शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

दुसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय

By admin | Updated: January 29, 2016 18:06 IST

दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करत ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करत, ३ सामन्यांची मालिका २-० अशी आघाडी घेत जिंकली आहे. रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाला २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावापर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार फिंचने एकतर्फी लढत दिली. फिंचने ४८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या. कर्णधार फिंच आणि शॉन मार्श यांनी चांगली सलामी दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही, फिंच आणि मार्श यांनी १० षटकात ९८ धावांची भागीदारी केली, पण अश्विनने मार्शला बाद करत कागारूंच्या फलंदाजीला खिंडार पाडले. 
ऑस्ट्रेलियाचे  फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले आणि भारताने सामना २७ धांवानी जिंकला. शॉन मार्श (२३), ख्रिस लिन (२), ग्लेन मॅक्‍सवेल(१), शेन वॉटसन (१५), मॅथ्यू वेड ( नाबाद१६), जेम्स फॉकनर (१०), जॉन हेस्टिंग्ज(४), अँड्रयू टाय (४) धावावर बाद झाले. भारतातर्फे जडेजा आणि बुमरहा यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले, तर अश्विन, युवराज आणि पांड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूत पाठवले.
 
त्यापुर्वी, मालिका वाचविण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी-२० सामन्यात पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला.