शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोहली बॉस आहे, तर मग प्रशिक्षकाची काय गरज - ईरापल्ली प्रसन्ना

By admin | Updated: June 23, 2017 17:49 IST

माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर कडक शब्दांत टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 - माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर टीका करत, जर कर्णधाराला आपण भारतीय क्रिकेटचा बॉस आहे असं वाटत असेल, तर मग संघाला प्रशिक्षकाची काय गरज ? असा सवाल विचारला आहे. प्रसन्ना यांना जेव्हा विराट कोहली आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा-या अनिल कुंबळेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कडक शब्दात टीका केली. "कर्णधारच बॉस आहे तर मग त्यांनी प्रशिक्षकाची काय गरज ? मला तर वाटतं त्यांना बॅटिंग आणि फिल्डिंग कोचची देखील गरज नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना बोलले आहेत. 
 
प्रसन्ना यांनी यावेळी विराट कोहलीच्या कर्णधार क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "कोहली एक चांगला खेळाडू आहे यात काही वाद नाही. मात्र तो एक चांगला कर्णधार आहे की नाही याबद्दल काही बोलू शकत नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना यांनी सांगितलं. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहलीला आपली शिकवण्याची पद्धत आवडत नसल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर केला होता. भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच वेस्ट इंडिज दौ-यावर गेला आहे. तिथे पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळायचा आहे. 
 
प्रसन्ना यांनी सांगितलं की, "जर कुंबळेसारख्या वरिष्ठ खेळाडूला सन्माननीय वागणूक मिळत नसेल, तर मग मला नाही वाटत की बांगड किंवा श्रीधर यांच्यात इतकी ताकद आहे की ते कोहलीसोबत आत्मविश्वासने संवाद साधतील. यामधील कोणीही कुंबळेइतकं अनुभवी नाही". ते म्हणालेत की, "जर कर्णधाराचं वागणं असंच राहणार असेल, तर कोचची गरज आहे असं मला वाटत नाही".  
 
प्रसन्ना बोलले आहेत की, "जर कोहलीने जबाबदारी घेतली तर पुन्हा एकदा जुने दिवस येतील जेव्हा सर्व गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जायची. कोचची नेमकी भूमिका स्पष्ट नाही करण्यात आली आहे". प्रसन्ना यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. मला नाही वाटत की 2019 मध्ये होणा-या वर्ल्डकपपर्यंत आपला खेळ कायम ठेवण्यात त्यांना यश मिळेल. तोपर्यंत दोघेही 38 वर्षांचे होतील. आपल्याला नवीन आणि तरुण खेळाडूंची गरज आहे, जे चपळ असतील".
 
प्रसन्ना पुढे बोललेत की, "धोनी विके़टकीपर असेल, मात्र युवराज सिंह एक खेळाडू म्हणून ओझं बनत चालला आहे. वेस्ट इंडिज दौ-यात समोर दुबळा संघ असताना तरुण खेळाडूंची निवड करायला हवं होतं".