शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोहलीने गळा कापण्याचा इशारा केला

By admin | Updated: March 11, 2017 02:07 IST

बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार

मुंबई : बंगलोर कसोटीमध्ये सुरू झालेल्या ‘डीआरएस’ खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ'ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कोहलीला पायचित दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात पंचांच्या रुममध्ये गेला आणि विराटला बाद का दिले, याबाबत स्पष्टीकरण मागितले, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने आॅस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांवर शीतपेयाची बाटली फेकली. त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप ‘टेलीग्राफ’ने केला आहे. बाद झाल्यानंतर कोहलीने एनर्जी ड्रिंकची बाटली टेबलावर फेकली ती आॅस्ट्रेलियाच्या एका अधिकाऱ्याला लागली. कुंबळेने जाणूनबुजून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने हे प्रकरण ‘आयसीसी’कडे नेले. याशिवाय विराट कोहलीने आॅस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्बला गळा कापण्याचा इशारा केला होता, असा गंभीर आरोपही वृत्तपत्राने केला आहे. कोहली श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगानंतर सर्वांत खराब कर्णधार असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. (वृत्तसंस्था)काय आहे प्रकरणबंगलोर कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या एकविसाव्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा कणर्धार स्टिव्ह स्मिथ पायचित झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी अनियमितपणे उसळी घेणाऱ्या या खेळपट्टीवर बराच खाली राहिलेला तो चेंडू सरळ यष्ट््यांचा वेध घेणारा होता. त्यामुळे पंचांनीही क्षणाचाही वेळ न घेता त्याला बाद ठरविले. चेंडू स्मिथच्या पायाला लागताच भारतीय खेळाडूंनीही जल्लोष करायला सुरूवात केली. मात्र, त्यावेळी आॅस्ट्रेलियाकडे तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याच्या (डीआरएस) दोन्ही संधी उपलब्ध होत्या. आपण आऊट आहोत की नाही याबाबत स्मिथला शंका होती. त्यामुळे रिव्ह्यू घ्यावा की नाही हे विचारण्यासाठी स्मिथ नॉनस्ट्राईकला असलेल्या पिटर हॅन्डसकॉम्बकडे गेला; पण तेथून तो आॅस्ट्रेलियाचे खेळाडू बसलेल्या ड्रेसिंग रुमकडे पाहत होता, आणि तेथून त्याला कांगारूंचे खेळाडू इशारे करीत होते. पंचांच्याही हे ध्यानात आले. ते स्मिथकडे पोहोचले आणि तू असे करू शकत नाहीस, असे ते त्याला म्हणाले. दरम्यान, भारतीय संघातील खेळाडू चांगलेच भडकले. जर स्मिथने रिव्ह्यू घेतला असता तर आॅस्ट्रेलियाचा एक रिव्ह्यूही वाया गेला असता. भारतीय खेळाडूंनी त्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. खेळाडूंचा वाढता आक्रोश पाहून पंचांनी मध्यस्थी केली आणि स्मिथला जायला सांगितले.