शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

भारत-पाकिस्तान मालिका लंकेत!

By admin | Updated: November 27, 2015 03:32 IST

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली. ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मुंबईत सात वर्षांपूर्वी केलेल्या हल्ल्याच्या दिवशी म्हणजेच २६/११लाच हा निर्णय झाला, हे विशेष म्हणावे लागेल. लक्षणीय म्हणजे या मालिकेच्या आयोजनाविषयी अंतिम निर्णय होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीदेखील श्रीलंकेत या मालिकेच्या आयोजनासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, ‘भारत-पाक क्रिकेट मालिका अंदाजे १५ डिसेंबरपासून खेळविण्यात येईल. ही मालिका पाच सामन्यांची असेल. या निर्णयावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असून, यामुळे संबंध मजबूत होतील. या मालिकेच्या माध्यमातूनच पुन्हा या दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधाची सुरुवात होईल.’ २००७ सालानंतर या दोन्ही देशांमध्ये कोणतीही मालिका झालेली नसून २००८ साली मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारत - पाक यांच्यातील क्रिकेट संबंध थांबले होते.नियोजित कार्यक्रमानुसार भारत - पाकिस्तान मालिकेमध्ये २ ‘कसोटी’, ५ ‘एकदिवसीय’ आणि २ ‘टी-२०’ सामने खेळविण्यात येणार होते. मात्र वेळेअभावी केवळ मर्यादित षटकांचेच सामने खेळविले जाण्याची शक्यता आहे.आम्हाला भारतात खेळण्यासाठी कोणतीही अडचण नाही. हे पूर्णपणे संघावर अवलंबून आहे की ते दबावाला कसे सामोरे जातात. आम्हाला भारतात खूप प्रेम मिळाले असून, त्यांना आम्हाला खेळताना पाहायचे आहे.- शाहिद आफ्रिदी, पाक क्रिकेटपटूमालिका खेळवली जात आहे हे महत्त्वाचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत - पाक मालिका पुन्हा सुरू होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध खेळणे हे क्रिकेटच्या हिताचे आहे.- वसिम अक्रम, माजी क्रिकेटपटू, पाक