शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

दीर्घकाळ अव्वल स्थान टिकविणे सोपे नाही : सायना

By admin | Updated: April 17, 2015 23:54 IST

आत्मविश्वासाच्या बळावर अधिकाधिक काळ आपण हे स्थान टिकविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणार असल्याचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचे मत आहे.

बंगळुरू : विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर दीर्घकाळ विराजमान राहणे कठीण आहे; पण आत्मविश्वासाच्या बळावर अधिकाधिक काळ आपण हे स्थान टिकविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करणार असल्याचे बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचे मत आहे.नंबर वन स्थान काबीज करणे सोपे नाही, असे सांगून सायना म्हणाली, ‘‘या पदावर विराजमान होणारी मी पहिली भारतीय खेळाडू आहे, हे चाहत्यांनी समजून घ्यावे. मी चांगला सराव करीत राहिले, तर दीर्घकाळ हे स्थान माझयाकडे राहू शकते. देशासाठी जास्तीत जास्त जेतीपदे जिंकण्याचा प्रयत्न राहील.’’अव्वल स्थानाच्या शर्यतीत कोणत्या खेळाडूकडून आव्हान मिळू शकते, असे विचारताच सायना म्हणाली, ‘‘चीनची ली शुरुई ही माझी कडवी प्रतिस्पर्धी आहे. माझ्यासाठी सर्वच खेळाडू प्रतिस्पर्धी आहेत. मी कोणाएकाचे नाव घेणार नाही; पण शुरुई निकटची प्रतिस्पर्धी असेल. तिच्याकडे कमी स्पर्धा असल्याने ती पुन्हा अव्वल स्थानावर येऊ शकते.’’अव्वल स्थान पटकावल्यानंतर माजी कोच पुलेला गोपीचंद यांचा फोन आला का, असे विचारताच ती म्हणाली, ‘‘स्पर्धेव्यतिरिक्त आमच्यात कुठलीही चर्चा होत नाही. आम्ही सरावावर फोकस करीत असल्याने स्पर्धा वगळता कशावरही चर्चा करीत नाही. इतकी वर्षे कोच राहिल्याने त्यांनी मला अनेक चांगल्या गोष्टी शिकविल्या. वेगळा सराव करीत असल्याने मतभेद होतात; पण ते आपले काम करीत आहेत, मी आपल्या सरावात व्यस्त आहे.’’सायनाने सध्याच्या यशाचे श्रेय बंगळुरु येथील कोच विमलकुमार यांना दिले. ती म्हणाली, ‘‘विमलसरांमुळे मला सकारात्मक निकाल मिळाले. अव्वल स्थानावर पोहोचेन याबद्दल खात्री नव्हती; पण त्यांनी विजयाची भूक निर्माण केली. सतत जिंकत राहशील तर रँकिंग आपोआप सुधारेल, असे ते सांगायचे.’’पद्म पुरस्काराच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतरही आपल्या नावाचा विचार करण्यात आला नाही, याबद्दल खेद नसल्याचे सायनाने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ती म्हणाली, की काही चुकीचे होत आहे असे त्या वेळी वाटल्याने मी प्रतिक्रिया दिली होती; पण पुरस्कार न मिळाल्याची खंत नाही. पुढच्या वर्षीच्या पद्म पुरस्काराबद्दल विचारताच ती म्हणाली, ‘‘याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. अनेकदा खेळाडू बोलताना भावुक होतात. मला कुठल्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. वारंवार भाष्य करणे योग्य नाही. सरकार खेळाडूंच्या पाठीशी असल्याने आम्ही भविष्याकडे लक्ष देत आहोत.’’ (वृत्तसंस्था)...म्हणून गोपी सरांना सोडलेगोपीचंदसोबत मतभेद होण्याचे कारण काय, या प्रश्नाच्या उत्तरात सायनाने सांगितले, की कोर्टवर खेळल्यानंतर जे डावपेच आखले जात होते, ते सामन्यादरम्यान कुचकामी ठरत असल्याने मी सर्वोत्कष्ट खेळाडूंकडून पराभूत होत असे. मी हे ध्यानात आणून दिले; पण काहीही लाभ होत नव्हता. माझ्या खेळाला वेगळे डावपेच हवे होते. प्रत्येक कोच खेळातील बारकावे समजून घेईल, असे नाही. अनेकदा एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर सुधारणा कशी करायची, हे कोचला समजत नाही. नेमक्या याच कारणास्तव मी विभक्त झाले.’