शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

भारताचे वर्चस्व

By admin | Updated: September 1, 2015 00:16 IST

तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची भारताने दुसऱ्या डावात सोमवारी चौथ्या

कोलंबो : तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे विजयासाठी ३८६ धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेची भारताने दुसऱ्या डावात सोमवारी चौथ्या दिवसअखेर ३ बाद ६७ अशी अवस्था करून २२ वर्षांनंतर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली. पहिल्या डावात १११ धावांची आघाडी मिळविणाऱ्या भारताचा दुसरा डाव २७४ धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला लक्ष्य गाठण्यासाठी अद्याप ३१९ धावांची गरज असून, त्यांच्या ७ विकेट शिल्लक आहेत. भारतापुढे मालिका विजय साकारण्यासाठी अखेरच्या दिवशी ७ विकेट घेण्याचे लक्ष्य आहे. भारताने यापूर्वी श्रीलंकेत १९९३मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. सध्या सुरू असलेल्या मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरीत आहेत. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीला पुन्हा एकदा धक्का दिला. उजव्या यष्टीबाहेर मारा करण्याचा भारतीय गोलंदाजांना लाभ मिळाला. श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज उपुल थरंगा (०), दिमुथ करुणारत्ने (०) आणि दिनेश चांदीमल (१८) माघारी परतले आहेत. आजचा खेळ थांबविण्यात आला त्या वेळी सलामीवीर कौशल सिल्वा (२४) याला कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (२२) साथ देत होता. ईशांत शर्माने आतापर्यंत १४ धावांच्या मोबदल्यात २,तर उमेश यादवने ३२ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला आहे. ईशांतने पहिल्याच षटकात थरंगाला तंबूचा मार्ग दाखविला, तर त्यानंतर यादवने करुणारत्नेला यष्टिरक्षक ओझाकडे झेल देण्यास भाग पाडले. श्रीलंकेची दुसऱ्या डावात २ बाद २ अशी अवस्था झाली होती. ईशांतने चांदीमलला माघारी परतवून श्रीलंकेची ३ बाद २१ अशी स्थिती केली. त्यानंतर सिल्वा आणि मॅथ्यूज यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. भारतीय गोलंदाज मंगळवारी सकाळच्या सत्रात झटपट बळी घेण्यासाठी प्रयत्नशील असतील; पण त्यासाठी वातावरण चांगले राहील, अशी प्रार्थना करावी लागेल. हवामान खात्याने मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याआधी, आज सकाळी ३ बाद २१ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताने दमदार मजल मारली. रोहित व कोहली यांनी सकाळच्या सत्रात दडपण न बाळगता फलंदाजी करताना चौथ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. नुवान प्रदीपने कोहलीला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नीने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. रोहितने त्याच्यासोबत ५० धावांची भागीदारी केली. वैयक्तिक अर्धशतक झळकावल्यानंतर उपाहारापूर्वी रोहित आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी भारताची ५ बाद १३२ अशी स्थिती होती. त्यानंतर बिन्नी व ओझा यांनी सहाव्या विकेटसाठी ४२ धावांची, तर मिश्रा व आश्विन यांनी आठव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. बिन्नी वैयक्तिक २५ धावांवर असताना हेराथच्या गोलंदाजीवर परेराने यष्टिचित करण्याची संधी गमावली. बिन्नी ४९ धावा काढून बाद झाला. मिश्राला बदली क्षेत्ररक्षक मुबारकने जीवदान दिले. ओझा आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात हेराथचा बळी ठरला. मिश्रा धावबाद झाला. आश्विनने आक्रमक फलंदाजी करताना कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. आश्विनला प्रसादने माघारी परतवत भारताचा दुसरा डाव गुंडाळला. (वृत्तसंस्था)धावफलकभारत पहिला डाव ३१२. श्रीलंका पहिला डाव २०१. भारत दुसरा डाव : चेतेश्वर पुजारा त्रि. गो. प्रसाद ०, लोकेश राहुल त्रि. गो. प्रदीप २, अजिंक्य रहाणे पायचित गो. प्रदीप ४, विराट कोहली झे. थरंगा गो. प्रदीप २१, रोहित शर्मा झे. प्रदीप गो. प्रसाद ५०, स्टुअर्ट बिन्नी झे. थरंगा गो. प्रसाद ४९, नमन ओझा झे. करुणारत्ने गो. हेराथ ३५, अमित मिश्रा धावबाद ३९, रविचंद्रन आश्विन झे. परेरा गो. प्रसाद ५८, उमेश यादव झे. हेराथ गो. प्रदीप ४, ईशांत शर्मा नाबाद २. अवांतर : १०. एकूण ७६ षटकांत सर्व बाद २७४. बाद क्रम : १-०, २-२, ३-७, ४-६४, ५-११८, ६-१६०, ७-१७९, ८-२३४, ९-२६९. गोलंदाजी : धम्मिका प्रसाद १९-३-६९-४, नुवान प्रदीप १७-२-६२-४, रंगाना हेराथ २२-०-८९-१, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज ६-३-११-०, तारिंदू कौशल १२-२-४१-०.श्रीलंका दुसरा डाव उपुल थरंगा झे. ओझा गो. ईशांत ०, कौशल सिल्वा खेळत आहे २४, दिमुथ करुणारत्ने झे. ओझा गो. उमेश ०, दिनेश चांदीमल झे. कोहली गो. ईशांत १८, अँजेलो मॅथ्यूज खेळत आहे २२. अवांतर : ३. एकूण १८.१ षटकांत ३ बाद ६७. बाद क्रम : १-१, २-२, ३-२१. गोलंदाजी : ईशांत ७-२-१४-२, यादव ५-१-३२-१, बिन्नी ४-१-१३-०, मिश्रा २-०-२-०, आश्विन ०.१-०-४-०.