शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

भारताचा पहिला डाव २१५ धावांवर संपुष्टात

By admin | Published: November 25, 2015 10:31 AM

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारताने ७८.२ षटकात २१५ धावा केल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. २५ - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने ७८.२ षटकात २१५ धावा केल्या आहेत. पहिल्याच दिवशी भारताची परिस्थिती बिकट झाली असून फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. भारताचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर फलंदाजी करण्यास उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर ९ षटकात २ बाद अवघ्या ११ धावा केल्या. स्टियानला शून्य धावेवर आर. अश्विनने झेलबाद केले तर इमरान ताहिरला चार धावांवर जडेजाने बाद केले. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताची सुरूवात तर चांगली झाली पण १५व्या षटकांत धवन अवघ्या १२ धावांवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर मुरली विजय (४०), पुजारा (२१), कोहली (२२), रहाणे (१३), रोहित शर्मा (२) आणि जडेजा (३४) धावांवर बाद झाले.  फलंदाजांच्या हाराकिरीमुळे हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला जोरदार धक्के बसले. शेवटच्या फळीत उतरलेला रविचंद्रन अश्विन १५ धावांवर बाद झाला तर वृद्धिमान साहा ३२ धावांवर धावांवर बाद झाला. त्यामुळे भारताला अवघ्या ७८.२ षटकांत २१५ धावा करता आल्या.  दक्षिण आफ्रिकेतर्फे मॉर्केलने ३, हार्मरने ४ आणि रबाडा, ताहिर व एल्गरने  प्रत्येकी १ बळी टिपला. 

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघाने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर बंगलोर येथे दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णयीत झाला. मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने तीन दिवसांत विजय मिळवला तर बंगलोरमध्ये पहिल्या दिवसानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. त्यामुळे आफ्रिकेसाठी हा तिसरा सामना करो वा मरो असा असून भारतीय संघही दुस-या विजयासाठी उत्सुक आहे.