शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

दीर्घकाळ अव्वल स्थान टिकविणे सोपे नाही : सायना

By admin | Updated: April 17, 2015 23:54 IST

आत्मविश्वासाच्या बळावर अधिकाधिक काळ आपण हे स्थान टिकविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणार असल्याचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचे मत आहे.

बंगळुरू : विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर दीर्घकाळ विराजमान राहणे कठीण आहे; पण आत्मविश्वासाच्या बळावर अधिकाधिक काळ आपण हे स्थान टिकविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणार असल्याचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचे मत आहे.नंबर वन स्थान काबीज करणे सोपे नाही, असे सांगून सायना म्हणाली, ‘‘या पदावर विराजमान होणारी मी पहिली भारतीय खेळाडू आहे, हे चाहत्यांनी समजून घ्यावे. मी चांगला सराव करीत राहिले, तर दीर्घकाळ हे स्थान माझयाकडे राहू शकते. देशासाठी जास्तीत जास्त जेतीपदे जिंकण्याचा प्रयत्न राहील.’’अव्वल स्थानाच्या शर्यतीत कोणत्या खेळाडूकडून आव्हान मिळू शकते, असे विचारताच सायना म्हणाली, ‘‘चीनची ली शुरुई ही माझी कडवी प्रतिस्पर्धी आहे. माझ्यासाठी सर्वच खेळाडू प्रतिस्पर्धी आहेत. मी कोणाएकाचे नाव घेणार नाही; पण शुरुई निकटची प्रतिस्पर्धी असेल. तिच्याकडे कमी स्पर्धा असल्याने ती पुन्हा अव्वल स्थानावर येऊ शकते.’’अव्वल स्थान पटकावल्यानंतर माजी कोच पुलेला गोपीचंद यांचा फोन आला का, असे विचारताच ती म्हणाली, ‘‘स्पर्धेव्यतिरिक्त आमच्यात कुठलीही चर्चा होत नाही. आम्ही सरावावर फोकस करीत असल्याने स्पर्धा वगळता कशावरही चर्चा करीत नाही. इतकी वर्षे कोच राहिल्याने त्यांनी मला अनेक चांगल्या गोष्टी शिकविल्या. वेगळा सराव करीत असल्याने मतभेद होतात; पण ते आपले काम करीत आहेत, मी आपल्या सरावात व्यस्त आहे.’’सायनाने सध्याच्या यशाचे श्रेय बंगळुरु येथील कोच विमलकुमार यांना दिले. ती म्हणाली, ‘‘विमलसरांमुळे मला सकारात्मक निकाल मिळाले. अव्वल स्थानावर पोहोचेन याबद्दल खात्री नव्हती; पण त्यांनी विजयाची भूक निर्माण केली. सतत जिंकत राहशील तर रँकिंग आपोआप सुधारेल, असे ते सांगायचे.’’पद्म पुरस्काराच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरही आपल्या नावाचा विचार करण्यात आला नाही, याबद्दल खेद नसल्याचे सायनाने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ती म्हणाली, की काही चुकीचे होत आहे असे त्या वेळी वाटल्याने मी प्रतिक्रिया दिली होती; पण पुरस्कार न मिळाल्याची खंत नाही. पुढच्या वर्षीच्या पद्म पुरस्काराबद्दल विचारताच ती म्हणाली, ‘‘याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. अनेकदा खेळाडू बोलताना भावुक होतात. मला कुठल्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. वारंवार भाष्य करणे योग्य नाही. सरकार खेळाडूंच्या पाठीशी असल्याने आम्ही भविष्याकडे लक्ष देत आहोत.’’ (वृत्तसंस्था)...म्हणून गोपी सरांना सोडलेगोपीचंदसोबत मतभेद होण्याचे कारण काय, या प्रश्नाच्या उत्तरात सायनाने सांगितले, की कोर्टवर खेळल्यानंतर जे डावपेच आखले जात होते, ते सामन्यादरम्यान कुचकामी ठरत असल्याने मी सर्वोत्कष्ट खेळाडूंकडून पराभूत होत असे. मी हे ध्यानात आणून दिले; पण काहीही लाभ होत नव्हता. माझ्या खेळाला वेगळे डावपेच हवे होते. प्रत्येक कोच खेळातील बारकावे समजून घेईल, असे नाही. अनेकदा एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर सुधारणा कशी करायची, हे कोचला समजत नाही. नेमक्या याच कारणास्तव मी विभक्त झाले.’