शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 22:41 IST

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ९ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा कापूगेदेरा यांनी संघाला सावरत चागंली फलंदाजी केल्यामुळे संघाच्या धाव संख्येत भर पडली. कर्णधार दिनेश चंदिमलने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या, तर चामरा कापूगेदेराने २६ चेंडूत चार चौकार लगावत २५ धावा केल्या.  भारताने दिलेले १०१ धावांने आव्हान श्रीलंकेने पाच गडी राखून १८ षटकात पूर्ण केले. 

सुरुवातीला भारताने १८.५ षटकात सर्वबाद १०१ धावा केल्या. भारताकडून आर. आश्विन ३१ धावांवर नाबाद राहिला. त्याने एकतर्फी लढा देत बारताचा शंभरी ओलांढून दिली. भारतातर्फे मुंबईकर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तसेच शिखर धवन ३५ धावांतच तंबुत परतले. श्रीलंकन गोलंदाज कासुन रजिताने रोहितला दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतवले. तर शिखर धवन (9 धावा) आणि अजिंक्‍य रहाणे (4 धावा) यांनाही कसूननेच टिपले. महेंद्रसिंह धोनी (२), हार्दिक पंड्या (२), रवींद्र जडेजा (६), सुरेश रैना (२०), युवराज सिंग(१०), आशिष नेहरा(६) जसप्रित बुमराह (०) धावांचे योगदान दिले. 

श्रीलंकेच्या कासुन रजिता आणि दासुन शनाका यांनी भारताच्या ३ फलंदाजानां बाद करत भारताची आघाडीची फळी उद्वस्त केली. तर दुशमंथा चामिराने २ आणि सचित्रा सेनानायकेने १ गडी बाद केला. 
दरम्यान, टी-२० च्या विश्वविजेत्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज सुरुवात झाली. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवरील मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकन गोलंदाजांनीही आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांना लवकरच तंबुत परतवले. 
मागील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, रंगना हेराथ, नुवान कुलशेखरा, तिलकरत्ने दिलशान यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेला मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ कमकुवत मानला जात होता.