शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

भारत-विंडीज इलेव्हन सामना अनिर्णीत

By admin | Updated: July 12, 2016 03:27 IST

फिरकीपटू अमित मिश्राने अचूक मारा करीत चार बळी घेतले असले तरी वेगवान गोलंदाजांच्या साधारण कामगिरीमुळे भारत आणि वेस्ट इंडिज बोर्ड अध्यक्ष एकादश यांच्या दरम्यान

बासेटेरे : फिरकीपटू अमित मिश्राने अचूक मारा करीत चार बळी घेतले असले तरी वेगवान गोलंदाजांच्या साधारण कामगिरीमुळे भारत आणि वेस्ट इंडिज बोर्ड अध्यक्ष एकादश यांच्या दरम्यानचा दोन दिवसीय सराव सामना अनिर्णीत संपला. शाई होपची नाबाद शतकी खेळी दुसऱ्या व अखेरच्या दिवशी यजमान संघातर्फे ठळक वैशिष्ट्य ठरली. विंडीज बोर्ड अध्यक्ष एकादशने दिवसअखेर ७ बाद २८१ धावांची मजल मारली होती. विंडीजतर्फे सात कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व करणाऱ्या होपने खेळपट्टीवर ३५५ मिनिटे तळ ठोकताना २२९ चेंडू खेळले. त्यात त्याने १५ चौकार ठोकले. भारतातर्फे लेगस्पिनर अमित मिश्राने चमकदार कामगिरी करीत ६७ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याआधी, भारताने ६ बाद २५८ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला होता.रविवारी झालेल्या पावसानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांना अनुकूल स्थितीचा लाभ घेण्याची चांगली संधी होती; पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वर कुमार आणि दुखापतीतून सावरलेला मोहम्मद शमी यांनी चांगली सुरुवात केली; पण त्यांना सातत्य राखता आले नाही. भुवनेश्वरने यजमान संघाचा कर्णधार लियोन जॉन्सनला तंबूचा मार्ग दाखविला. शमीने उजव्या यष्टीबाहेर फलंदाजांना त्रस्त केले. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दिशाहीन मारा केला. कर्णधार विराटने त्यानंतर ईशांत शर्मा व उमेश यादव यांना पाचारण केले. या दोन्ही गोलंदाजांनाही यश मिळाले नाही. उपाहारानंतर मिश्राने चंद्रिकाला बाद केले तर त्यानंतरच्या चेंडूवर जर्मेन ब्लॅकवूड यष्टिचित झाला. मिश्राने चार बळी घेतले. कुमार, शमी व उमेश यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बळीचा विचार करता ईशांतची पाटी कोरीच राहिली.