शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

भारताची मदार विराटच्या खांद्यावर

By admin | Updated: March 16, 2017 23:50 IST

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला झालेली दुखापत गंभीर नसून तो सामन्यात खेळणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 - तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीच्या खांद्याला झालेली दुखापत गंभीर नसून तो सामन्यात खेळणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. आज रात्री उशीरा ट्विट करत बीसीसीआयने ही माहिती दिली. यामध्या त्यांनी असे सांगितले की, विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना उजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीन विराट सावरला आहे. भारतीय फलंदाजीचा कणा असलेला विराट संघात परत आल्यामुळे भारतीयांची चिंता संपली आहे तर कांगारुच्या चिंतेत वाढ झाली असेल. 
 
भारतीय कर्णधार विराट कोहलीला पहिल्या दिवशी उपाहारानंतर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. उजव्या खांद्याला  दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. ४० व्या षटकात डीप मिडविकेटला चौकार रोखण्याच्या प्रयत्नात कोहलीने सूर लगावला. त्या वेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. खांद्याला पकडूनच तो मैदानाबाहेर गेला होता. दुखापतीमुळे कर्णधार विराट मैदानाबाहेर गेल्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कर्णधाराची जबाबदारी सांभाळली.
 
 बॉर्डर-गावस्कर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसरी कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघाचा पर्यत्न असणार आहे. पहिल्या दिवसाखेर  ऑस्ट्रेलिया संघाने कर्णधार स्मिथ आणि मॅक्सवेलच्या दीडशतकी भागीदारीच्या बळावर चार बाद 299 धावा केल्या आहेत.