शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 22:41 IST

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ९ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा कापूगेदेरा यांनी संघाला सावरत चागंली फलंदाजी केल्यामुळे संघाच्या धाव संख्येत भर पडली. कर्णधार दिनेश चंदिमलने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या, तर चामरा कापूगेदेराने २६ चेंडूत चार चौकार लगावत २५ धावा केल्या.  भारताने दिलेले १०१ धावांने आव्हान श्रीलंकेने पाच गडी राखून १८ षटकात पूर्ण केले. 

सुरुवातीला भारताने १८.५ षटकात सर्वबाद १०१ धावा केल्या. भारताकडून आर. आश्विन ३१ धावांवर नाबाद राहिला. त्याने एकतर्फी लढा देत बारताचा शंभरी ओलांढून दिली. भारतातर्फे मुंबईकर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तसेच शिखर धवन ३५ धावांतच तंबुत परतले. श्रीलंकन गोलंदाज कासुन रजिताने रोहितला दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतवले. तर शिखर धवन (9 धावा) आणि अजिंक्‍य रहाणे (4 धावा) यांनाही कसूननेच टिपले. महेंद्रसिंह धोनी (२), हार्दिक पंड्या (२), रवींद्र जडेजा (६), सुरेश रैना (२०), युवराज सिंग(१०), आशिष नेहरा(६) जसप्रित बुमराह (०) धावांचे योगदान दिले. 

श्रीलंकेच्या कासुन रजिता आणि दासुन शनाका यांनी भारताच्या ३ फलंदाजानां बाद करत भारताची आघाडीची फळी उद्वस्त केली. तर दुशमंथा चामिराने २ आणि सचित्रा सेनानायकेने १ गडी बाद केला. 
दरम्यान, टी-२० च्या विश्वविजेत्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज सुरुवात झाली. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवरील मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकन गोलंदाजांनीही आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांना लवकरच तंबुत परतवले. 
मागील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, रंगना हेराथ, नुवान कुलशेखरा, तिलकरत्ने दिलशान यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेला मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ कमकुवत मानला जात होता.