शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

ईशांत

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

ईशांत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा आठवा भारतीय गोलंदाज

ईशांत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा आठवा भारतीय गोलंदाज
कोलंबो : ईशांत शर्माने आज श्रीलंकेचा कर्णधार ॲन्जेलो मॅथ्यूजला बाद करीत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा पल्ला गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ईशांत भारताचा आठवा गोलंदाज ठरला आहे. कारकिर्दीतील ६५ वा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांतने तिसऱ्या कसोटी सामन्यात चहापानाच्या विश्रांतीनंतर मॅथ्यूजला पायचित करीत कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी घेतला. त्याला त्यासाठी अशी कामगिरी करणाऱ्या अन्य भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत अधिक सामने खेळावे लागले. यापूर्वी जहीर खानने ६३ सामन्यांत २०० बळींचा टप्पा गाठला आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १०२ व्या, विंडीजच्या गॅरी सोबर्सने ८० व्या आणि इंग्लंडच्या ॲण्ड्य्रू फ्लिन्टॉफने ६९ व्या सामन्यात २०० वा बळी घेतला होता, पण हे तीन्ही स्पेशालिस्ट गोलंदाज नव्हते. संघामध्ये त्यांची भूमिका अष्टपैलू म्हणून होती.
ईशांतपूर्वी भारतातर्फे ज्या गोलंदाजांनी २०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत त्यात अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजनसिंग (४१७), जहीर खान (३११), बिशनसिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि जवागल श्रीनाथ (२३६) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)