शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

कोहली बॉस आहे, तर मग प्रशिक्षकाची काय गरज - ईरापल्ली प्रसन्ना

By admin | Updated: June 23, 2017 17:49 IST

माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर कडक शब्दांत टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 - माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर टीका करत, जर कर्णधाराला आपण भारतीय क्रिकेटचा बॉस आहे असं वाटत असेल, तर मग संघाला प्रशिक्षकाची काय गरज ? असा सवाल विचारला आहे. प्रसन्ना यांना जेव्हा विराट कोहली आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा-या अनिल कुंबळेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कडक शब्दात टीका केली. "कर्णधारच बॉस आहे तर मग त्यांनी प्रशिक्षकाची काय गरज ? मला तर वाटतं त्यांना बॅटिंग आणि फिल्डिंग कोचची देखील गरज नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना बोलले आहेत. 
 
प्रसन्ना यांनी यावेळी विराट कोहलीच्या कर्णधार क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "कोहली एक चांगला खेळाडू आहे यात काही वाद नाही. मात्र तो एक चांगला कर्णधार आहे की नाही याबद्दल काही बोलू शकत नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना यांनी सांगितलं. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहलीला आपली शिकवण्याची पद्धत आवडत नसल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर केला होता. भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच वेस्ट इंडिज दौ-यावर गेला आहे. तिथे पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळायचा आहे. 
 
प्रसन्ना यांनी सांगितलं की, "जर कुंबळेसारख्या वरिष्ठ खेळाडूला सन्माननीय वागणूक मिळत नसेल, तर मग मला नाही वाटत की बांगड किंवा श्रीधर यांच्यात इतकी ताकद आहे की ते कोहलीसोबत आत्मविश्वासने संवाद साधतील. यामधील कोणीही कुंबळेइतकं अनुभवी नाही". ते म्हणालेत की, "जर कर्णधाराचं वागणं असंच राहणार असेल, तर कोचची गरज आहे असं मला वाटत नाही".  
 
प्रसन्ना बोलले आहेत की, "जर कोहलीने जबाबदारी घेतली तर पुन्हा एकदा जुने दिवस येतील जेव्हा सर्व गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जायची. कोचची नेमकी भूमिका स्पष्ट नाही करण्यात आली आहे". प्रसन्ना यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. मला नाही वाटत की 2019 मध्ये होणा-या वर्ल्डकपपर्यंत आपला खेळ कायम ठेवण्यात त्यांना यश मिळेल. तोपर्यंत दोघेही 38 वर्षांचे होतील. आपल्याला नवीन आणि तरुण खेळाडूंची गरज आहे, जे चपळ असतील".
 
प्रसन्ना पुढे बोललेत की, "धोनी विके़टकीपर असेल, मात्र युवराज सिंह एक खेळाडू म्हणून ओझं बनत चालला आहे. वेस्ट इंडिज दौ-यात समोर दुबळा संघ असताना तरुण खेळाडूंची निवड करायला हवं होतं".