाठी आव्हान आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर यष्टिरक्षकाची जागा भरून काढण्यासाठी विराटची  स्पेशालिस्टला पसंती आहे.  
विराट म्हणाला,‘संघात लोकेश राहुल व रिद्धिमान साहा यांच्या रूपाने दोन यष्टिरक्षक आहे, पण माझ्या मते रिद्धिमान स्पेशालिस्ट आहे. त्याच्या फलंदाजीमध्येही सुधारणा होत आहे. त्यामुळे माझी पहिली पसंती त्याला राहील.’
विंडीजला ‘क्लीन स्वीप’ दिला तर भारताला क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. याबाबत बोलताना विराट म्हणाला,‘क्रमवारीवर आमचे लक्ष नाही. आम्ही केवळ चांगला खेळ करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. क्रमवारीवर आपले नियंत्रण नसते. त्यात सातत्याने बदल होत असतो. मालिकेत चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असून प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न राहील. आगामी सत्र कसोटी क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहे. विंडीज दौºयाच्या निमित्ताने संघाला कामगिरीचे आकलन करण्याची संधी मिळणार आहे.’
 
दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करीत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत बोलताना विराट म्हणाला,‘शमीला रिव्हर्स स्विंगची चांगली कल्पना आहे. त्याच्या पुनरागमनामुळे आनंद झाला. शमी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असून विंडीजमधील वातावरण त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.’
 
कुंबळे यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये विजय मिळवण्यासाठी व चांगली कामगिरी करण्याची वेगळी इच्छा जागृत झाली असल्याचे सांगताना विराट म्हणाला,‘कुंबळे यांनी विपरीत परिस्थितीमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यांनी अशी कामगिरी केली असल्यामुळे आम्हालाही ते ही बाब चांगल्या पद्धतीने समजावून देऊ शकतात. या बाबतीत कुंबळे आणि मी सारखेच आहोत.’ 
 
विराट पुढे म्हणाला,‘चांगला प्रशिक्षक खेळाडूंना समजून घेतो आणि कुंबळे प्रत्येक खेळाडूंसोबत वेगवेगळी चर्चा करतात आणि त्यांना समजून घेतात. ते नेहमी खेळाडूंसोबत जुळलेले असतात.’