शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास

By admin | Updated: July 11, 2016 18:33 IST

भारतील विविध खेळांच्या खेळाडूंनी या वर्षी भारतीय आॅलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

काऊंटडाऊन रिओ ऑलिंपिक - २४ डेज टू गो
शिवाजी गोरे
ऑनलाइन लोकमत, पुणे
भारतील विविध खेळांच्या खेळाडूंनी या वर्षी भारतीय आॅलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. १४ खेळांतील १०६ खेळाडूंनी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली पात्रता पूर्ण केली आहे. आतापर्यंतच्या आॅलिम्पिकच्या मागील इतिहासात भारताचा एवढा मोठा संघ कधी सहभागी झाला नव्हता. या आॅलिम्पिकमध्ये किमान २0 पदके मिळावित हे भारतीय क्रीडा मंत्रालय आणि आयओएचे लक्ष्य आहे. भारताचे हे जम्बो पथक त्यात कितपत यशस्वी ठरतेय ते पहावे लागेल.    
ऑलिम्पिक स्पर्धा म्हटले, की क्रीडा क्षेत्रातील जगातला सर्वांत मोठा कुंभमेळा म्हणता येईल. या स्पर्धेत आपल्या देशाकडून प्रतिनिधीत्व करावे, हे सर्व खेळाडूंचे (क्रिकेट सोडून) स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेळाडू जिगरीने प्रयत्न करीत असतो. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. पण तरीसुद्धा काही वेळा त्याला या स्पर्धेत सहभागी होता येत नाही. काही खेळाडू आॅलिम्पिकची पात्रता पूर्ण करीत नाही, तर काही खेळाडू राजकारणास बळी पडले आहेत. पण या वर्षी भारतातील १०६ खेळाडूंनी ऑलिम्पिक महासंघाने दिलेली पात्रता पूर्ण केली आहे. 
यामध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडूने रिओचे तिकीट मिळविले आहे. यापूर्वी २०१२ लंडन आॅलिम्पिकसाठी १३ क्रीडाप्रकारांत ८३, २००८ मध्ये बीजिंगसाठी १२ क्रीडाप्रकारांसाठी ५७, २००४ मध्ये अथेन्ससाठी १४ क्रीडाप्रकारांत ७३, २००० मध्ये सिडनीसाठी ८ क्रीडाप्रकारांत ६५, १९९६ मध्ये अ‍ॅटलांटामध्ये १३ क्रीडाप्रकारांसाठी ४९, तर १९९२ मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५३ खेळाडू पात्र झाले होते. या सर्व स्पर्धांमध्ये लंडन येथे भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य व ४ कांस्यपदके जिंकली होती. बीजिंग येथे एक सुवर्ण (अभिनव बिंद्रा) व दोन कांस्य, अथेन्स येथे एक रौप्य, सिडनी येथे एक कांस्य, अ‍ॅटलांटा येथे एक कांस्यपदक जिंकले होते. 
आॅलिम्पिक महासंघाच्या माहितीनुसार भारताला पहिली दोन रौप्यपदके जिंकून दिली होती. पॅरिस येथे १९०० मध्ये झालेल्या प्राचीन आॅलिम्पिकमध्ये. नॉर्मन प्रिचार्ड यांनी २०० मीटर धावणे व २०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर १९२० मध्ये अ‍ॅन्टवेर्प (बेल्जियम) येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे अ‍ॅथलेटिक्समध्ये पूर्मा बॅनर्जी, पेड्डाप्पा चौघुले व सदाशिव दातार यांच्यासह कुस्तीमध्ये कुमार नवले व रणधीर शिंदे सहभागी झाले होते. 
भारतीय पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९८० दरम्यान ८ सुवर्ण, १ रौप्य व दोन कास्यपदके जिंकली आहे. 
 १९९६ मध्ये भारताच्या लिएंडर पेसने टेनिसमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून दिले. त्यानंतर २००० मध्ये सिडनी येथे भारताची महिला खेळाडू करनाम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. २००४ अथेन्स येथे भारताचा नेमबाजपटू राजवर्धनसिंह राठोडने आपल्या देशाला पुरुषांच्या हबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकून दिले. त्याच्याच पुढच्या वर्षी बीजिंगमध्ये ैअभिनव बिंद्राने पुरुषांच्या १० मी. एअररायफल प्रकारात सुवर्ण, विजेंदरसिंहने मिडलवेट ७५ किलो गटात कांस्य व सुशीलकुमारने पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले. भारतीय खेळाडूंनी प्रथमच एका ऑलिम्पिक स्पर्धेत तीन पदके जिंकली होती. २०१२ मध्ये भारताच्या विजयकुमारने २५ मी., रॅपिड फायर प्रकारात, तर सुशीलकुमारने ६६ किलो फ्रीस्टाईल प्रकारात  रौप्य, गगन नारंगने पुरुषांच्या १० मी. एअररायफल व महिलांच्या गटात सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत मेरी कोमने मुष्टियुद्ध प्रकारात फ्लायवेटमध्ये  योगेश्वर दत्ताने ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. 
आता यावर्षी पुढील महिन्यात रिओमध्ये १४ विविध क्रीडाप्रकारांत भारताचा १०६ खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. पाहू या वेळी भारताला किती पदके मिळतात?