शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे मुंबईला चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: February 8, 2015 02:00 IST

सिद्धेश लाड (१०६) आणि निखिल पाटील (१०६) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर यजमान मुंबईने पहिल्या डावात कर्नाटकविरुद्ध सर्वबाद ४३६ अशी धावसंख्या उभारली.

मुंबई : सिद्धेश लाड (१०६) आणि निखिल पाटील (१०६) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर यजमान मुंबईने पहिल्या डावात कर्नाटकविरुद्ध सर्वबाद ४३६ अशी धावसंख्या उभारली. मात्र गोलंदाजांना साजेशी कामगिरी करता न आल्याने पाहुण्या कर्नाटकने दुसऱ्या दिवस अखेर २ बाद १७५ अशी मजल मारत सामन्याचे पारडे समान स्थितीत आणले. मुंबईकडे अद्याप २६१ धावांची आघाडी आहे.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात समाधानकारक मजल मारली. स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या यजमानांची सुरुवात निराशाजनक होती. ५ बाद १६७ अशा अडचणीत सापडलेल्या मुंबईला सिद्धेश आणि निखिल यांनी १९० धावांची निर्णायक भागीदारी करून सावरले. कालच्या ५ बाद ३५७ या धावसंख्येवरून सुरुवात करताना या नाबाद जोडीने सावध खेळ केला. सिद्धेशने मोसमातील आपले पहिले शतक ठोकले. मात्र सहा धावांची भर टाकून तो लगेच बाद झाला. यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरने १८ चेंडूंत १५ धावांची छोटेखानी खेळी केली. तर निखिलदेखील मोसमातील पहिले शतक झळकावल्यानंतर लगेच परतल्याने मुंबईचा डाव ८ बाद ४०४ असा घसरला. यानंतर अक्षय गिरप (२४) आणि हरमीत सिंग (१२) यांनी थोडाफार प्रतिकार केला. सिद्धेशने १३५ चेंडू खेळताना तब्बल २० चौकार खेचले. तर निखिलने १७२ चेंडूंमध्ये १३ चौकार व २ षटकार ठोकले. कर्णधार विनय कुमारने (४/८८) यशस्वी मारा करताना मुंबईला रोखले. तर उदीत पटेल आणि श्रीनाथ अरविंद यांनी अनुक्रमे ३ व २ गडी बाद केले.यानंतर मजबूत फलंदाजी असलेल्या कर्नाटकने पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करीत मुंबईला चोख उत्तर दिले. हुकमी गोलंदाज शार्दुल आणि संधू सपशेल अपयशी ठरल्याने यजमानांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. अशावेळी हरमीतने रॉबीन उथप्पाला (४९) बाद करून पाहुण्यांना पहिला झटका दिला. या वेळी मुंबई पुनरागमन करेल असे दिसत होते. मात्र रवीकुमार समर्थ (नाबाद ८५) आणि कुणाल कपूर (३५) यांनी दुसऱ्या गडीसाठी ७३ धावांची भागीदारी करीत मुंबईला पळवले. दरम्यान, गिरपने ५५व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कपूरचा त्रिफळा उडवत मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. यानंतर आलेल्या धडाकेबाज फलंदाज मनीष पांड्येने जम बसलेल्या समर्थसोबत दिवसअखेर टिकून राहताना यजमानांना दडपणाखाली आणले. (क्रीडा प्रतिनिधी)मुंबई (पहिला डाव) : मांगेला झे. उथप्पा गो. विनय ४, तरे झे. समर्थ गो. गोपाळ ७२, अय्यर झे. गौतम गो. विनय २०, नायर झे. पांड्ये गो. पटेल ३६, यादव पायचीत गो. पटेल १९, लाड झे. गौतम गो. विनय १०६, पाटील झे. पांड्ये गो. अरविंद १०६, ठाकूर झे. उथप्पा गो. पटेल १५, गिरप झे. समर्थ गो. अरविंद २४, हरमीत झे. पायचीत गो. विनय १२, संधू नाबाद ९. अवांतर - १३. एकूण : ११७.१ षटकांत सर्वबाद ४३६ धावा.गोलंदाजी :विनय २३.१-६-८८-४; मिथुन २०-७-७४-०; गोपाळ १५-१-७३-१; अरविंद २७-३-९१-२; पटेल ३१-३-९६-३; समर्थ १-०-२-०.कर्नाटक (पहिला डाव) : उथप्पा पायचीत गो. हरमीत ४९, समर्थ खेळत आहे ८५, कपूर त्रि. गो. गिरप ३५, पांड्ये खेळत आहे ०. अवांतर - ६. एकूण ६० षटकांत २ बाद १७५ धावा.गोलंदाजी : ठाकूर ११-२-४५-०; संधू ७-३-८-०; हरमीत २३-३-६३-१; गिरप १८-०-५३-१; लाड १-०-४-०.