शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांवरच!

By admin | Updated: January 29, 2017 04:48 IST

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना

- सुनील गावसकर लिहितो...

कानपूरमधील पराभवामुळे भारतीय संघाचे डोळे उघडतील, अशी आशा आहे. पहिल्या टी-२०मध्ये भारतीय फलंदाजांनी सुरुवात तर चांगली केली; पण मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्यांना अपयश आले. गोलंदाजांकडेही धावांचा बचाव करण्याची संधी कमीच होती.मागच्या वेळी भारताने व्हीसीएवर न्यूझीलंडला सामना गमावला तेव्हा मिशेल सँटनर भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला होता. या वेळी खेळपट्टी अधिक चांगली असावी; पण ईडन गार्डन्स कोलकाता तसेच कानपूरच्या ग्रीन पार्कच्या तुलनेत येथे चेंडू अधिकच वळण घेईल, अशीही शक्यता आहे. अशा वेळी पाहुणा संघ आदिल राशीदला संधी देऊ शकतो. भारतीय संघाकडून आॅफ स्पिनर परवेझ रसूलच्या तुलनेत यजुवेंद्र चहल अधिक प्रभावी ठरू शकतो. तो अधिक वेगवान चेंडू टाकत असल्याने तितक्याच लवकर चेंडू वळण घेईल, अशी शक्यता आहे.भारताच्या विजयाची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर असेल. फॉर्ममध्ये नसलेल्या केएल राहुलला नागपुरात मोठी खेळी करून चमक दाखविण्याची संधी असेल. युवराजला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही; पण आपल्या लौकिकानुसार फटकेबाजी करून षटकारांची आतषबाजी करावी इतकी माफक अपेक्षा चाहत्यांना त्याच्याकडून असेल. असे घडल्यास आतापर्यंतचे अपयश पुसून निघेल.कानपूरमधील इंग्लंडचा विजय भारताच्या काळजीत भर पाडणारा ठरला. भारतीय फलंदाजांना कुठलीही संधी न देता प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी जो आक्रमक मारा केला, तो वाखाणण्यासारखा होता. भारतीयांना फटका मारण्याची संधी न देता इंग्लंडने सर्वच फलंदाजांना अलगद जाळ्यात अडकविले. इंग्लंडने कसोटी आणि वन डे मालिका गमावल्यानंतरही अखेरचा वन डे जिंकून आत्मविश्वास मिळविला होता. कानपूरचा सामना जिंकल्याने उत्साहात आणखीच भर पडली. आता इंग्लंड संघ टी-२० मालिका विजयाच्या जवळ पोहोचला आहे. मालिका जिंकल्यास पाहुणा आनंदी होऊन मायदेशी परत जाईल. दुसरीकडे इंग्लंडच्या आशेवर पाणी पाडायचे असेल तर भारतीय खेळाडूंना स्वत:च्या खेळाचा दर्जा उंचवावा लागेल.(पीएमजी)