शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीने अधिक जबाबदारीने खेळण्याची गरज : प्रसन्ना

By admin | Updated: March 31, 2015 00:01 IST

विष्यात क्रिकेटच्या सर्वच स्वरूपामध्ये (कसोटी, वन-डे आणि टी-२०) विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता असून

नवी दिल्ली : भविष्यात क्रिकेटच्या सर्वच स्वरूपामध्ये (कसोटी, वन-डे आणि टी-२०) विराट कोहलीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता असून, या फलंदाजाने संघाची अधिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले. प्रसन्ना म्हणाले, ‘‘पुढील विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याने संघाची अधिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असून, खेळाडूंना एकसंध राखण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.’’विश्वकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोहलीच्या कामगिरीनंतर प्रसन्ना यांनी हे वक्तव्य केले.प्रसन्ना म्हणाले, ‘‘आक्रमकता असणे आवश्यक आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर देऊ शकत नाही. कोहली चांगला खेळाडू आहे, पण त्याने कधी कधी प्रतिस्पर्ध्यांचाही आदर करायला हवा. तुम्ही प्रत्येक वेळी गोलंदाजांना लक्ष्य करू शकत नाही.’’ कोहलीला विश्वकप स्पर्धेत विशेष छाप सोडता आली नाही. पण त्याने ५०.३८ च्या सरासरीने ८ सामन्यांत ३०५ धावा फटकावल्या. स्पर्धेत सलामीला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी करणाऱ्या कोहलीला त्यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे चाहते निराश झाले. (वृत्तसंस्था)