शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
3
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
4
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
5
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
6
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
7
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
8
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
9
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
10
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
11
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
12
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
13
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
14
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
15
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
16
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
17
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
18
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
19
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
20
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा प्रबळ दावेदार : प्रसन्ना

By admin | Updated: May 26, 2017 03:32 IST

संतुलित आक्रमणाच्या बळावर भारतीय संघ यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरतो, असे मत महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : संतुलित आक्रमणाच्या बळावर भारतीय संघ यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरतो, असे मत महान फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले आहे.ते म्हणाले, ‘माझ्या मते भारत आणि आॅस्ट्रेलिया हे जेतेपदाचे प्रबळ दावेदार संघ आहेत. हे दोन संघ अंतिम फेरीत दाखल व्हायला हवेत. भारतीय संघात सहा तज्ज्ञ गोलंदाज असल्यामुळे संतुलित मारा आहे. रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा हे २०१३च्या स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करीत भारताला जेतेपद मिळवून देऊ शकतात.’ जडेजाने त्या वेळी १२, तर आश्विनने ८ गडी बाद केले होते.मी कुलदीप यादव यालादेखील संघात पाहू इच्छित होतो. पण, इंग्लंडमध्ये वेगवान माऱ्याची अधिक गरज असल्याचे निवडकर्त्यांना वाटले असावे. त्यामुळे यादवला संघात स्थान मिळाले नसावे. फिरकी गोलंदाजांची २० षटके सामन्यात निर्णायक ठरणार असून, फिरकी गोलंदाजांनी मधल्या टप्प्यात धावा रोखून गडी बाद करायला हवेत. १५ पैकी ९ जण २०१३ च्या विजेत्या संघात होते. हा सर्वांत संतुलित संघ असल्याने चॅम्पियन्सचे जेतेपद कायम राखण्यात मला तरी शंका वाटत नाही, असा विश्वास प्रसन्ना यांनी व्यक्त केला. (वृत्तसंस्था)‘चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयासाठी कटिबद्ध’ लंडन : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने मान्य केले की, क्रिकेट आॅस्ट्रेलियासोबत मानधनाच्या मुद्द्यावरून खेळाडूंचे लक्ष विचलीत झाले आहे. मात्र आता हे प्रकरण मागे टाकून चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा पटकावण्यासाठी ते कटीबद्ध आहे. या वादाचा खेळाडूंवर किती परिणाम झाला, यावर स्मिथ म्हणाला की,‘मी आता माझ्या कामावर लक्ष देणार अहे. मी ज्या पदावर आहे तेथे चांगले खेळणे हे माझे काम आहे. मी प्रत्येक आव्हानासाठी तयार आहे. हा खेळाडूच्या आयुष्याचा भाग असतो.’’चॅम्पियन्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करू: मुर्तझाडब्लिन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर ५ गड्यांनी मिळालेल्या विजयामुळे संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. या स्पर्धेत बांगलादेशाला चांगल्या कामगिरीची आशा असल्याचे या संघाचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा याचे मत आहे. सराव सामन्यातील खेळपट्ट्यांपासून आम्हाला बरेच काही शिकता येईल. अद्याप आमचा एक सराव सामना शिल्लक आहे. भारत आणि पाकविरुद्धच्या सामन्यातूनही बराच बोध घेता येईल. न्यूझीलंडविरुद्धचा सामना कठीण होता, तो आम्ही जिंकला. यामुळे आत्मविश्वास बळावला आहे. आमच्यासाठी पुढील दोन्ही सामने मोठे असल्याचे मुर्तझा म्हणाला.