शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

पाकविरुद्ध भारतच विजयाचा दावेदार : आफ्रिदी

By admin | Updated: June 3, 2017 01:00 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रंगतदार लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ

चॅम्पियन्स ट्रॉफीत रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रंगतदार लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत पाकचा अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याने व्यक्त केले. आयसीसीसाठी लिहिलेल्या स्तंभात आफ्रिदी म्हणाला, ‘पाकिस्तानी नागरिक या नात्याने माझ्या संघाने सर्वच संघांना पराभूत करावे अशी मनोमन इच्छा आहे. भारतावर विजय तर नोंदवायलाच हवा. पण अलीकडची कामगिरी आणि भारतीय संघातील ताकद पाहता भारताचे पारडे या लढतीत जड असेल.पाकिस्तानी गोलंदाजांना भारताच्या बलाढ्य फलंदाजीपुढे उच्च दर्जाचा मारा करावा लागेल. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय फलंदाजी भक्कम आहे. कोहलीने स्वत: वन डे क्रिकेटमध्ये अविस्मरणीय खेळी केली आहे. २०१२ च्या आशिया चषकात विराटने आमच्याविरुद्ध शतक झळकविले तसेच २०१५ च्या आयसीसी विश्वचषकातही अ‍ॅडिलेड सामन्यात विराटने आमच्याविरुद्ध मोठी खेळी केली. माझ्या मते कोहलीला गोलंदाजी करणे आव्हान आहे. पाकिस्तानने कोहलीला लवकर बाद केल्यास भारतीय संघाला कमी धावांवर रोखण्याचे डावपेच यशस्वी होऊ शकतात.’ भारतीय संघाकडे फलंदाजीसारखीच भेदक गोलंदाजी असल्याचे सांगून आफ्रिदी पुढे म्हणाला, ‘फलंदाजी ही भारताची पारंपरिक ताकद असली तरी गोलंदाजीदेखील भेदक आहेच. अश्विनसारखा ‘मॅचविनर’ संघात आहे. त्याच्या माऱ्यापुढे सर्वोत्कृष्ट फलंदाज नांगी टाकू शकतात. जडेजा अलीकडे भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण गोलंदाज बनला. इंग्लंडमधील हवामान फिरकीला साथ देणारे नसेलही पण या दोघांकडे फलंदाजांना धावा घेण्यापासून रोखण्याची ताकद आहे. भुवनेश्वर, मोहम्मद शमी, युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह हे वेगवान माऱ्यात तरबेज आहेत.’