शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान मालिका लंकेत!

By admin | Updated: November 27, 2015 03:32 IST

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष वेधलेल्या प्रस्तावित भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेवर अखेर शिक्कामोर्तब करीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आपली सहमती दर्शवली. ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी मुंबईत सात वर्षांपूर्वी केलेल्या हल्ल्याच्या दिवशी म्हणजेच २६/११लाच हा निर्णय झाला, हे विशेष म्हणावे लागेल. लक्षणीय म्हणजे या मालिकेच्या आयोजनाविषयी अंतिम निर्णय होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनीदेखील श्रीलंकेत या मालिकेच्या आयोजनासाठी हिरवा झेंडा दाखवला होता. संसद परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, ‘भारत-पाक क्रिकेट मालिका अंदाजे १५ डिसेंबरपासून खेळविण्यात येईल. ही मालिका पाच सामन्यांची असेल. या निर्णयावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असून, यामुळे संबंध मजबूत होतील. या मालिकेच्या माध्यमातूनच पुन्हा या दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधाची सुरुवात होईल.’ २००७ सालानंतर या दोन्ही देशांमध्ये कोणतीही मालिका झालेली नसून २००८ साली मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर भारत - पाक यांच्यातील क्रिकेट संबंध थांबले होते.नियोजित कार्यक्रमानुसार भारत - पाकिस्तान मालिकेमध्ये २ ‘कसोटी’, ५ ‘एकदिवसीय’ आणि २ ‘टी-२०’ सामने खेळविण्यात येणार होते. मात्र वेळेअभावी केवळ मर्यादित षटकांचेच सामने खेळविले जाण्याची शक्यता आहे.आम्हाला भारतात खेळण्यासाठी कोणतीही अडचण नाही. हे पूर्णपणे संघावर अवलंबून आहे की ते दबावाला कसे सामोरे जातात. आम्हाला भारतात खूप प्रेम मिळाले असून, त्यांना आम्हाला खेळताना पाहायचे आहे.- शाहिद आफ्रिदी, पाक क्रिकेटपटूमालिका खेळवली जात आहे हे महत्त्वाचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत - पाक मालिका पुन्हा सुरू होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध खेळणे हे क्रिकेटच्या हिताचे आहे.- वसिम अक्रम, माजी क्रिकेटपटू, पाक