शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

भारताची दमदार विजयी सलामी

By admin | Updated: January 29, 2016 03:36 IST

मुंबईकर सर्फराज खान व वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देताना आयर्लंडचा ७९ धावांनी

मिरपूर : मुंबईकर सर्फराज खान व वॉशिंग्टन सुंदर यांनी केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देताना आयर्लंडचा ७९ धावांनी धुव्वा उडवला.शेर-ए-बांगला स्टेडियवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडने भारतीयांना प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने भारताची १६.५ षटकांत ४ बाद ५५ अशी अवस्था केली. यानंतर सर्फराज (७४) व वॉशिंग्टन (६२) यांनी भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली. या दोघांच्या जोरावर भारताने ५० षटकांत ९ बाद २६८ धावांची मजल मारली.धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा ४९.१ षटकांत १८९ धावांत खुर्दा उडाला. राहुल बाथम याने ८ षटकांत केवळ १५ धावा देऊन ३ बळी घेतले, तर अवेश खान व महिपाल लोमरोर यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली. झिशान अन्सारीने एक बळी घेतला. भारतीयांनीही आयर्लंडच्या आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पाडताना त्यांची १६.२ षटकांत ४ बाद ४६ अशी अवस्था केली होती. मात्र, लॉर्कन टकर व विल्यम मॅकक्लिंटॉक यांनी ११३ धावांची संथ भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार ईशान किशन, रिषभ पंत, रिकी भुई व अरमान जाफर हे स्वस्तात परतल्याने भारताने ५५ धावांत ४ गडी गमावले. यावेळी भारताला सावरताना सर्फराजने ७० चेंडूंत ७ चौकारांसह ७४ धावा फटकावल्या. त्याला पुरेपूर साथ देताना वॉशिंग्टनने ७१ चेंडूंत ३ चौकारांसह ६२ धावांची संयमी खेळी केली. तसेच, झिशानने ३६ चेंडूंत ३६ धावा काढताना २ चौकार लगावले.