शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोहलीने गळा कापण्याचा इशारा केला

By admin | Updated: March 11, 2017 02:07 IST

बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार

मुंबई : बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोहलीला पायचित दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात पंचांच्या रुममध्ये गेला आणि विराटला बाद का दिले, याबाबत स्पष्टीकरण मागितले, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने आॅस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांवर शीतपेयाची बाटली फेकली. त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप ‘टेलीग्राफ’ने केला आहे. बाद झाल्यानंतर कोहलीने एनर्जी ड्रिंकची बाटली टेबलावर फेकली ती आॅस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याला लागली. कुंबळेने जाणूनबुजून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने हे प्रकरण ‘आयसीसी’कडे नेले. याशिवाय विराट कोहलीने आॅस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्बला गळा कापण्याचा इशारा केला होता, असा गंभीर आरोपही वृत्तपत्राने केला आहे. कोहली श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगानंतर सर्वांत खराब कर्णधार असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)काय आहे प्रकरणबंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या एकविसाव्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा कणर्धार स्टिव्ह स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणाऱ्या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट््यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरविले. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडूंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी आॅस्ट्रेलियाकडे तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राईकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला; पण तेथून तो आॅस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रुमकडे पाहत होता, आणि तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करीत होते. पंचांच्याही हे ध्यानात आले. ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असे करू शकत नाहीस, असे ते त्याला म्हणाले. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर आॅस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितले.