शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

दुसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय

By admin | Updated: January 29, 2016 18:06 IST

दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करत ३ सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा २७ धावांनी पराभव करत, ३ सामन्यांची मालिका २-० अशी आघाडी घेत जिंकली आहे. रोहित शर्मा (६०) आणि विराट कोहलीच्या (५९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाला २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावापर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियातर्फे कर्णधार फिंचने एकतर्फी लढत दिली. फिंचने ४८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या. कर्णधार फिंच आणि शॉन मार्श यांनी चांगली सलामी दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही, फिंच आणि मार्श यांनी १० षटकात ९८ धावांची भागीदारी केली, पण अश्विनने मार्शला बाद करत कागारूंच्या फलंदाजीला खिंडार पाडले. 
ऑस्ट्रेलियाचे  फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले आणि भारताने सामना २७ धांवानी जिंकला. शॉन मार्श (२३), ख्रिस लिन (२), ग्लेन मॅक्‍सवेल(१), शेन वॉटसन (१५), मॅथ्यू वेड ( नाबाद१६), जेम्स फॉकनर (१०), जॉन हेस्टिंग्ज(४), अँड्रयू टाय (४) धावावर बाद झाले. भारतातर्फे जडेजा आणि बुमरहा यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले, तर अश्विन, युवराज आणि पांड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला तंबूत पाठवले.
 
त्यापुर्वी, मालिका वाचविण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या. शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी-२० सामन्यात पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला.