शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोहली बॉस आहे, तर मग प्रशिक्षकाची काय गरज - ईरापल्ली प्रसन्ना

By admin | Updated: June 23, 2017 17:49 IST

माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर कडक शब्दांत टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 - माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर टीका करत, जर कर्णधाराला आपण भारतीय क्रिकेटचा बॉस आहे असं वाटत असेल, तर मग संघाला प्रशिक्षकाची काय गरज ? असा सवाल विचारला आहे. प्रसन्ना यांना जेव्हा विराट कोहली आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा-या अनिल कुंबळेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कडक शब्दात टीका केली. "कर्णधारच बॉस आहे तर मग त्यांनी प्रशिक्षकाची काय गरज ? मला तर वाटतं त्यांना बॅटिंग आणि फिल्डिंग कोचची देखील गरज नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना बोलले आहेत. 
 
प्रसन्ना यांनी यावेळी विराट कोहलीच्या कर्णधार क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "कोहली एक चांगला खेळाडू आहे यात काही वाद नाही. मात्र तो एक चांगला कर्णधार आहे की नाही याबद्दल काही बोलू शकत नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना यांनी सांगितलं. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहलीला आपली शिकवण्याची पद्धत आवडत नसल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर केला होता. भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच वेस्ट इंडिज दौ-यावर गेला आहे. तिथे पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळायचा आहे. 
 
प्रसन्ना यांनी सांगितलं की, "जर कुंबळेसारख्या वरिष्ठ खेळाडूला सन्माननीय वागणूक मिळत नसेल, तर मग मला नाही वाटत की बांगड किंवा श्रीधर यांच्यात इतकी ताकद आहे की ते कोहलीसोबत आत्मविश्वासने संवाद साधतील. यामधील कोणीही कुंबळेइतकं अनुभवी नाही". ते म्हणालेत की, "जर कर्णधाराचं वागणं असंच राहणार असेल, तर कोचची गरज आहे असं मला वाटत नाही".  
 
प्रसन्ना बोलले आहेत की, "जर कोहलीने जबाबदारी घेतली तर पुन्हा एकदा जुने दिवस येतील जेव्हा सर्व गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जायची. कोचची नेमकी भूमिका स्पष्ट नाही करण्यात आली आहे". प्रसन्ना यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. मला नाही वाटत की 2019 मध्ये होणा-या वर्ल्डकपपर्यंत आपला खेळ कायम ठेवण्यात त्यांना यश मिळेल. तोपर्यंत दोघेही 38 वर्षांचे होतील. आपल्याला नवीन आणि तरुण खेळाडूंची गरज आहे, जे चपळ असतील".
 
प्रसन्ना पुढे बोललेत की, "धोनी विके़टकीपर असेल, मात्र युवराज सिंह एक खेळाडू म्हणून ओझं बनत चालला आहे. वेस्ट इंडिज दौ-यात समोर दुबळा संघ असताना तरुण खेळाडूंची निवड करायला हवं होतं".