शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

कौन बनेगा ‘नंबर वन’?, आश्विन, जडेजामध्ये होणार झुंज

By admin | Updated: February 8, 2017 00:42 IST

आगामी ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज झाले

दुबई : आगामी ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारत आणि बांगलादेश एकमेकांविरुद्ध लढण्यास सज्ज झाले असतानाच, दुसरीकडे मात्र भारतीय संघातील दोन प्रमुख फिरकी गोलंदाज ‘नंबर वन’ ठरण्यासाठी एकमेकांविरुद्ध झुंजतील. सध्या आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दोन स्थानी असलेल्या रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सध्या आश्विन अव्वल स्थानी विराजमान असून, त्याखालोखाल जडेजा द्वितीय क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आश्विन आणि जडेजा यांच्यामध्ये केवळ ८ गुणांचे अंतर असल्याने जडेजाला अव्वल स्थान काबीज करण्याची संधी आहे. तर दुसरीकडे, बांगलादेशाविरुद्ध दबदबा राखून आपले अव्वल स्थान आणखी भक्कम करण्यास आश्विन उत्सुक असेल. यामुळेच या दोन स्टार गोलंदाजांच्या लढाईमध्ये कोण कोणाची ‘फिरकी’ घेणार, याबाबत क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात इंदूरमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३२१ धावांनी विजय मिळविल्यापासून आश्विन मानांकनामध्ये अव्वल स्थानावर आहे. यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धही चमकदार कामगिरी करताना आपले अव्वल स्थान कायम राखले. मात्र, याच दौऱ्यात जडेजाने सातत्यपूर्ण कामगिरी करून क्रमवारीमध्ये मोठी झेप घेऊन द्वितीय स्थान पटकावले. यामुळे एक वेळ कोणाचीही स्पर्धा नसलेल्या आश्विनपुढे आपल्याच संघातील जडेजाचे नवे आव्हान उभे राहिले. सर्व काही एका गुणासाठीसंघांच्या क्रमवारीमध्ये भारत अव्वल स्थानावर असून, बांगलादेश नवव्या स्थानी आहे. जर या सामन्यात बांगलादेशाने विजय मिळविला, तर त्यांना ५ मानांकन गुणांचा लाभ होईल. भारताला दोन मानांकन गुणांचे नुकसान सहन करावे लागेल. त्याच वेळी भारताने विजय मिळविल्यास यजमानांना एका मानांकन गुणाचा लाभ होईल, तर बांगलादेशाचा एक मानांकन गुण कमी होईल.भारत-बांगलादेश कसोटी सामन्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्या संघाचा शाकीब अल्-हसन हा तिसरा सर्वोत्तम मानांकन असलेला गोलंदाज आहे. आयसीसी क्रमवारीत तो १४व्या स्थानी आहे. त्याचप्रमाणे, भारताचा ईशांत शर्मा (२३), बांगलादेशाचा मेहदी हसन (३६), भारताचा उमेश यादव (३७) आणि बांगलादेशाचा ताजुल इस्लाम (३९) यांनाही आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे. ‘विराट’ सुधारणा करायची आहेफलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर असलेल्या आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या तुलनेत ५८ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. या एकमेव सामन्यातून हे अंतर कमी करण्याची कोहलीला संधी असेल. त्याचप्रमाणे, चेतेश्वर पुजारा (१२), अजिंक्य रहाणे (१५), शाकीब (२२), मुरली विजय (२७), तमीम इक्बाल (२८) आणि मोमीनुल हक (२९) यांनाही आपल्या मानांकनातील स्थान सुधारण्याची संधी आहे.