शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

भारताचा बांगलादेशवर 'विराट' विजय

By admin | Updated: February 13, 2017 15:22 IST

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकापोठापाठ एक मालिका जिंकत सुटलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचाही दणदणीत पराभव केला.

ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 13 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली एकापोठापाठ एक मालिका जिंकत सुटलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचा दणदणीत पराभव केला. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 208 धावांनी विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम रचला आहे. भारताने दिलेल्या 459 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला. 
 
अखेरच्या दिवशी बांगलादेशसमोर विजयासाठी 459 धावांचे आव्हान होते. रवींद्र जाडेजा, आर. अश्विन यांच्या फिरकीसमोर बांगलादेशचे फलंदाज ढेपाळले. अश्विनने 4 , जाडेजाने 4 तर, इशांत शर्माने 2 गडी बाद केले. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर शाकीब अल हसनच्या रुपाने बांगलादेशला चौथा धक्का बसला. 
 
रवींद्र जाडेजाने त्याला 22 धावांवर चेतेश्वर पूजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर 162 धावांवर कर्णधार मुशाफिकूर रहमानच्या रुपाने बांगलादेशला पाचवा धक्का बसला. त्याने 23 धावा केल्या. अश्विनने जाडेजाकरवी झेलबाद केले. एक बाजू लावून धरणारा महमदुल्लाह 64 धावांवर बाद झाला. त्याला इशांत शर्माने भुवनेश्वर कुमारकरवी झेलबाद केले. साबीर रहमानलाही 22 धावांवर इशांतने पायचीत पकडले. रविवारी चौथ्या दिवसअखेर बांगलादेशच्या 3 बाद 103 धावा झाल्या होत्या.