शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 22:41 IST

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ९ - भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच टी-२० सामन्यात श्रीलंकेने भारताचा ५ विकेट्सनी पराभव केला. सुरुवातीला खराब फलंदाजी झालेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंदिमल आणि चामरा कापूगेदेरा यांनी संघाला सावरत चागंली फलंदाजी केल्यामुळे संघाच्या धाव संख्येत भर पडली. कर्णधार दिनेश चंदिमलने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या, तर चामरा कापूगेदेराने २६ चेंडूत चार चौकार लगावत २५ धावा केल्या.  भारताने दिलेले १०१ धावांने आव्हान श्रीलंकेने पाच गडी राखून १८ षटकात पूर्ण केले. 

सुरुवातीला भारताने १८.५ षटकात सर्वबाद १०१ धावा केल्या. भारताकडून आर. आश्विन ३१ धावांवर नाबाद राहिला. त्याने एकतर्फी लढा देत बारताचा शंभरी ओलांढून दिली. भारतातर्फे मुंबईकर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तसेच शिखर धवन ३५ धावांतच तंबुत परतले. श्रीलंकन गोलंदाज कासुन रजिताने रोहितला दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतवले. तर शिखर धवन (9 धावा) आणि अजिंक्‍य रहाणे (4 धावा) यांनाही कसूननेच टिपले. महेंद्रसिंह धोनी (२), हार्दिक पंड्या (२), रवींद्र जडेजा (६), सुरेश रैना (२०), युवराज सिंग(१०), आशिष नेहरा(६) जसप्रित बुमराह (०) धावांचे योगदान दिले. 

श्रीलंकेच्या कासुन रजिता आणि दासुन शनाका यांनी भारताच्या ३ फलंदाजानां बाद करत भारताची आघाडीची फळी उद्वस्त केली. तर दुशमंथा चामिराने २ आणि सचित्रा सेनानायकेने १ गडी बाद केला. 
दरम्यान, टी-२० च्या विश्वविजेत्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आज सुरुवात झाली. पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवरील मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकन गोलंदाजांनीही आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांना लवकरच तंबुत परतवले. 
मागील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, रंगना हेराथ, नुवान कुलशेखरा, तिलकरत्ने दिलशान यांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेला मैदानात उतरावे लागणार आहे. त्यामुळे श्रीलंकेचा संघ कमकुवत मानला जात होता.