शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांवरच!

By admin | Updated: January 29, 2017 04:48 IST

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना

- सुनील गावसकर लिहितो...

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. गोलंदाजांकडेही धावांचा बचाव करण्याची संधी कमीच होती.मागच्या वेळी भारताने व्हीसीएवर न्यूझीलंडला सामना गमावला तेव्हा मिशेल सँटनर भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या वेळी खेळपट्टी अधिक चांगली असावी; पण ईडन गार्डन्स कोलकाता तसेच कानपूरच्या ग्रीन पार्कच्या तुलनेत येथे चेंडू अधिकच वळण घेईल, अशीही शक्यता आहे. अशा वेळी पाहुणा संघ आदिल राशीदला संधी देऊ शकतो. भारतीय संघाकडून आॅफ स्पिनर परवेझ रसूलच्या तुलनेत यजुवेंद्र चहल अधिक प्रभावी ठरू शकतो. तो अधिक वेगवान चेंडू टाकत असल्याने तितक्याच लवकर चेंडू वळण घेईल, अशी शक्यता आहे.भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असेल. फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलला नागपुरात मोठी खेळी करून चमक दाखविण्याची संधी असेल. युवराजला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही; पण आपल्या लौकिकानुसार फटकेबाजी करून षटकारांची आतषबाजी करावी इतकी माफक अपेक्षा चाहत्यांना त्याच्याकडून असेल. असे घडल्यास आतापर्यंतचे अपयश पुसून निघेल.कानपूरमधील इंग्लंडचा विजय भारताच्या काळजीत भर पाडणारा ठरला. भारतीय फलंदाजांना कुठलीही संधी न देता प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी जो आक्रमक मारा केला, तो वाखाणण्यासारखा होता. भारतीयांना फटका मारण्याची संधी न देता इंग्लंडने सर्वच फलंदाजांना अलगद जाळ्यात अडकविले. इंग्लंडने कसोटी आणि वन डे मालिका गमावल्यानंतरही अखेरचा वन डे जिंकून आत्मविश्वास मिळविला होता. कानपूरचा सामना जिंकल्याने उत्साहात आणखीच भर पडली. आता इंग्लंड संघ टी-२० मालिका विजयाच्या जवळ पोहोचला आहे. मालिका जिंकल्यास पाहुणा आनंदी होऊन मायदेशी परत जाईल. दुसरीकडे इंग्लंडच्या आशेवर पाणी पाडायचे असेल तर भारतीय खेळाडूंना स्वत:च्या खेळाचा दर्जा उंचवावा लागेल.(पीएमजी)