शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रनआउट झाल्यावर जडेजाचा राग आला होता पण...हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया

By admin | Updated: July 5, 2017 21:06 IST

पाकिस्तान विरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्फोटक फलंदाजी करुन अष्टपैलू हार्दिक पांड्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.

ऑनलाइन लोकमत
किंगस्टन, दि. 5 - पाकिस्तान विरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्फोटक फलंदाजी करुन अष्टपैलू हार्दिक पांड्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, रविंद्र जडेजासोबत चोरटी धाव घेताना दोघांचा ताळमेळ चुकला आणि पांड्या बाद झाला त्यासोबत भारताच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. त्यानंतर पराभवामुळे आधीच चिडलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून जडेजावर रोष व्यक्त केला होता. जडेजाची खिल्ली उडवणारे अनेक जोक्स व्हायरल झाले. अखेर त्या घटनेबाबत स्वतः हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे.  
 
धावबाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाचा राग आला होता पण तो केवळ फक्त तीनच मिनिटं, असं भारताचा वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्यानं म्हटलं आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध होणा-या पाचव्या सामन्यापूर्वी तो बोलत होता. धावबाद झाल्यानंतर मैदानावर दिसलेली आलेली माझी प्रतिक्रिया म्हणजे केवळ संताप होता. मी असाच आहे, मला पटकन राग येतो पण थोड्याच वेळात ते विसरून मी हसायला लागतो. त्या दिवशीही तेच झालं, बाद झाल्यावर मी ड्रेसींग रूममध्ये गेलो तेव्हा मी खूप उदास होतो, पण थोड्याच वेळात मी हसायला लागलो. त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेले इतरही माझ्याकडे रोखून बघत होते पण माझ्या प्रतिक्रियेमुळे तेही हसायला लागले. कारण खरंच बाद झाल्यावर माझी प्रतिक्रिया विचित्रच होती. तो राग केवळ तीन मिनिटांसाठीच होता. हे सर्व खेळाचा एक भाग असतं आणि खेळाडूला हे सर्व विसरून पुढे जायला लागतं. अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली. 
 
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात एका बाजूला फलंदाज बाद होत असताना पांड्याने स्फोटक फलंदाजी करुन भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र जडेजा आणि पांड्याचा परस्परांतील ताळमेळ चुकल्याने पांड्या धावबाद झाला होता. त्यावेळी 46 बॉलमध्ये 76 धावांवर पांड्या खेळत होता. 
 
या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतावर 180 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या सोबतच त्यांनी चॅम्पियन्सचा चषकही आपल्या नावे केला. 
 
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावरही बरीच टीका झाली होती. 
तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली असती- गिलख्रिस्ट
मुर्दाड खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन विराट कोहलीने काही चूक केले नाही; परंतु आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसारख्या मोठ्या लढतीत प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य पर्याय असतो, असे सांगितले. मोठ्या फायलनमध्ये आॅस्ट्रेलियाचा आधीचा संघ असता तर त्यांनी प्रथम फलंदाजी करणे पसंत केल असते. मोठी धावसंख्या रचून प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकण्याकडे आॅस्ट्रेलियाचा कल असता. तथापि, भारताने जास्त सामने ही लक्ष्याचा पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे विराटच्या निर्णयावर तुम्ही टीका करू शकत नाही. फखरचा उडालेला झेल नोबॉल चेंडूवर उडाला नसता तर वेगळे चित्र असते, असे गिलख्रिस्ट म्हणाला.