शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’

By admin | Updated: November 12, 2014 23:47 IST

पाच सामन्यांच्या मालिकेत लंकेकडून अद्याप प्रतिकाराचा सामना न करणा:या ‘टीम इंडिया’चा इरादा उद्या, गुरुवारी चौथा वन डे जिंकून ‘क्लीन स्वीप’ करण्याचा असेल.

वन डे मालिका : श्रीलंकेविरुद्ध चौथा सामना आज 
कोलकाता : पाच सामन्यांच्या मालिकेत लंकेकडून अद्याप प्रतिकाराचा सामना न करणा:या ‘टीम इंडिया’चा इरादा उद्या, गुरुवारी चौथा वन डे जिंकून ‘क्लीन स्वीप’ करण्याचा असेल.
लंकेने गोलंदाजीला धार आणण्यासाठी संघात अजंता मेंडिस याचा समावेश केला आहे. इतकेच नव्हे, तर फलंदाजी सुधारण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांत लाहिरू तिरिमाने आणि दिनेश चांदीमल यांनाही संधी दिली. या खेळाडूंना संघात स्थान देण्यात पाहुण्यांनी उशीर केला, कारण भारताने मालिका 3-क् ने आधीच खिशात घातली. लंकेला आता दोन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. 
भारताने नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या अनुपस्थितीत काही नव्या चेह:यांना संधी दिली. शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांच्या जागी रोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पा यांना संधी दिली. धवनसोबत डावाची सुरुवात रोहित की अजिंक्य रहाणो यापैकी कोण करेल, हा उत्सुकतेचा विषय असेल. रोहितने जखमेतून सावरल्यानंतर संघात स्थान मिळविले. भारत ‘अ’ कडून सराव सामन्यात त्याने 142 धावांची खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा चमकदार खेळ करीत निवडकत्र्याचे लक्ष वेधण्याचे रोहितचे प्रयत्न राहतील. 
धवनने मागच्या सामन्यात विजयात मोठी भूमिका बजावली. त्याने या मालिकेत 283 धावा केल्या. निवडकत्र्यानी त्याला दोन सामन्यांसाठी विश्रंती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितशिवाय फलंदाज आणि पार्टटाईम विकेटकिपर रॉबिन उथप्पा याने संघात स्थान मिळविल्याने फलंदाजी क्रमात कसा बदल होतो, हे पाहावे लागेल. 
लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने आपल्या फलंदाजांना धावा न काढल्याबद्दल चांगलेच धारेवर धरले आहे. कुमार संगकारा, उपुल थरंगा, धम्मिका प्रसाद आणि सूरज रणदिव यांना त्याने बाहेरचा रस्ता दाखवत नवे डावपेच आखले आहेत. मेंडिसच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी भक्कम होणार आहे. भारतीय फलंदाजांनी आतार्पयतच्या सामन्यात लंकेच्या गोलंदाजांची बेमुर्वत पिटाई केली. पण, मेंडिसच्या सोबतीला असलेले तिरिमाने आणि चांदीमल हे किती आवर घालतात हे पाहावे लागेल. जयवर्धने उत्तम फॉर्ममध्ये असून, त्याने मागच्या सामन्यात 124 चेंडूंवर 118 धावा ठोकल्या होत्या. 
भारताच्या गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत उमेश यादव हा अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकला. त्याने तीन सामन्यांत आठ गडी 
बाद केले. डावखुरा अक्षर 
पटेल यानेदेखील आशा पल्लवित केल्या. कर्ण शर्मा, विनय कुमार आणि केदार जाधव यांच्याकडूनही ब:याच आशा आहेत. कर्ण आणि विनय कुमार यांना उद्या संधी मिळू शकते. कर्ण शर्मा याने लेगस्पिनचा करिश्मा दाखवित सलगपणो बळी घेतले आहेत.  ईडनच्या खेळपट्टीवर भारत तीन फिरकी गोलंदाजांना संधी देईल, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था) 
 
4भारत : विराट कोहली कर्णधार, अजिंक्य रहाणो, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, विनयकुमार, स्टुअर्ट बिन्नी, 
कर्ण शर्मा, अक्षर पटेल आणि केदार जाधव.
 
4श्रीलंका : अॅन्जेलो मॅथ्यूज कर्णधार, कुशल परेरा, तिलकर}े दिलशान, लाहिरु तिरिमाने, माहेला जयवर्धने, दिनेश चांदीमल, अशान प्रियांजन, निरोशन डिकलोवा, तिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, लाहिरु गमागे, चतुरंगा डिसिल्व्हा, सकुगे प्रसन्ना, अजंता मेंडिस आणि शमिंडा इरांगा.
 
दोन सामन्यांतही कसर राखणार 
नाही : कोहली
लंकेविरुद्ध अन्य दोन सामन्यांतही कसर राखणार नाही, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने स्पष्ट केले.‘ विश्वचषक पुढे असताना आम्हाला विजयाची सवय लावावी लागेल. आम्ही विजयी लय कायम राखू इच्छितो. लंकेविरुद्ध कुठलीही शिथिलता न बाळगता विजय मिळविणो हे मुख्य उद्दिष्ट असेल,’ असे कोहलीने सांगितले.