शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जय बिस्टाचे दमदार शतक

By admin | Updated: March 7, 2016 03:15 IST

युवा सलामीवीर जय बिस्टा याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक आणि आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर रणजी चॅम्पियन मुंबईने शेष भारताविरुद्ध इराणी करंडक

मुंबई : युवा सलामीवीर जय बिस्टा याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक आणि आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर रणजी चॅम्पियन मुंबईने शेष भारताविरुद्ध इराणी करंडक क्रिकेट सामन्यातील पहिला दिवस गाजवला. दिवसअखेर त्यांनी ३ बाद ३८६, अशी धावसंख्या रचत धावांचा डोंगर उभारण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांच्या मजबूत फलंदाजीसमोर शेष भारताचे गोलंदाज बळी मिळविण्यासाठी तरसत असल्याचे दिसून आले. मुंबईच्या फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेताना त्यांना वर्चस्व मिळवू दिले नाही. तसेच, पहिल्याच दिवशी मुंबईच्या फलंदाजांनी २४८ धावा या फक्त चौकार आणि षटकारांनी ठोकल्या.सी.के. नायडू अंडर २३ स्पर्धेच्या फायनलमध्ये द्विशतक ठोकून मुंबईच्या सिनिअर संघात पुनरागमन करणारा बिस्टाने ९० चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह १०४ धावा केल्या आणि पहिल्या गड्यासाठी अखिल हेरवाडकर (९०) याच्या साथीने १९३ धावांची भागीदारी करताना संघाला शानदार सुरुवात करून दिली. हेरवाडकरने १४८ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार मारले. हे दोघे १६ धावांच्या अंतरात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (५५) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ८८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी करताना मुंबईची स्थिती आणखी मजबूत केली. स्टुअर्ट बिन्नीने अय्यरला बाद करीत ही भागीदारी मोडली. श्रेयस अय्यरने ४९ चेंडूंत १० चौकार मारले. त्यानंतर सूर्यकुमार यादवला आदित्य तारेच्या रूपाने चांगला साथीदार मिळाला. तारे ३८ धावांवर खेळत आहे. या दोघांनी आतापर्यंत चौथ्या गड्यासाठी नाबाद ११४ धावांची भागीदारी केली आहे. सूर्यकुमार यादवने १२५ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार व एक षटकार मारला, तर आदित्य तारे याने ८६ चेंडूंत ४ चौकार मारले. शेष भारताकडून बिन्नी, अंकित राजपूत आणि कृष्णा दास यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.