शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकन खेळाडूंसोबत ईशांतची वादावादी

By admin | Updated: September 1, 2015 00:08 IST

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला. ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ७६व्या आणि अखेरच्या षटकादरम्यान घडली. या षटकात धम्मिका प्रसाद गोलंदाजी करीत होता. प्रसादने ईशांतला बाउन्सरचा मारा केला. ईशांतने डक करीत बाउन्सर सोडून दिले. त्यानंतर ईशांत गोलंदाजाकडे बघून हसला. त्यामुळे प्रसादला राग अनावर झाला आणि त्याने या षटकात तिसरा बाउन्सर टाकला. नियमानुसार एक षटकात तीन बाउन्सर टाकता येत नाहीत. पंचांनी तो नोबॉल ठरविला. षटकात दोन बाउन्सर टाकणाऱ्या प्रसादने त्यानंतर यष्टीच्या रोखाने चेंडू टाकला. त्यावर ईशांतने पॉर्इंटच्या दिशेला एक धाव वसूल केली. ईशांत धाव घेताना प्रसादच्या जवळून गेला, त्या वेळी गोलंदाजाने काही टिप्पणी केली. त्यामुळे ईशांत पुन्हा एकदा गोलंदाजाकडे गेला. प्रसाद व ईशांत यांच्यादरम्यान वाद सुरू असताना दिनेश चांदीमलने भारतीय फलंदाजाला मुद्दाम धक्का दिला आणि काहीतरी पुटपुटत तेथून गेला. त्यामुळे दुसऱ्या टोकावर असलेला भारतीय फलंदाज रविचंद्र आश्विन नाराज झाला. आश्विनने पंच रॉड टकर आणि नायजेल लाँग यांचे लक्ष या घटनेकडे वेधले. त्यानंतर पंचांनी श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला आपल्या खेळाडूंना शांत करण्याची सूचना केली. भारत आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये मैदानावर झालेला वादावादीचा प्रकार खेळासाठी चांगला नाही. या अशा काही घटना असतात, त्या कोणालाही पाहाव्या वाटत नाहीत. मैदानावर केवळ खेळाचा आनंद घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडू हे लहान मुलांचे रोल मॉडेल असतात. लहान मुलेदेखील असे सामने पाहत असतात. अशा घटनांमुळे जर एखाद्या पालकाला मुलाने खेळाकडे वळूच नये, असे वाटू शकते. - सुनील गावसकरभारतीय संघाचे माजी कर्णधार