शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

बाद फेरी गाठणे अशक्य नाही- बायचुंग भूतिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:20 IST

‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले.

मुंबई : ‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले.पुढील महिन्यात रशियात सुरु होत असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी अधिकृत प्रसारण वाहिनीच्या ‘मेरी दुसरी कंट्री’ या उपक्रमाचे भूतियाच्या उपस्थितीत घोषणा झाली. यावेळी भुतियाने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, ‘भारताला आशिया चषकासाठी जो ‘अ’ गट मिळाला आहे, त्यासाठी आपण स्वत:ला भाग्यशाली मानले पाहिजे. आपण जागतिक क्रमवारीत चांगले स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्याने आपल्याला असा गट मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय संघाला जाते.’ आशिया चषकासाठी भारतीय संघाचा ‘अ’ गटात समावेश असून या गटात बहारीन, थायलंड आणि यजमान संयुक्त अरब अमिराती यांचाही समावेश आहे.तसेच, ‘आशिया चषक स्पर्धेत काहीच सहजसोपे साध्य होणार नाही. येथे प्रत्येक संघ त्वेशाने खेळेल. तरीही २०११ च्या तुलनेत यंदा भारताला मिळाला गट खूप दिलासादायक आहे. आपण नशिबवान आहोत की, गटात कोरिया, इराण, इराक आणि जपान यांच्यासारखे आशियाई महाशक्ती संघाचा समावेश नाही. खेळाडूंच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळाली, तर नक्कीच भारतीय संघ चमकदार आगेकूच करु शकेल,’ असेही भूतियाने म्हटले.

टॅग्स :Footballफुटबॉल