शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

कसोटी क्रिकेट संपविण्याचे कारस्थान

By admin | Updated: November 29, 2015 01:29 IST

व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय

नवी दिल्ली : व्हीसीएच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीचा अनेक दिग्गजांनी खरपूस समाचार घेतला. माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या खेळपट्टीवर सडकून टीका केलीच, शिवाय अशा खेळपट्टीची मागणी करणारा कर्णधार विराट कोहली आणि विकेट तयार करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही, या शब्दांत धारेवर धरले आहे.भारत-द. आफ्रिका यांच्यात शुक्रवारी संपलेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला अनुकूल होती. स्थानिक संघाला लाभ देण्याच्या हेतूने ती तयार करण्यात आल्याचे वक्तव्य करीत बेदी म्हणाले, ‘चांगल्या आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीची आणि विशेष प्रकारच्या मातीची गरज असते; पण येथे काहीही करण्याची गरज भासली नाही. नागपुरात केवळ विकेट बनवायची म्हणून बनविण्यात आली.’ द. आफ्रिका संघाच्या पडझडीनंतर क्रिकेटविश्वात या खेळपट्टीवर अनेक सवाल उपस्थित झाले होते. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटी क्रिकेटला संपविण्यास पूरक असल्याची टीका करीत ६९ वर्षांचे बेदी पुढे म्हणाले, ‘भारताने द. आफ्रिकेला पराभूत केले, पण त्यात काय अर्थ आहे. आयपीएलने कसोटी क्रिकेटला संपविले. अशा प्रकारच्या खेळपट्ट्या कसोटीला पूर्णपणे संपवीत आहेत. नागपूर कसोटी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती आणि आयसीसीच्या क्रिकेटविषयक समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे सामन्याचे समालोचक होते. स्वत: भारताचा दुसरा डाव १७३ धावांत आटोपला याचा अर्थ काय!’सामन्यात १२ गडी बाद करणारा रविचंद्रन अश्विन याच्याबद्दल बेदी म्हणाले, ‘अश्विन परिपक्वगोलंदाज असल्याने त्याला बळी घेण्यासाठी अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांची गरज नाही. अशा खेळपट्ट्या बनवून तुम्ही अश्विनची प्रतिभा संपवीत आहात. रवींद्र जडेजाला अशा खेळपट्ट्यांची गरज असेल; पण अश्विनला मुळीच नाही.’ कारकिर्दीत ६७ कसोटी आणि दहा वन-डे सामन्यांत डावखुरे फिरकीपटू बेदी यांनी दोन्ही प्रकारांत २७३ गडी बाद केले आहेत. (वृत्तसंस्था)मी लहान तोंडी मोठा घास घेणार नाही. डग्लस जॉर्डिन याने १९३२-३३ मध्ये बॉडी लाईन गोलंदाजी आणली. क्रिकेटविश्वाला त्याला उत्तर देणे भाग पडले. कोहलीला देखील असेच उत्तर द्यावे लागेल. आम्ही कसोटी क्रिकेट संपवीत आहोत. पडद्यामागे ज्यांची यात भूमिका आहे, त्यात कोहलीदेखील तितकाच जबाबदार ठरतो. - बिशनसिंग बेदी, माजी कर्णधार