शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

केन विलियम्सन तिन्ही प्रकारांत अव्वल पाचमध्ये

By admin | Updated: January 10, 2017 01:46 IST

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन

दुबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर आयसीसी मानांकनात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळविणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर विलियम्सनने अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत बांगलादेशचा ३-० ने सफाया केला. विलियम्सनने नाबाद ७३, १२ व ६० धावांची खेळी केली. मालिकेत त्याने एकूण १४५ धावा फटकाविल्या. या चमकदार कामगिरीचा त्याला मानांकनामध्ये लाभ झाला. त्याने दोन स्थानांनी प्रगती करताना चौथे स्थान पटकाविले. विलियम्सनने कसोटी व वन-डे मानांकनामध्ये यापूर्वीच अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले आहे. तो कसोटीमध्ये चौथ्या, तर वन-डेमध्ये पाचव्या स्थानी आहे. विलियम्सन व्यतिरिक्त कोलिन मुन्रोने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रगती केली आहे. त्याने दुसऱ्या लढतीत ५४ चेंडूंना सामोरे जाताना १०१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने १९ वे स्थान पटकाविले. टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत आयसीसी एमर्जिंग ‘क्रिकेटर आॅफ द इयर’ पुरस्काराचा मानकरी बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमानने १० स्थानांची प्रगती केली असून, तो १०व्या स्थानी दाखल झाला आहे. तो बांगलादेशचा सर्वोत्तम मानांकन असलेला खेळाडू ठरला आहे.त्याने शाकिब अल-हसनला पिछाडीवर सोडले आहे. शाकिबने तीन स्थानांची प्रगती केली असून तो ११ व्या स्थानी आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध ३-० ने विजय मिळवल्यामुळे त्यांना एका मानांकन गुणांचा लाभ झाला आहे. त्यांच्या खात्यावर १२९ मानांकन गुणांची नोंद आहे. भारत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशला एका मानांकन गुणाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या खात्यावर ७२ मानांकन गुणांची नोंद आहे. (वृत्तसंस्था)  यापूर्वी, जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये समावेश असलेला कोहली एकमेव फलंदाज होता. कोहली टी-२० मध्ये अव्वल स्थानी असून, वन-डे व कसोटीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.   विशेष बाब म्हणजे, कोहली व विलियम्सन या दोघांनी मलेशियात २००८ मध्ये आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आपापल्या संघाचे नेतृत्व केले होते. भारताने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १२ धावांनी पराभव करीत जेतेपद पटकाविले होते.