शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कोहली भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार

By admin | Updated: February 14, 2017 00:17 IST

फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार

हैदराबाद : फलंदाजीव्यतिरिक्त नेतृत्वामध्ये रोज नवे विक्रम नोंदविण्याच्या दिशेने वाटचाल करणारा विराट कोहली सोमवारी भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. तो सर्वांधिक कसोटी सामन्यांत अपराजित असलेला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताने सोमवारी बांगलादेशचा एकमेव कसोटी सामन्यात २०८ धावांनी पराभव केला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा १५ वा कसोटी विजय ठरला आहे. कर्णधार म्हणून २३ वा कसोटी सामना खेळणाऱ्या कोहलीने मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने ४७ सामन्यांत १४ विजय मिळवले. कोहली आता भारताचा तिसरा सर्वांत यशस्वी कर्णधार ठरला आहे. महेंद्रसिंग धोनी (६० सामन्यांत २७ विजय) आणि सौरव गांगुली (४९ सामन्यांत २१ विजय) त्याच्या तुलनेत आघाडीवर आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पहिल्या २३ कसोटी सामन्यांत कोहलीपेक्षा अधिक विजय केवळ आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉने (१७ विजय) मिळवले आहेत. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला गेल्या १९ कसोटी सामन्यांत एकदाही पराभव स्वीकारावा लागलेला नाही. भारतासाठी हा नवा विक्रम आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १८ सामन्यांत अपराजित राहण्याचा पराक्रम केला आहे. सर्वाधिक काळ अपराजित राहण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या (२७ सामने) नावावर आहे. भारताने सलग सहाव्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. आॅगस्ट २०१५ पासून भारताने एकही मालिका गमावलेली नसून, हा भारतासाठी नवा विक्रम आहे. (वृत्तसंस्था)