शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

कर्नाटकचे मुंबईला चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: February 8, 2015 02:00 IST

सिद्धेश लाड (१०६) आणि निखिल पाटील (१०६) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर यजमान मुंबईने पहिल्या डावात कर्नाटकविरुद्ध सर्वबाद ४३६ अशी धावसंख्या उभारली.

मुंबई : सिद्धेश लाड (१०६) आणि निखिल पाटील (१०६) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर यजमान मुंबईने पहिल्या डावात कर्नाटकविरुद्ध सर्वबाद ४३६ अशी धावसंख्या उभारली. मात्र गोलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्याने पाहुण्या कर्नाटकने दुसऱ्या दिवस अखेर २ बाद १७५ अशी मजल मारत सामन्याचे पारडे समान स्थितीत आणले. मुंबईकडे अद्याप २६१ धावांची आघाडी आहे.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात समाधानकारक मजल मारली. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या यजमानांची सुरुवात निराशाजनक होती. ५ बाद १६७ अशा अडचणीत सापडलेल्या मुंबईला सिद्धेश आणि निखिल यांनी १९० धावांची निर्णायक भागीदारी करून सावरले. कालच्या ५ बाद ३५७ या धावसंख्येवरून सुरुवात करताना या नाबाद जोडीने सावध खेळ केला. सिद्धेशने मोसमातील आपले पहिले शतक ठोकले. मात्र सहा धावांची भर टाकून तो लगेच बाद झाला. यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने १८ चेंडूंत १५ धावांची छोटेखानी खेळी केली. तर निखिलदेखील मोसमातील पहिले शतक झळकावल्यानंतर लगेच परतल्याने मुंबईचा डाव ८ बाद ४०४ असा घसरला. यानंतर अक्षय गिरप (२४) आणि हरमीत सिंग (१२) यांनी थोडाफार प्रतिकार केला. सिद्धेशने १३५ चेंडू खेळताना तब्बल २० चौकार खेचले. तर निखिलने १७२ चेंडूंमध्ये १३ चौकार व २ षटकार ठोकले. कर्णधार विनय कुमारने (४/८८) यशस्वी मारा करताना मुंबईला रोखले. तर उदीत पटेल आणि श्रीनाथ अरविंद यांनी अनुक्रमे ३ व २ गडी बाद केले.यानंतर मजबूत फलंदाजी असलेल्या कर्नाटकने पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करीत मुंबईला चोख उत्तर दिले. हुकमी गोलंदाज शार्दुल आणि संधू सपशेल अपयशी ठरल्याने यजमानांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अशावेळी हरमीतने रॉबीन उथप्पाला (४९) बाद करून पाहुण्यांना पहिला झटका दिला. या वेळी मुंबई पुनरागमन करेल असे दिसत होते. मात्र रवीकुमार समर्थ (नाबाद ८५) आणि कुणाल कपूर (३५) यांनी दुसऱ्या गडीसाठी ७३ धावांची भागीदारी करीत मुंबईला पळवले. दरम्यान, गिरपने ५५व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कपूरचा त्रिफळा उडवत मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर आलेल्या धडाकेबाज फलंदाज मनीष पांड्येने जम बसलेल्या समर्थसोबत दिवसअखेर टिकून राहताना यजमानांना दडपणाखाली आणले. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई (पहिला डाव) : मांगेला झे. उथप्पा गो. विनय ४, तरे झे. समर्थ गो. गोपाळ ७२, अय्यर झे. गौतम गो. विनय २०, नायर झे. पांड्ये गो. पटेल ३६, यादव पायचीत गो. पटेल १९, लाड झे. गौतम गो. विनय १०६, पाटील झे. पांड्ये गो. अरविंद १०६, ठाकूर झे. उथप्पा गो. पटेल १५, गिरप झे. समर्थ गो. अरविंद २४, हरमीत झे. पायचीत गो. विनय १२, संधू नाबाद ९. अवांतर - १३. एकूण : ११७.१ षटकांत सर्वबाद ४३६ धावा.गोलंदाजी :विनय २३.१-६-८८-४; मिथुन २०-७-७४-०; गोपाळ १५-१-७३-१; अरविंद २७-३-९१-२; पटेल ३१-३-९६-३; समर्थ १-०-२-०.कर्नाटक (पहिला डाव) : उथप्पा पायचीत गो. हरमीत ४९, समर्थ खेळत आहे ८५, कपूर त्रि. गो. गिरप ३५, पांड्ये खेळत आहे ०. अवांतर - ६. एकूण ६० षटकांत २ बाद १७५ धावा.गोलंदाजी : ठाकूर ११-२-४५-०; संधू ७-३-८-०; हरमीत २३-३-६३-१; गिरप १८-०-५३-१; लाड १-०-४-०.