शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

निवड समितीने अन्याय केल्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडूचा दावा

By प्रसाद लाड | Updated: October 1, 2019 19:30 IST

आंतरराष्ट्रीय खेळाडूला अखिल भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.

मुंबई : मला डावलून निवड समितीने संघ निवडला आहे, असा दावा एका आंतरराष्ट्रीय खेळाडूने केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत हा आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळला होता. या स्पर्धेमधून अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी संघ निवडला जातो. पण या आंतरराष्ट्रीय खेळाडूला अखिल भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाची टग ऑफ वॉर (रस्सीखेच) या खेळाची स्पर्धा झाली. या स्पर्धेत रोहित ठोगल्ला हा आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये योग्यपद्धतीने निवड करण्यात आली नाही, असा दावा रोहितने केला आहे.

याबाबत रोहित म्हणाला की, " या स्पर्धेचा निकाल लावताना निवड समितीने मला डावलले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी सुवर्णपदकाची कमाई केली होती. सध्याच्या घडीला मी अव्वल दर्जाचा अँकर आहे. त्यामुळे या स्पर्धेतून माझी निवड होणे अपेक्षित होते. पण तसे घडले मात्र नाही. या स्पर्धेमध्ये खेळाडूचा स्तर आणि त्याची कामगिरी या दोन गोष्टी पाहायला जातात. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. माझी कामगिरीही चांगली झाली आहे. त्यामुळे माझी निवड न झाल्याने मला हा मोठा धक्का आहे."

याबाबत आम्ही या स्पर्धेच्या निवड समितीचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांच्याशीही संपर्क साधला. याविषयाबाबत म्हात्रे म्हणाले की, " आम्ही निवड समितीने एकमताने चर्चा करून हा संघ निवडला आहे. या स्पर्धेत खेळाडूंची कामगिरी कशी होती, या गोष्टीच्या जोरावरच आम्ही अखिल भारतीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली आहे. त्याबरोबर संघाचे वजन 640 किलो एवढे असावे लागते, यामध्ये संतुलन राखणे ही मोठी कसोटी असते. त्यामुळे एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू जरी असला तरी त्याची कामगिरी कशी झाली आणि तो वजनाच्या कसोटीमध्ये बसतो का, हे पाहणे महत्वाचे असते. मीदेखील एक प्रशिक्षक आहे. माझ्या संघातील खेळाडूंना ही बऱ्याच वेळेला निवडले गेले नाही, त्यासाठी माझ्या खेळाडूंवर अन्याय झाले असे मी कधीही म्हटले नाही."

याबाबत मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक मोहन अम्रुळे म्हणाले की, " मुंबई विद्यापीठ निवड समितीची स्थापना करते. या समितीमध्ये तज्ञही असतात, त्याचबरोबर संघटनेचे सदस्यही असतात. निवड समिती खेळाडूंच्या नावांची आम्हाला शिफारस करते. त्यामुळे संघ निवडीमध्ये आम्हाला काहीही अधिकार नसतो. निवड समिती जे आम्हाला सांगेल, त्याचे आम्ही पालन करत असतो. त्यामुळे हा विषय निवड समितीच्या अखत्यारीत येतो."

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठMumbaiमुंबई