शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

श्रीलंकन खेळाडूंसोबत ईशांतची वादावादी

By admin | Updated: September 1, 2015 00:08 IST

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला. ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ७६व्या आणि अखेरच्या षटकादरम्यान घडली. या षटकात धम्मिका प्रसाद गोलंदाजी करीत होता. प्रसादने ईशांतला बाउन्सरचा मारा केला. ईशांतने डक करीत बाउन्सर सोडून दिले. त्यानंतर ईशांत गोलंदाजाकडे बघून हसला. त्यामुळे प्रसादला राग अनावर झाला आणि त्याने या षटकात तिसरा बाउन्सर टाकला. नियमानुसार एक षटकात तीन बाउन्सर टाकता येत नाहीत. पंचांनी तो नोबॉल ठरविला. षटकात दोन बाउन्सर टाकणाऱ्या प्रसादने त्यानंतर यष्टीच्या रोखाने चेंडू टाकला. त्यावर ईशांतने पॉर्इंटच्या दिशेला एक धाव वसूल केली. ईशांत धाव घेताना प्रसादच्या जवळून गेला, त्या वेळी गोलंदाजाने काही टिप्पणी केली. त्यामुळे ईशांत पुन्हा एकदा गोलंदाजाकडे गेला. प्रसाद व ईशांत यांच्यादरम्यान वाद सुरू असताना दिनेश चांदीमलने भारतीय फलंदाजाला मुद्दाम धक्का दिला आणि काहीतरी पुटपुटत तेथून गेला. त्यामुळे दुसऱ्या टोकावर असलेला भारतीय फलंदाज रविचंद्र आश्विन नाराज झाला. आश्विनने पंच रॉड टकर आणि नायजेल लाँग यांचे लक्ष या घटनेकडे वेधले. त्यानंतर पंचांनी श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला आपल्या खेळाडूंना शांत करण्याची सूचना केली. भारत आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये मैदानावर झालेला वादावादीचा प्रकार खेळासाठी चांगला नाही. या अशा काही घटना असतात, त्या कोणालाही पाहाव्या वाटत नाहीत. मैदानावर केवळ खेळाचा आनंद घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडू हे लहान मुलांचे रोल मॉडेल असतात. लहान मुलेदेखील असे सामने पाहत असतात. अशा घटनांमुळे जर एखाद्या पालकाला मुलाने खेळाकडे वळूच नये, असे वाटू शकते. - सुनील गावसकरभारतीय संघाचे माजी कर्णधार