शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

भारत-पाकिस्तान महायुद्ध! विराटसेना सज्ज

By admin | Updated: June 18, 2017 06:13 IST

अंगात रक्त सळसळत आहे. भावनांवर नियंत्रण राखणे आता आपल्या हातात नाही. भारताला जेतेपदाशिवाय दुसरे काहीच नको. पुन्हा एकदा पाकला हरवायचे आहे

चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तानविरुध्द आज अंतिम लढतलंडन : अंगात रक्त सळसळत आहे. भावनांवर नियंत्रण राखणे आता आपल्या हातात नाही. भारताला जेतेपदाशिवाय दुसरे काहीच नको. पुन्हा एकदा पाकला हरवायचे आहे आणि केवळ हरवायचेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा बचावही करायचा आहे. विराट सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चार वर्षांपूर्वी धोनी सेनेने ‘साहेबांना’ धूळ चारत पटकाविलेली चॅम्पियन्स ट्रॉफी ती कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानने हिसकावून नेता कामा नये, यासासाठी विराट सेनेने कंबर कसली आहे. ४ जूनला विराट सेनेने पाकिस्तानला धूळ चारली होती; पण नियतीने पुन्हा एकदा या दोन शेजाऱ्यांना २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत आमने-सामने आणले आहे. ‘रणांगणा’वर भारताविरुद्ध पाकला वारंवार नामुष्की पत्करावी लागली आहे. ‘रनसंग्रामा’तही कदाचित त्यांची तीच इच्छा असावी. पाकने केवळ नशिबाच्या जोरावर अंतिम फेरीत स्थान मिळविले, तर भारताने कामगिरीच्या जोरावर पात्रता मिळविली. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत पाकिस्तानचा ‘बाप’ आहे आणि आज, रविवारी ‘फादर्स डे’पण आहे. आयसीसी स्पर्धेत भारताने १३ वेळा जेतेपदाचा मान मिळविला, तर पाकिस्तानला केवळ दोनदा अशी कामगिरी करता आली.कामगिरीत सातत्य राखणारा भारतीय संघ आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळेल त्यावेळी सीमेच्या अल्याड-पल्याड घड्याळाचे काटेही थांबलेले असतील आणि चाहत्यांना रंगतदार क्रिकेटची मेजवानी मिळणार असल्याचे निश्चित आहे. उभय देशांदरम्यानचे सध्याच्या राजकीय तणावामुळे क्रिकेटच्या या लढाईमध्ये रंगत निर्माण झालेली आहे. द्विपक्षीय क्रिकेट मालिकेला भारत सरकारची परवानगी न मिळाल्यामुळे उभय संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळत असतात. गतचॅम्पियन भारताने स्पर्धेत पहिल्या लढतीत पाकिस्तानचा पराभव केला होता. कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच स्पष्ट केले की, त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. त्या लढतीनंतर मात्र पाकिस्तानने आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. तसे बघता ही लढत केवळ क्रिकेट कौशल्याची नसून दडपण झुगारणे व मानसिक दृढता या बाबींची भूमिका विशेष महत्त्वाची आहे. सचिन तेंडुलकरने सेंच्युरियनमध्ये ती संस्मरणीय खेळी करीत हिशेब चुकता केला नव्हता तोपर्यंत चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर जावेद मियांदादचा षट्कार वर्षानुवर्षे भारतीय क्रिकेटपटूंच्या हृदयावर आघात करीत होता. दरम्यान, अजय जडेजा, व्यंकटेश प्रसाद, ऋषिकेश कानिटकर किंवा जोगिंदर शर्मा यांनी प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. नवी दिल्लीपासून इस्लामाबादपर्यंत आणि कराचीपासून कोलकातापर्यंत कुठलाही क्रिकेट चाहता आपल्या संघाला पराभूत होताना बघण्यास इच्छुक नसतो. मैदानावरील २२ क्रिकेटपटूंसाठी ही क्रिकेटची एक लढत असेल; पण लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी त्याच्याही पुढे काही असते. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि राशिद लतीफ यांच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. लढत जिंकणाऱ्या संघावर प्रेम व पुरस्कारांचा वर्षाव होईल, तर पराभूत होणाऱ्या संघाला टीकेला सामोरे जावे लागेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कर्णधार विराट कोहलीने म्हटले की, चूक करण्याची संधीच नाही. कामगिरीच्या आधारावर भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तान संघ आसपासही नाही; पण तरी पाक संघ धक्कादायक विजय नोंदविण्यात सक्षम आहे. आज, रविवारच्या लढतीच्या निमित्ताने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकतर्फी ठरलेल्या सलामी लढतीत भारताने १२४ धावांनी विजय मिळविला होता. त्यावेळी अनेकांच्या मते आता भारत-पाक लढतींमध्ये ती रंगत नाही. पाकिस्तान संघाच्या कामगिरीचा आलेख सातत्याने खालावत आहे. (वृत्तसंस्था)भारत विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, उमेश यादव.पाकिस्तानसरफराज अहमद (कर्णधार), अमहद शहजाद, अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद आमिर, रुम्मान रईस, जुनेद खान, इमाद वसीम, फहीम अश्रफ, शादाब खान, फखर जमान, हारिस सोहेस. सामना (भारतीय वेळेनुसार) : दुपारी ३ वाजल्यापासून.