शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

ईशांत

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

ईशांत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा आठवा भारतीय गोलंदाज

ईशांत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा आठवा भारतीय गोलंदाज
कोलंबो : ईशांत शर्माने आज श्रीलंकेचा कर्णधार ॲन्जेलो मॅथ्यूजला बाद करीत कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळींचा पल्ला गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ईशांत भारताचा आठवा गोलंदाज ठरला आहे. कारकिर्दीतील ६५ वा कसोटी सामना खेळणाऱ्या ईशांतने तिसऱ्या कसोटी सामन्यात चहापानाच्या विश्रांतीनंतर मॅथ्यूजला पायचित करीत कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी घेतला. त्याला त्यासाठी अशी कामगिरी करणाऱ्या अन्य भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत अधिक सामने खेळावे लागले. यापूर्वी जहीर खानने ६३ सामन्यांत २०० बळींचा टप्पा गाठला आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १०२ व्या, विंडीजच्या गॅरी सोबर्सने ८० व्या आणि इंग्लंडच्या ॲण्ड्य्रू फ्लिन्टॉफने ६९ व्या सामन्यात २०० वा बळी घेतला होता, पण हे तीन्ही स्पेशालिस्ट गोलंदाज नव्हते. संघामध्ये त्यांची भूमिका अष्टपैलू म्हणून होती.
ईशांतपूर्वी भारतातर्फे ज्या गोलंदाजांनी २०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेतले आहेत त्यात अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजनसिंग (४१७), जहीर खान (३११), बिशनसिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि जवागल श्रीनाथ (२३६) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)