शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

भारताची कामगिरी उंचावेल!

By admin | Updated: August 19, 2015 23:18 IST

पहिल्या सामन्यात झालेल्या नाट्यमय पराभवानंतर भारतीय संघ चुकांपासून धडा घेऊन उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कामगिरी उंचावण्यासाठी मैदानात पाऊल ठेवेल

कोलंबो : पहिल्या सामन्यात झालेल्या नाट्यमय पराभवानंतर भारतीय संघ चुकांपासून धडा घेऊन उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत कामगिरी उंचावण्यासाठी मैदानात पाऊल ठेवेल, तर दुसरीकडे श्रीलंका त्यांचा महान फलंदाज कुमार संगकाराला विजयाने निरोप देण्याचा प्रयत्न करील.भारत गॅले येथील पहिल्या कसोटीत वर्चस्व निर्माण केल्यानंतरही ६३ धावांनी पराभूत झाला. आक्रमकतेच्या दृष्टिकोनानंतरही भारतीय खेळाडू आवश्यकतेनुसार फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले.मधल्या फळीतील फलंदाज दिनेश चांदीमलच्या आक्रमक शतकानंतर भारतीय संघाजवळ पर्यायी व्यूहरचनेचा अभाव होता. भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी ठरले. इंग्लंडमध्ये मोईन अली आणि आॅस्ट्रेलियाच्या नाथन लियोनदेखील त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले होते. या दोन दौऱ्यांतील ९ कसोटींत भारतीय फलंदाजांनी दोन फिरकी गोलंदाजांसमोर ४२ विकेट गमावल्या. गॅले कसोटीत १५ बळी हे फिरकी गोलंदाजांनी घेतले. त्यामुळे १० सामन्यांमध्ये भारताचे (बांगलादेशविरुद्ध अनिर्णीत कसोटी सोडून) ५७ फलंदाज फिरकी गोलंदाजीसमोर बाद झाले.पी. साराच्या खेळपट्टीवर उसळी अधिक आहे; परंतु ती फिरकी गोलंदाजीसाठी पोषक असणार आहे. उद्या भारतीय संघाचा फोकस हा निवडीवर असणार आहे. काल सलामीवीर मुरली विजयने नेटवर सहजपणे फलंदाजी केली. त्याने सरावादरम्यान फुटबॉलही खेळला. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. तो जखमी शिखर धवनची जागा घेणार आहे. शिखर धवन जखमी असल्यामुळे पूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही.पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत अपयशी ठरल्यानंतरही रोहित शर्मा संघात खेळणे निश्चित मानले जात आहे आणि तो पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. चेतेश्वर पुजाराही सरावात व्यस्त होता. आता फोकस हा अंतिम अकरा जणांची निवड करण्यावर असणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी पाच गोलंदाजांसह उतरण्याविषयीचा पुनरुच्चार केला आहे; परंतु गॅलेत पाचव्या गोलंदाजाची जबाबदारी ही अव्वल चार गोलंदाजांना रोटेट करण्यासाठी असणार आहे. हरभजनसिंगसारख्या अनुभवी खेळाडूला ही भूमिका पार पाडता आली नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी कमजोर झाली.दुसऱ्या कसोटीच्या उंबरठ्यावर बोलावण्यात आलेला स्टुअर्ट बिन्नीदेखील दुसऱ्या कसोटीत खेळू शकतो. भारतालाही अष्टपैलू खेळाडूची नितांत आवश्यकता आहे; परंतु तो अपेक्षेला खरा उतरतो का, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. कोहलीने आतापर्यंत चार कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे; परंतु त्याला अद्यापही विजयाची चव चाखता आलेली नाही. अ‍ॅडेलमध्ये तो दोनदा पराभूत झाला आणि गॅले येथे विजयानजीक पोहोचूनही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. गेल्या वेळी २०१० मध्ये भारताने येथे श्रीलंकेला पाच गडी राखून पराभूत केले होते. या कसोटीत वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शतक ठोकले होते. त्या वेळेस संघात ईशांत शर्मा, मुरली विजय आणि अमित मिश्रादेखील होते. मिश्राने गॅले येथील कसोटीत ६ षटकांत २० धावा देऊन दोन आणि ६१ धावांत ३ गडी बाद केले.भारत व श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत ३६ कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारताने १४ लढतींमध्ये विजय नोंदविला असून ७ सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्कारावा लागला आहे. १५ सामने अनिर्णित राहिले आहेत.प्रतिस्पर्धी संघ : भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के. एल. राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिधिमान साहा, आर. आश्विन, हरभजनसिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी.श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कौशल सिल्वा, दिमुथ करुणारत्ने, कुमार संगकारा, दिनेश चांदीमल, उपुल थरंगा, जेहान मुबारक, कौशल परेरा, रंगाना हेराथ, दिलरुवान परेरा, थारिंडू कौशल, नुवान प्रदीप, धम्मिका प्रसाद, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामिरा (तंदुरुस्त ठरल्यास).(वृत्तसंस्था)