शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

क्रिकेटपेक्षाही कबड्डी लोकप्रिय ठरेल : राकेश

By admin | Updated: September 14, 2016 05:09 IST

कबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे

जयंत कुलकर्णी,  औरंगाबादकबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत क्रिकेटपेक्षाही कबड्डी हा खेळ जास्त लोकप्रिय ठरेल, असा विश्वास कबड्डीचा आघाडीचा खेळाडू राकेश कुमार याने ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.परभणी येथे मंगळवारपासून मराठवाडास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तो औरंगाबादेत विमानतळावर आल्यानंतर त्याने हा विश्वास व्यक्त केला. निजामपूरस्थित राकेश कुमार याची खेळाडू आणि कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय आहे. २००४ आणि २००६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावून देणाऱ्या कबड्डी संघात त्याने निर्णायक योगदान दिले होते. त्याचप्रमाणे त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. मंगळवारी औरंगाबादेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याने ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने संवाद साधला. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना एक ओळख मिळाली असल्याचे राकेश कुमार याचे म्हणणे आहे. तो म्हणाला, ‘‘याआधी आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलो, तरी आम्हाला कोणी ओळखत नव्हते; परंतु प्रो-कबड्डी सुरू झाल्यापासून या खेळाला एक नवीन वलय मिळाले. लोकांमध्ये आमची विशेष ओळख निर्माण झाली आहे. कबड्डी खेळात विशेषत: ग्रामीण आणि मध्यमवर्गीय भागातील खेळाडू असतात. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना आर्थिकदृष्ट्याही मदत झाली आहे आणि त्यामुळेच हा खेळ आता एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. यात फेडरेशनचेही योगदान निश्चित महत्त्वाचे आहे. आता प्रत्येक पालकाचाही ओढा आपला मुलगा कबड्डी खेळावा याकडे वाढला आहे.’’