शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

देशात क्रीडा संस्कृतीला चालना देणे आवश्यक, तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील - अभिनव बिंद्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:04 IST

योग्य तयारी, संयम आणि विजयाची भूक ही यशाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यात आली तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : योग्य तयारी, संयम आणि विजयाची भूक ही यशाची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यात आली तरच भविष्यातील चॅम्पियन पुढे येतील, असे मत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केले आहे.बीजिंग आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण विजेता अभिनव म्हणाला,‘क्रीडा संस्कृती, योग्य माहिती तसेच आधुनिक पायाभूत सुविधांअभावी चॅम्पियन घडू शकणार नाहीत. क्रीडा संस्कृतीची सुरुवात तर मातापित्यापासूनच व्हायला हवी. आईवडिलांनी आठवड्यातून किमान एक दिवस मुलांसोबत खेळावे. सिनेमा पाहणे, फिरायला जाण्यापेक्षा सामन्याला हजेरी लावल्याने खेळांचे महत्त्व मुलांच्या मनावर बालपणापासून रुजेल.’नीती आयोगाने आयोजित केलेल्या सोहळ्यात बिंद्राने स्वत:च्या आॅलिम्पिक प्रवासाचे पुनरावलोकन केले. तो म्हणाला,‘क्रीडा संस्कृतीसोबतच कोचिंग, सराव, उपकरणे आणि आहाराची माहिती हवीच शिवाय आधुनिक पायाभूत सुविधादेखील हव्यात. मी देशात सराव करण्याच्या बाजूने होतो पण योग्य सुविधा नसल्याने देशाबाहेर जावे लागायचे. खेळाडू लालफितशाहीत अडकणार नाहीत, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. महाशक्ती असलेल्या चीनने समजले तसे आॅलिम्पिक खेळाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल.’२००० च्या सिडनी आॅलिम्पिकमध्ये कमी वयात पदार्पण केल्यानंतर अथेन्स आॅलिम्पिकमध्ये तो सातव्या स्थानी राहिला. २००८ ला बीजिंगमध्ये सुवर्ण जिंकले तर २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये पदकाने त्याला हुलकावणी दिली होती. तो म्हणाला,‘अथेन्स आॅलिम्पिकने मला सावध केले. अंधूक प्रकाशात नेम साधण्याचा प्रयत्न करीत अनुभवातून सज्ज झालो. रिओ आॅलिम्पिकपूर्वी मी जर्मनीत सरावादरम्यान शरीराचे विश्लेषण करणारे ‘टेक्नो बॉडी’ हे पोर्टेबल यंत्र पाहिले. मी हे यंत्र खरेदी केले तेव्हा शरीराची रचना समजण्यास मदत झाली.’निवृत्तीचा निर्णय घाईत घेतला का, असे विचारताच बिंद्राचे उत्तर होते... नाही! तो म्हणाला,‘मी पुढील आॅलिम्पिक खेळू शकलो असतो पण आता थांबायला हवे, असे मनात आले व ते स्वीकारले. खेळ सोडल्याचे दु:ख नाही. तब्बल २२ वर्षे नेमबाजी हेच माझे आयुष्य होते. आता खासगी आयुष्यात व्यस्त आहे. भारतीय नेमबाजांचे भविष्य उज्ज्वल आहे. नेमबाजांची आॅलिम्पिकपर्यंत वाटचाल सोपी व्हावी अशा गोष्टी कराव्या लागतील.’(वृत्तसंस्था)अपयशातून यशाचा मार्ग...२२ वर्षांच्या करियरमध्ये पाच आॅलिम्पिकचा अनुभव असलेला बिंद्रा यंदा रिओ आॅलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर घसरताच नेमबाजीतून निवृत्ती जाहीर केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी अपयशातून यशाचा मार्ग शोधण्यास आपले प्राधान्य राहिले, असे बिंद्राचे मत आहे.