शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास

By admin | Updated: July 11, 2016 18:33 IST

भारतील विविध खेळांच्या खेळाडूंनी या वर्षी भारतीय आॅलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

काऊंटडाऊन रिओ ऑलिंपिक - २४ डेज टू गो
शिवाजी गोरे
ऑनलाइन लोकमत, पुणे
भारतील विविध खेळांच्या खेळाडूंनी या वर्षी भारतीय आॅलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. १४ खेळांतील १०६ खेळाडूंनी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली पात्रता पूर्ण केली आहे. आतापर्यंतच्या आॅलिम्पिकच्या मागील इतिहासात भारताचा एवढा मोठा संघ कधी सहभागी झाला नव्हता. या आॅलिम्पिकमध्ये किमान २0 पदके मिळावित हे भारतीय क्रीडा मंत्रालय आणि आयओएचे लक्ष्य आहे. भारताचे हे जम्बो पथक त्यात कितपत यशस्वी ठरतेय ते पहावे लागेल.    
ऑलिम्पिक स्पर्धा म्हटले, की क्रीडा क्षेत्रातील जगातला सर्वांत मोठा कुंभमेळा म्हणता येईल. या स्पर्धेत आपल्या देशाकडून प्रतिनिधीत्व करावे, हे सर्व खेळाडूंचे (क्रिकेट सोडून) स्वप्न असते आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेळाडू जिगरीने प्रयत्न करीत असतो. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. पण तरीसुद्धा काही वेळा त्याला या स्पर्धेत सहभागी होता येत नाही. काही खेळाडू आॅलिम्पिकची पात्रता पूर्ण करीत नाही, तर काही खेळाडू राजकारणास बळी पडले आहेत. पण या वर्षी भारतातील १०६ खेळाडूंनी ऑलिम्पिक महासंघाने दिलेली पात्रता पूर्ण केली आहे. 
यामध्ये अ‍ॅथलेटिक्स प्रकारात तीन, तर आर्चरीमध्ये एका खेळाडूने रिओचे तिकीट मिळविले आहे. यापूर्वी २०१२ लंडन आॅलिम्पिकसाठी १३ क्रीडाप्रकारांत ८३, २००८ मध्ये बीजिंगसाठी १२ क्रीडाप्रकारांसाठी ५७, २००४ मध्ये अथेन्ससाठी १४ क्रीडाप्रकारांत ७३, २००० मध्ये सिडनीसाठी ८ क्रीडाप्रकारांत ६५, १९९६ मध्ये अ‍ॅटलांटामध्ये १३ क्रीडाप्रकारांसाठी ४९, तर १९९२ मध्ये बार्सिलोना येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५३ खेळाडू पात्र झाले होते. या सर्व स्पर्धांमध्ये लंडन येथे भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य व ४ कांस्यपदके जिंकली होती. बीजिंग येथे एक सुवर्ण (अभिनव बिंद्रा) व दोन कांस्य, अथेन्स येथे एक रौप्य, सिडनी येथे एक कांस्य, अ‍ॅटलांटा येथे एक कांस्यपदक जिंकले होते. 
आॅलिम्पिक महासंघाच्या माहितीनुसार भारताला पहिली दोन रौप्यपदके जिंकून दिली होती. पॅरिस येथे १९०० मध्ये झालेल्या प्राचीन आॅलिम्पिकमध्ये. नॉर्मन प्रिचार्ड यांनी २०० मीटर धावणे व २०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत प्रत्येकी एक रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर १९२० मध्ये अ‍ॅन्टवेर्प (बेल्जियम) येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे अ‍ॅथलेटिक्समध्ये पूर्मा बॅनर्जी, पेड्डाप्पा चौघुले व सदाशिव दातार यांच्यासह कुस्तीमध्ये कुमार नवले व रणधीर शिंदे सहभागी झाले होते. 
भारतीय पुरूष हॉकी संघाने १९२८ ते १९८० दरम्यान ८ सुवर्ण, १ रौप्य व दोन कास्यपदके जिंकली आहे. 
 १९९६ मध्ये भारताच्या लिएंडर पेसने टेनिसमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून दिले. त्यानंतर २००० मध्ये सिडनी येथे भारताची महिला खेळाडू करनाम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. २००४ अथेन्स येथे भारताचा नेमबाजपटू राजवर्धनसिंह राठोडने आपल्या देशाला पुरुषांच्या हबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक जिंकून दिले. त्याच्याच पुढच्या वर्षी बीजिंगमध्ये ैअभिनव बिंद्राने पुरुषांच्या १० मी. एअररायफल प्रकारात सुवर्ण, विजेंदरसिंहने मिडलवेट ७५ किलो गटात कांस्य व सुशीलकुमारने पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले. भारतीय खेळाडूंनी प्रथमच एका ऑलिम्पिक स्पर्धेत तीन पदके जिंकली होती. २०१२ मध्ये भारताच्या विजयकुमारने २५ मी., रॅपिड फायर प्रकारात, तर सुशीलकुमारने ६६ किलो फ्रीस्टाईल प्रकारात  रौप्य, गगन नारंगने पुरुषांच्या १० मी. एअररायफल व महिलांच्या गटात सायना नेहवालने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत मेरी कोमने मुष्टियुद्ध प्रकारात फ्लायवेटमध्ये  योगेश्वर दत्ताने ६० किलो फ्रीस्टाईल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. 
आता यावर्षी पुढील महिन्यात रिओमध्ये १४ विविध क्रीडाप्रकारांत भारताचा १०६ खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. पाहू या वेळी भारताला किती पदके मिळतात?