शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कॅरेबियन भूमीत कामगिरी सुधारण्याचा भारताचा प्रयत्न

By admin | Updated: July 8, 2016 19:22 IST

वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या १५ कसोटीत आठ विजय नोंदविणाऱ्या आणि सात सामने ड्रॉ खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघापुढे २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयासह कामगिरीत सुधारणा

बासेटेरे : वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या १५ कसोटीत आठ विजय नोंदविणाऱ्या आणि सात सामने ड्रॉ खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघापुढे २१ जुलैपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयासह कामगिरीत सुधारणा करण्याचे आव्हान असेल.भारत- विंडीज यांच्यात आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले गेले. त्यात १६ जिंकले तर ३० सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. ४४ सामने अनिर्णित राहिले. गेल्या काही वर्षांपासून विंडीज संघ बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे.

तेव्हापासून भारताने विंडीजवर वर्चस्वदेखील राखले. भारताने मागच्या पाच मालिका जिंकल्या असून त्यातील दोन मालिका विंडीजमध्ये खेळविण्यात आल्या होत्या. विंडीजकडे स्टार खेळाडूंचा अभाव असल्याने विराटच्या नेतृत्वाखालील भारताला रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्याची नामी संधी असेल. कॅरेबियन भूमीत भारत ४५ सामने खेळला आणि पाच सामने जिंकले. १६ सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पहावे लागले.

यंदा कुंबळे यांचा अनुभव आणि विराटच्या युवा संघातील खुमखुमीच्या बळावर भारतीय संघ विंडीजला विंडीजमध्ये धूळ चारण्याची आतुरतेने वाट पाहात आहे. चारपैकी किमान तीन सामने भारतीय संघाने जिंकावेत अशी चाहत्यांना अपेक्षाआहे.