शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

भारत-पाक मालिका श्रीलंकेत?

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका श्रीलंकेत खेळविली जाण्याची आणि त्याची अधिकृत घोषणा २७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका श्रीलंकेत खेळविली जाण्याची आणि त्याची अधिकृत घोषणा २७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.‘बीसीसीआय’ने याआधीच संयुक्त अरब अमिरात येथे खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते, तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळानेदेखील भारतात खेळण्यास नकार व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत दोन्ही देशांदरम्यान श्रीलंकेतील पर्याय उपलब्ध होता.बीसीसीआयच्या उच्च सूत्रानुसार या मालिकेसाठी आता फक्त एक महिना बाकी आहे आणि अशा स्थितीत सुरुवातीचे दोन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२0 सामन्यांऐवजी त्यात फक्त तीन वन-डे आणि दोन टी-२0 सामने होण्याची शक्यता आहे.बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान चेअरमन शशांक मनोहर, पीसीबी अध्यक्ष शहरयार खान व नजम सेठी यांच्यादरम्यान येथे ईसीबीप्रमुख आणि ‘पाकिस्तान टास्क फोर्स’चे चेअरमन जाइल्स क्लार्क यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर मालिका आयोजनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे.सेठी आणि खान यांनी मनोहर यांच्यासोबतची बैठक ‘उपयुक्त’ होती, असे सांगितले होते; मात्र त्यांनी विस्तारात जास्त काही सांगितले नव्हते. त्यामुळे या मालिकेसाठी निर्माण झालेला अडथळा संपला असल्याचे संकेत मिळाले आहेत.सूत्रांनुसार, ‘पीसीबीला अधिकृत घोषणा करण्याआधी नवाज शरीफ यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. शहरयार खान यांना लाहोर येथे जाऊन पंतप्रधानांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पंतप्रधानांकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर ते याविषयी दुबई येथे जाऊन क्लार्क यांना त्यांचा निर्णय सांगतील. क्लार्क २७ नोव्हेंबरला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.’‘पीसीबी’ने श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) यांच्याशी संपर्क केला आणि ते मालिका आयोजित करण्यास इच्छुक आहेत. मालिका दोन स्टेडियमवर खेटरामा (आर. प्रेमदासा स्टेडियम) आणि पल्लेकल (कँडी) येथे होऊ शकते. सध्या श्रीलंकेत पाऊस जोरदार आहे; परंतु डिसेंबरच्या अखेरीस येथे हवामान चांगले राहण्याची शक्यता आहे. खेटरामा येथे काही टी-२0 सामने होणार आहेत; परंतु अधिकृत घोषणेनंतर एसएलसी त्यांचे वेळापत्रक तयार करेल.२00९च्या लाहोर हल्ल्यानंतर पाकिस्तानात खेळण्यास कसोटी खेळणाऱ्या संघांनी नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धा आयोजित करण्याचे स्थळ यूएई बनले आहे.