शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

इशांत शर्माला १०२ चेंडूत नाही मिळाला एकही बळी

By admin | Updated: May 12, 2017 23:44 IST

ईशांत शर्माने आयपीएल १० मध्ये आपल्या कामगिरीचा निचांक नोंदवला आहे. त्याने पाच सामन्यात १०२ चेंडू टाकले मात्र त्याला अजूनपर्यंत एकही बळी घेता आलेला नाही.

ऑनलाईन लोकमत 
मुंबई, दि. 12 - ईशांत शर्माने आयपीएल १० मध्ये आपल्या कामगिरीचा निचांक नोंदवला आहे. त्याने पाच सामन्यात १०२ चेंडू टाकले मात्र त्याला अजूनपर्यंत एकही बळी घेता आलेला नाही. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत १६७ धावा मात्र दिल्या आहेत. पंजाबने दोन कोटी रुपयांत विकत घेतलेल्या इशांत शर्माने संघासाठी एक बळी घेतलेले नाही.
 
ईशांतला यास्पर्धेत सुरूवातीला संघात विकत घेण्यास कुणीही उत्सुक नव्हते. फेब्रुवारीत झालेल्या लिलावात त्याच्यावर कोणत्याही फ्रांचायझीने बोली लावली नव्हती. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबने अखेरच्या क्षणी त्याच्या बेस प्राईज दोन कोटी रुपयांत त्याला घेतले. त्याने पहिला सामना १३ एप्रिलला केकेआर विरोधात खेळला त्यात त्याने दोन षटकांत १६ धावा दिल्या.
 
त्यानंतरच्या सामन्यात १७ एप्रिलला सनरायजर्स विरोधात ४ षटकांत फक्त २३ धावा दिल्या. मात्र त्याला बळी मिळाला नाही. २० एप्रिलला मुंबई इंडियन्सने ईशांतच्या चार षटकांत तब्बल ५८ धावा कुटल्या. आयपीएलच्या या सत्रातील ही दुस-या क्रमांकाची कामगिरी ठरली. एका
 
सामन्यात सर्वात जास्त धावा देण्याची निचांकी कामगिरी कासिगो रबाडा आणि पॅट कमिन्स या दिल्लीच्या शिलेदारांनी केली आहे. दोघांनी आपआपल्या ४ षटकांत तब्बल ५९ धावा मोजल्या. त्यानंतर २८ एप्रिलला सनरायजर्सने ईशांतच्या चार षटकांत ४१ धावा कुटल्या. तर ११ मे रोजी इशांत मुंबई विरोधात खेळला त्याने तीन षटकांत २९ धावा दिल्या. मात्र त्याला एकही बळी मिळालेला नाही.