शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास

By admin | Updated: May 11, 2016 02:42 IST

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात.

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात. कर्णधार प्रतिस्पर्धी फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यासाठी सातत्याने गोलंदाजीमध्ये बदल करीत असतो. फलंदाजांना अंदाज येऊ नये, यासाठी गोलंदाजही गोलंदाजी करताना दिशा व टप्पा यामध्ये बदल करीत असतो. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक डावाची तीन टप्प्यांत विभागणी होते. १ ते ६ षटकांदरम्यान पॉवर प्ले, ७ ते १५ षटकांदरम्यान मध्य डाव आणि १६ ते २० षटकांदरम्यान डेथ ओव्हर्स. त्यात सहभागी आठ संघ खेळाच्या प्रत्येक विभागात कशा प्रकारची रणनीती वापरतात, याची उत्सुकता आहे. सुरुवातीची सहा षटके गोलंदाजांच्या बचावाची असतात. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असताना तुम्ही त्या वेळी धावगतीवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करता. काही कर्णधार पॉवर प्लेमध्येही आक्रमक क्षेत्ररक्षण सजवून विकेट मिळवण्यास पसंती देतात. पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवाला मिळणे स्वाभाविक झाले आहे. अशा परिस्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीपासून रोखणे महत्त्वाचे ठरते. मधल्या षटकांमध्ये उभय संघ खेळाचे स्वरूप समजून घेण्यास प्रयत्नशील असतात आणि लय मिळवण्याची संधी शोधत असतात. या षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचे लक्ष स्कोअर वाढविण्यावर असते, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा भर धावा रोखण्यावर असतो. या कालावधीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारापुढे केव्हा आक्रमक पवित्रा स्वीकारायचा, याचे आव्हान असते. जर आक्रमक पवित्रा स्वीकारला तर विकेट मिळवता येतात आणि मोठी भागीदारीही संपुष्टात आणता येते. योग्य वेळी आक्रमण झाले तर विजय तुमचा आणि निर्णय चुकला तर पराभव निश्चित असतो. डेथ ओव्हर्स म्हणजे बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे असतात. तेथे वेगाने चाल खेळणे आवश्यक असते. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार करता डेथ ओव्हर्समध्ये पारंपरिक क्रिकेटच्या फटक्यांच्या माध्यमातून धावा वसूल करणे प्रभावी ठरते. गरजेपेक्षा अधिक वेगळा प्रयत्न करून काही चौकार-षटकार वसूल करता येतात, पण त्या प्रयत्नात अधिक डॉट चेंडू खेळले जातात. डावाच्या या टप्प्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा गोलंदाज व कर्णधार यांच्यादरम्यान प्रभावी संवाद असणे आवश्यक ठरते. गोलंदाजी कुठे करायची, हे निश्चित झाल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवता येते. अखेरच्या टप्प्यात फलंदाज बॅट फिरवत असताना रणनीती व योजना कशा अपयशी ठरतात, याबाबत उत्सुकता असते. अखेर प्रत्येक टप्प्याचा विचार केल्यानंतर शेवटी योजना आखणारा आणि दडपणाखालीही त्या यशस्वी करणारा संघ विजयी ठरतो. (टीसीएम)