शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

भारताचा लाजिरवाणा पराभव

By admin | Updated: August 18, 2014 02:11 IST

ओल्ड ट्रॅफर्डपाठोपाठ भारतीय संघाने ओव्हलमध्ये पुन्हा तोच पाढा गिरवला. अवघ्या अडीच दिवसांत इंग्लंड गोलंदाजांसमोर भारताचे महारथी ढेपाळले

लंडन : ओल्ड ट्रॅफर्डपाठोपाठ भारतीय संघाने ओव्हलमध्ये पुन्हा तोच पाढा गिरवला. अवघ्या अडीच दिवसांत इंग्लंड गोलंदाजांसमोर भारताचे महारथी ढेपाळले. पाचव्या कसोटीत इंग्लंडने १ डाव व २४४ धावांनी विजय मिळवून मालिका ३-१ अशी जिंकली. डावाने विजय साजरा करण्याची इंग्लंडची ही ९९वी वेळ ठरली, तर सलग दोन डावाने पराभव पत्करण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली. डावाने पराभव टाळण्यासाठी ३३८ धावांचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव इंग्लंडने ९४ धावांवर गुंडाळला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पत्करलेला हा सर्वांत लाजिरवाणा पराभव आहे. यापूर्वी २०११मध्ये बर्मींघॅम कसोटीत धोनीला एक डाव व २४२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर परदेशात २८ कसोटींत धोनीला १४ पराभव पत्करावे लागलेत, या लाजिरवाण्या विक्रमाबरोबर धोनीने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची भंबेरी उडाली होती. देहबोलीतून त्यांनी पराभव पत्करला असल्याचे जाणवत होते. केवळ औपचारिकता म्हणून ते फलंदाजीला आले होते. याच निराशाजनक देहबोलीने त्यांचा घात केला. पाचव्या षटकात अ‍ॅण्डरसनने मुरली विजयला बाद केले आणि भारताच्या डावाला सुरुंग लावला. भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळालेल्या गौतम गंभीरलाही अति घाई नडली. सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. अशा या बाद होण्याने त्याची कसोटी कारकिर्द जवळपास संपुष्टात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यानंतर फॉर्मशी झगडत असलेले चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली काही धडपड दाखवतील अशी अपेक्षाही फोल ठरली. अ‍ॅण्डरसनने टाकलेल्या चेंडूचा अंदाज कदाचित पुजाराला घेता आला नाही आणि तो बटलरच्या हातात झेल देऊन परतला. अजिंक्य रहाणेनेही निराशा केली. तारणहार महेंद्रसिंग धोनीला तर क्रिस वोक्सने भोपळाही फोडू दिला नाही. खराब फॉर्माने कोहलीचा पाठलाग काही सोडला नाही. ५४ चेंडू खेळल्यानंतर कोहली मोठी खेळी करेल असे वाटले होते, परंतु जॉर्डनच्या गोलंदाजीवर त्याने कुकच्या हातात झेल दिला. कोहली गेल्यानंतर भारताच्या उरलेल्या आशाही मावळल्या. स्टुअर्ट बिन्नी वगळता तळाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. जॉर्डनने भारताचे शेपूट गुंडाळले. भारताचा दुसरा डाव ९४ धावांत गुंडाळून इंग्लंडने तिसऱ्याच दिवशी १ डाव व २४४ धावांनी विजय साजरा केला. भारताला दोन्ही डावांत मिळून इंग्लंडच्या ४८६ धावांची निम्मी धावसंख्याही पार करता आली नाही. इंग्लंडकडून जॉर्डनने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, तर अ‍ॅण्डरसन २, ब्रॉड आणि वोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. शतकवीर जो रुट याला ‘सामनावीर’, तर जेम्स अ‍ॅण्डरसन आणि भुवनेश्वर कुमार यांना ‘मालिकावीर’ म्हणून गौरविण्यात आले.