शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

भारताचे लक्ष्य अग्रस्थान

By admin | Updated: September 30, 2016 05:07 IST

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल

कोलकाता : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ शुक्रवारी कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल, त्या वेळी यजमान संघाचे लक्ष्य मालिका विजयासह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याचे राहील.भारताने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात १९७ धावांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. भारत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. ईडन गार्डनवर विजयाला भारतासाठी अधिक महत्त्व आहे. कारण, या विजयामुळे भारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेईल. भारताने मालिका विजय साकारला, तर मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध १० वा मालिका विजय ठरेल. कसोटी मानांकनामध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाच्या तुलनेत भारत एका मानांकन गुणाने पिछाडीवर आहे. पाकिस्तान सध्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. ईडनवर विजय मिळवला, तर भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेईल आणि २७ वर्षीय कर्णधार विराट कोहलीसाठी ही मोठी कामगिरी ठरेल. त्याचप्रमाणे भारताचा हा मायदेशातील २५० वा कसोटी सामना आहे. कानपूरच्या ५०० व्या कसोटीप्रमाणे ही लढतही संस्मरणीय ठरवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील आहे. भारतीय संघाला यंदाच्या मोसमात सर्वांत अधिक कसोटी मालिका खेळायच्या आहेत आणि न्यूझीलंडसारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध विजयाने सुरुवात केली, तर संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)