शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

भारताचा लाजिरवाणा पराभव

By admin | Updated: June 19, 2015 02:23 IST

बांगलादेश दौऱ्याच्या माध्यमातून यंदाच्या मोसमाचा श्रीगणेशा करणाऱ्या टीम इंडियाची अखेर पराभवाने सुरुवात झाली. तुलनेने दुबळ्या

मिरपूर : बांगलादेश दौऱ्याच्या माध्यमातून यंदाच्या मोसमाचा श्रीगणेशा करणाऱ्या टीम इंडियाची अखेर पराभवाने सुरुवात झाली. तुलनेने दुबळ्या असलेल्या बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३०७ धावांची मजल मारल्यानंतर बलाढ्य भारताचा डाव केवळ २२८ धावांवर संपुष्टात आणून ७९ धावांनी शानदार बाजी मारली. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. मुस्तफीजूर रहमान याने ५० धावांत ५ बळी घेताना भारतीयांचे कंबरडे मोडले.शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने दिलेल्या ३०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज सुरुवातीपासूनच अडखळताना दिसले. भलेही रोहित शर्मा - शिखर धवन यांनी ९५ धावांची सलामी दिली असली, तरी ते बांगला माऱ्यापुढे अक्षरश: चाचपडत होते. शर्मा - धवन यांचे फटके लागत नसल्याने भारताच्या धावसंख्येला खीळ बसली होती. शर्माने सर्वाधिक ६३ धावांची खेळी करताना भारताकडून अपयशी झुंज दिली. यासाठी त्याने ६८ चेंडूंचा सामना करताना केवळ ४ चौकार व एक षटकार खेचला, तर धवन ३८ चेंडंूत ३ चौकांरासह ३० धावा काढून परतला. भरवशाचा विराट कोहली (१), अजिंक्य रहाणे (९), कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५) स्वस्तात परतल्याने भारताच्या आव्हानातली हवाच निघून गेली. त्यातल्या त्यात सुरेश रैना (४० चेंडंूत ४० धावा) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (४२ चेंडंूत ३२ धावा) यांनी थोडाफार प्रतिकार केल्याने भारताचा पराभव लांबला. तसेच तळाला भुवनेश्वर कुमार (नाबाद २५) आणि मोहित शर्मा (११) यांनी कडवा प्रतिकार केला.रहमान व्यतिरिक्त तस्कीन अहमद आणि शाकीब अल हसन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर, कर्णधार मुशर्रफ मूर्तझा याने एक बळी घेताना बांगलादेशच्या शानदार विजयावर शिक्कामोर्तब केले.तत्पूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार मुशर्रफी मुर्तझाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी योग्य ठरवला. सुरुवातीला त्यांच्या तमीम इक्बाल व सौम्या सरकार यांनी १०२ धावांची भक्कम भागीदारी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे काही काळ खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर बांगलादेशने २३ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट गमावल्या. पण, शकिब (५२), शब्बीर रहमान (४१) व नासिर हुसेन (३४) यांनी बांगलादेशला आव्हानात्मक मजल मारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शाकिब व शब्बीर यांनी पाचव्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. आश्विन भारतातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तमीमने सुरुवातीला भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने यादवच्या एका षटकात ३ चौकार व १ षटकार १८ धावा वसूल केल्या. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या सात षटकांत ५ बळी घेतले; पण बांगलादेशला ३०० धावांत रोखण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)धावफलक..बांगलादेश : तमीम इक्बाल झे. रोहित गो. आश्विन ६०, सौम्या सरकार धावबाद ५४, लिट्टन दास पायचित गो. आश्विन ८, मुशफिकर रहीम झे. रोहित गो. आश्विन १४, शाकीब अल हसन झे. जडेजा गो. उमेश ५२, शब्बीर रहमान त्रि. गो. जडेजा ४१, नासीर हुसेन झे. जडेजा गो. उमेश ३४, मशरफी मुर्तजा झे. रोहित गो. मोहित २१, रुबेल हुसेन झे. मोहित गो. भुवनेश्वर ४, तस्किन अहमद झे. कोहली गो. भुवनेश्वर २, मुस्ताफिजुर रहमान नाबाद ०. अवांतर : १७. एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद ३०७. बाद क्रम : १-१०२, २-१२३, ३-१२९, ४-१४६, ५-२२९, ६-२६७, ७-२८२, ८-२८६, ९-२९८. गोलंदाजी : भुवनेश्वर ७-०-३७-२, उमेश यादव ८-०-५८-२, आश्विन १०-०-५१-३, मोहित ४.४-०-५३-१, रैना १०-०-४०-०, जडेजा ८-०-४८-१, कोहली २-०-१२-०.भारत : रोहित शर्मा झे. मुशर्रफ मूर्तझा गो. मुस्तफिजूर रहमान ६३, शिखर धवन झे. मुशफिकिर रहिम गो. तस्किन अहमद ३०, विराट कोहली झे. मुशफिकिर रहिम गो. तस्किन अहमद १, अजिंक्य रहाणे झे. नासीर हुसेन गो. मुस्तफिजूर रहमान ९, सुरेश रैना त्रि. गो. मुस्तफिजूर रहमान ४०, महेंद्रसिंह धोनी झे. मुशफिकिर रहिम गो. शाकिब अल हसन ५, रवींद्र जडेजा झे. सौम्या सरकार गो. मुस्तफिजूर रहमान ३२, आर. अश्विन झे. मुशफिकिर रहिम गो. मुस्तफिजूर रहमान ०, भुवनेश्र्वर कुमार नाबाद २५, मोहित शर्मा झे. मुशफिकिर रहिम गो. मुशर्रफ मूर्तझा ११, उमेश यादव पायचीत गो. शाकिब अल हसन २; अवांतर : १०; एकूण : ४६ षटकांत सर्वबाद २२८; गोलंदाजी :मुस्तफिजूर रहमान ९.२-१-५०-५, तस्किन अहमद ६-१-२१-२, मुशर्रफ मूर्तझा १०-०-५३-१, रुबेल हुसेन ६-०-३६-०, नासीर हुसेन ६.४-०-३१-०, शाकिब अल हसन ८-०-३३-२