शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बांगलादेशविरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

By admin | Updated: February 1, 2017 04:59 IST

तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला जवळजवळ सहा वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पाचारण करण्यात आले. बांगलादेशविरुद्ध ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये

नवी दिल्ली : तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला जवळजवळ सहा वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पाचारण करण्यात आले. बांगलादेशविरुद्ध ९ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हैदराबादमध्ये रंगणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मंगळवारी भारताचा १६ सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला. मुकुंदला राखीव सलामीवीर म्हणून संधी मिळाली आहे.संघनिवडीचा विचार करता तमिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदला संघात पाचारण करण्यात आले असून वृद्धिमान साहाने पार्थिव पटेलचे स्थान घेतले.मुकुंदने रणजी ट्रॉफी स्पर्धेत ७०० पेक्षा अधिक धावा फटकावित निवड समितीचे लक्ष वेधले. २०११ मध्ये इंग्लंड व वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर मुकुंदला आता संधी मिळाली. मुकुंदचा अपवाद वगळता संघात विशेष बदल नाही. दुखापतीतून सावरलेले अजिंक्य रहाणे, जयंत यादव, हार्दिक पांड्या यांना संघात स्थान मिळाले आहे. मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, आर. आश्विन, रवींद्र जडेजा अपेक्षेप्रमाणे संघात आहेत. ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार व उमेश यादव वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहेत. अतिरिक्त फिरकीपटू म्हणून मिश्राची निवड करण्यात आली आहे.(वृत्तसंस्था)बैठकीला ६ तास विलंबनिवड समितीची बैठक जवळजवळ सहा तास उशिराने सुरू झाली. बीसीसीआयच्या नव्या प्रशासकांनी (सीओए) सहसचिव अमिताभ चौधरी यांना बैठकीचे संचालन करण्यापासून रोखले. अनेक फोन कॉल्स व ई-मेल्सची आदानप्रदान झाल्यानंतर बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी बैठकीचे संचालन केले.भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अभिनव मुकुंद, हार्दिक पांड्या.