शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

श्रीलंकन खेळाडूंसोबत ईशांतची वादावादी

By admin | Updated: September 1, 2015 00:08 IST

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला. ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ७६व्या आणि अखेरच्या षटकादरम्यान घडली. या षटकात धम्मिका प्रसाद गोलंदाजी करीत होता. प्रसादने ईशांतला बाउन्सरचा मारा केला. ईशांतने डक करीत बाउन्सर सोडून दिले. त्यानंतर ईशांत गोलंदाजाकडे बघून हसला. त्यामुळे प्रसादला राग अनावर झाला आणि त्याने या षटकात तिसरा बाउन्सर टाकला. नियमानुसार एक षटकात तीन बाउन्सर टाकता येत नाहीत. पंचांनी तो नोबॉल ठरविला. षटकात दोन बाउन्सर टाकणाऱ्या प्रसादने त्यानंतर यष्टीच्या रोखाने चेंडू टाकला. त्यावर ईशांतने पॉर्इंटच्या दिशेला एक धाव वसूल केली. ईशांत धाव घेताना प्रसादच्या जवळून गेला, त्या वेळी गोलंदाजाने काही टिप्पणी केली. त्यामुळे ईशांत पुन्हा एकदा गोलंदाजाकडे गेला. प्रसाद व ईशांत यांच्यादरम्यान वाद सुरू असताना दिनेश चांदीमलने भारतीय फलंदाजाला मुद्दाम धक्का दिला आणि काहीतरी पुटपुटत तेथून गेला. त्यामुळे दुसऱ्या टोकावर असलेला भारतीय फलंदाज रविचंद्र आश्विन नाराज झाला. आश्विनने पंच रॉड टकर आणि नायजेल लाँग यांचे लक्ष या घटनेकडे वेधले. त्यानंतर पंचांनी श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला आपल्या खेळाडूंना शांत करण्याची सूचना केली. भारत आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये मैदानावर झालेला वादावादीचा प्रकार खेळासाठी चांगला नाही. या अशा काही घटना असतात, त्या कोणालाही पाहाव्या वाटत नाहीत. मैदानावर केवळ खेळाचा आनंद घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडू हे लहान मुलांचे रोल मॉडेल असतात. लहान मुलेदेखील असे सामने पाहत असतात. अशा घटनांमुळे जर एखाद्या पालकाला मुलाने खेळाकडे वळूच नये, असे वाटू शकते. - सुनील गावसकरभारतीय संघाचे माजी कर्णधार