शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

रनआउट झाल्यावर जडेजाचा राग आला होता पण...हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया

By admin | Updated: July 5, 2017 21:06 IST

पाकिस्तान विरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्फोटक फलंदाजी करुन अष्टपैलू हार्दिक पांड्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या.

ऑनलाइन लोकमत
किंगस्टन, दि. 5 - पाकिस्तान विरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्फोटक फलंदाजी करुन अष्टपैलू हार्दिक पांड्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र, रविंद्र जडेजासोबत चोरटी धाव घेताना दोघांचा ताळमेळ चुकला आणि पांड्या बाद झाला त्यासोबत भारताच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या होत्या. त्यानंतर पराभवामुळे आधीच चिडलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून जडेजावर रोष व्यक्त केला होता. जडेजाची खिल्ली उडवणारे अनेक जोक्स व्हायरल झाले. अखेर त्या घटनेबाबत स्वतः हार्दिक पांड्याने प्रतिक्रिया दिली आहे.  
 
धावबाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाचा राग आला होता पण तो केवळ फक्त तीनच मिनिटं, असं भारताचा वेगवान गोलंदाज हार्दिक पांड्यानं म्हटलं आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध होणा-या पाचव्या सामन्यापूर्वी तो बोलत होता. धावबाद झाल्यानंतर मैदानावर दिसलेली आलेली माझी प्रतिक्रिया म्हणजे केवळ संताप होता. मी असाच आहे, मला पटकन राग येतो पण थोड्याच वेळात ते विसरून मी हसायला लागतो. त्या दिवशीही तेच झालं, बाद झाल्यावर मी ड्रेसींग रूममध्ये गेलो तेव्हा मी खूप उदास होतो, पण थोड्याच वेळात मी हसायला लागलो. त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेले इतरही माझ्याकडे रोखून बघत होते पण माझ्या प्रतिक्रियेमुळे तेही हसायला लागले. कारण खरंच बाद झाल्यावर माझी प्रतिक्रिया विचित्रच होती. तो राग केवळ तीन मिनिटांसाठीच होता. हे सर्व खेळाचा एक भाग असतं आणि खेळाडूला हे सर्व विसरून पुढे जायला लागतं. अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने दिली. 
 
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात एका बाजूला फलंदाज बाद होत असताना पांड्याने स्फोटक फलंदाजी करुन भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र जडेजा आणि पांड्याचा परस्परांतील ताळमेळ चुकल्याने पांड्या धावबाद झाला होता. त्यावेळी 46 बॉलमध्ये 76 धावांवर पांड्या खेळत होता. 
 
या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतावर 180 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या सोबतच त्यांनी चॅम्पियन्सचा चषकही आपल्या नावे केला. 
 
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयावरही बरीच टीका झाली होती. 
तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली असती- गिलख्रिस्ट
मुर्दाड खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन विराट कोहलीने काही चूक केले नाही; परंतु आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसारख्या मोठ्या लढतीत प्रथम फलंदाजी करण्याचा योग्य पर्याय असतो, असे सांगितले. मोठ्या फायलनमध्ये आॅस्ट्रेलियाचा आधीचा संघ असता तर त्यांनी प्रथम फलंदाजी करणे पसंत केल असते. मोठी धावसंख्या रचून प्रतिस्पर्ध्यावर दबाव टाकण्याकडे आॅस्ट्रेलियाचा कल असता. तथापि, भारताने जास्त सामने ही लक्ष्याचा पाठलाग करून जिंकले आहेत. त्यामुळे विराटच्या निर्णयावर तुम्ही टीका करू शकत नाही. फखरचा उडालेला झेल नोबॉल चेंडूवर उडाला नसता तर वेगळे चित्र असते, असे गिलख्रिस्ट म्हणाला.