शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांवरच!

By admin | Updated: January 29, 2017 04:48 IST

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना

- सुनील गावसकर लिहितो...

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. गोलंदाजांकडेही धावांचा बचाव करण्याची संधी कमीच होती.मागच्या वेळी भारताने व्हीसीएवर न्यूझीलंडला सामना गमावला तेव्हा मिशेल सँटनर भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या वेळी खेळपट्टी अधिक चांगली असावी; पण ईडन गार्डन्स कोलकाता तसेच कानपूरच्या ग्रीन पार्कच्या तुलनेत येथे चेंडू अधिकच वळण घेईल, अशीही शक्यता आहे. अशा वेळी पाहुणा संघ आदिल राशीदला संधी देऊ शकतो. भारतीय संघाकडून आॅफ स्पिनर परवेझ रसूलच्या तुलनेत यजुवेंद्र चहल अधिक प्रभावी ठरू शकतो. तो अधिक वेगवान चेंडू टाकत असल्याने तितक्याच लवकर चेंडू वळण घेईल, अशी शक्यता आहे.भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असेल. फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलला नागपुरात मोठी खेळी करून चमक दाखविण्याची संधी असेल. युवराजला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही; पण आपल्या लौकिकानुसार फटकेबाजी करून षटकारांची आतषबाजी करावी इतकी माफक अपेक्षा चाहत्यांना त्याच्याकडून असेल. असे घडल्यास आतापर्यंतचे अपयश पुसून निघेल.कानपूरमधील इंग्लंडचा विजय भारताच्या काळजीत भर पाडणारा ठरला. भारतीय फलंदाजांना कुठलीही संधी न देता प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी जो आक्रमक मारा केला, तो वाखाणण्यासारखा होता. भारतीयांना फटका मारण्याची संधी न देता इंग्लंडने सर्वच फलंदाजांना अलगद जाळ्यात अडकविले. इंग्लंडने कसोटी आणि वन डे मालिका गमावल्यानंतरही अखेरचा वन डे जिंकून आत्मविश्वास मिळविला होता. कानपूरचा सामना जिंकल्याने उत्साहात आणखीच भर पडली. आता इंग्लंड संघ टी-२० मालिका विजयाच्या जवळ पोहोचला आहे. मालिका जिंकल्यास पाहुणा आनंदी होऊन मायदेशी परत जाईल. दुसरीकडे इंग्लंडच्या आशेवर पाणी पाडायचे असेल तर भारतीय खेळाडूंना स्वत:च्या खेळाचा दर्जा उंचवावा लागेल.(पीएमजी)