शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपेक्षाही कबड्डी लोकप्रिय ठरेल : राकेश

By admin | Updated: September 14, 2016 05:09 IST

कबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे

जयंत कुलकर्णी,  औरंगाबादकबड्डी या खेळाची मुळे ही ग्रामीण भागातच रुजली आहेत; परंतु आता या खेळाचा शहरी भागातही प्रसार झाला आहे. पालकांचाही या खेळाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत क्रिकेटपेक्षाही कबड्डी हा खेळ जास्त लोकप्रिय ठरेल, असा विश्वास कबड्डीचा आघाडीचा खेळाडू राकेश कुमार याने ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.परभणी येथे मंगळवारपासून मराठवाडास्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तो औरंगाबादेत विमानतळावर आल्यानंतर त्याने हा विश्वास व्यक्त केला. निजामपूरस्थित राकेश कुमार याची खेळाडू आणि कर्णधार म्हणून कामगिरी उल्लेखनीय आहे. २००४ आणि २००६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावून देणाऱ्या कबड्डी संघात त्याने निर्णायक योगदान दिले होते. त्याचप्रमाणे त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवल्यानंतर २०१० आणि २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाला सुवर्णपदक जिंकून दिले होते. मंगळवारी औरंगाबादेत विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्याने ‘लोकमत’शी मनमोकळेपणाने संवाद साधला. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना एक ओळख मिळाली असल्याचे राकेश कुमार याचे म्हणणे आहे. तो म्हणाला, ‘‘याआधी आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलो, तरी आम्हाला कोणी ओळखत नव्हते; परंतु प्रो-कबड्डी सुरू झाल्यापासून या खेळाला एक नवीन वलय मिळाले. लोकांमध्ये आमची विशेष ओळख निर्माण झाली आहे. कबड्डी खेळात विशेषत: ग्रामीण आणि मध्यमवर्गीय भागातील खेळाडू असतात. प्रो-कबड्डीमुळे खेळाडूंना आर्थिकदृष्ट्याही मदत झाली आहे आणि त्यामुळेच हा खेळ आता एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. यात फेडरेशनचेही योगदान निश्चित महत्त्वाचे आहे. आता प्रत्येक पालकाचाही ओढा आपला मुलगा कबड्डी खेळावा याकडे वाढला आहे.’’