शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

केन विलियम्सन तिन्ही प्रकारांत अव्वल पाचमध्ये

By admin | Updated: January 10, 2017 01:46 IST

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन

दुबई : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने सोमवारी जाहीर झालेल्या टी-२० मानांकनामध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विलियम्सन भारतीय कर्णधार विराट कोहलीनंतर आयसीसी मानांकनात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळविणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर विलियम्सनने अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत बांगलादेशचा ३-० ने सफाया केला. विलियम्सनने नाबाद ७३, १२ व ६० धावांची खेळी केली. मालिकेत त्याने एकूण १४५ धावा फटकाविल्या. या चमकदार कामगिरीचा त्याला मानांकनामध्ये लाभ झाला. त्याने दोन स्थानांनी प्रगती करताना चौथे स्थान पटकाविले. विलियम्सनने कसोटी व वन-डे मानांकनामध्ये यापूर्वीच अव्वल पाचमध्ये स्थान मिळविले आहे. तो कसोटीमध्ये चौथ्या, तर वन-डेमध्ये पाचव्या स्थानी आहे. विलियम्सन व्यतिरिक्त कोलिन मुन्रोने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रगती केली आहे. त्याने दुसऱ्या लढतीत ५४ चेंडूंना सामोरे जाताना १०१ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने १९ वे स्थान पटकाविले. टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत आयसीसी एमर्जिंग ‘क्रिकेटर आॅफ द इयर’ पुरस्काराचा मानकरी बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमानने १० स्थानांची प्रगती केली असून, तो १०व्या स्थानी दाखल झाला आहे. तो बांगलादेशचा सर्वोत्तम मानांकन असलेला खेळाडू ठरला आहे.त्याने शाकिब अल-हसनला पिछाडीवर सोडले आहे. शाकिबने तीन स्थानांची प्रगती केली असून तो ११ व्या स्थानी आहे. दरम्यान, न्यूझीलंडने टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. बांगलादेशविरुद्ध ३-० ने विजय मिळवल्यामुळे त्यांना एका मानांकन गुणांचा लाभ झाला आहे. त्यांच्या खात्यावर १२९ मानांकन गुणांची नोंद आहे. भारत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशला एका मानांकन गुणाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या खात्यावर ७२ मानांकन गुणांची नोंद आहे. (वृत्तसंस्था)  यापूर्वी, जागतिक क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वल पाचमध्ये समावेश असलेला कोहली एकमेव फलंदाज होता. कोहली टी-२० मध्ये अव्वल स्थानी असून, वन-डे व कसोटीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.   विशेष बाब म्हणजे, कोहली व विलियम्सन या दोघांनी मलेशियात २००८ मध्ये आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वकप स्पर्धेत आपापल्या संघाचे नेतृत्व केले होते. भारताने दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर १२ धावांनी पराभव करीत जेतेपद पटकाविले होते.