शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास

By admin | Updated: May 11, 2016 02:42 IST

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात.

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात. कर्णधार प्रतिस्पर्धी फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यासाठी सातत्याने गोलंदाजीमध्ये बदल करीत असतो. फलंदाजांना अंदाज येऊ नये, यासाठी गोलंदाजही गोलंदाजी करताना दिशा व टप्पा यामध्ये बदल करीत असतो. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक डावाची तीन टप्प्यांत विभागणी होते. १ ते ६ षटकांदरम्यान पॉवर प्ले, ७ ते १५ षटकांदरम्यान मध्य डाव आणि १६ ते २० षटकांदरम्यान डेथ ओव्हर्स. त्यात सहभागी आठ संघ खेळाच्या प्रत्येक विभागात कशा प्रकारची रणनीती वापरतात, याची उत्सुकता आहे. सुरुवातीची सहा षटके गोलंदाजांच्या बचावाची असतात. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असताना तुम्ही त्या वेळी धावगतीवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करता. काही कर्णधार पॉवर प्लेमध्येही आक्रमक क्षेत्ररक्षण सजवून विकेट मिळवण्यास पसंती देतात. पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवाला मिळणे स्वाभाविक झाले आहे. अशा परिस्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीपासून रोखणे महत्त्वाचे ठरते. मधल्या षटकांमध्ये उभय संघ खेळाचे स्वरूप समजून घेण्यास प्रयत्नशील असतात आणि लय मिळवण्याची संधी शोधत असतात. या षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचे लक्ष स्कोअर वाढविण्यावर असते, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा भर धावा रोखण्यावर असतो. या कालावधीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारापुढे केव्हा आक्रमक पवित्रा स्वीकारायचा, याचे आव्हान असते. जर आक्रमक पवित्रा स्वीकारला तर विकेट मिळवता येतात आणि मोठी भागीदारीही संपुष्टात आणता येते. योग्य वेळी आक्रमण झाले तर विजय तुमचा आणि निर्णय चुकला तर पराभव निश्चित असतो. डेथ ओव्हर्स म्हणजे बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे असतात. तेथे वेगाने चाल खेळणे आवश्यक असते. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार करता डेथ ओव्हर्समध्ये पारंपरिक क्रिकेटच्या फटक्यांच्या माध्यमातून धावा वसूल करणे प्रभावी ठरते. गरजेपेक्षा अधिक वेगळा प्रयत्न करून काही चौकार-षटकार वसूल करता येतात, पण त्या प्रयत्नात अधिक डॉट चेंडू खेळले जातात. डावाच्या या टप्प्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा गोलंदाज व कर्णधार यांच्यादरम्यान प्रभावी संवाद असणे आवश्यक ठरते. गोलंदाजी कुठे करायची, हे निश्चित झाल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवता येते. अखेरच्या टप्प्यात फलंदाज बॅट फिरवत असताना रणनीती व योजना कशा अपयशी ठरतात, याबाबत उत्सुकता असते. अखेर प्रत्येक टप्प्याचा विचार केल्यानंतर शेवटी योजना आखणारा आणि दडपणाखालीही त्या यशस्वी करणारा संघ विजयी ठरतो. (टीसीएम)