शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

भारताला विजयाच्या 'हॅट्ट्रिक'ची संधी

By admin | Updated: July 7, 2016 19:08 IST

दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधू

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. ७  : दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात आणि नवे कोच अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनात वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेला भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधू इच्छितो.भारताने १९५३ पासून विंडीजमध्ये ४५ कसोटी सामने खेळले. त्यात पाच जिंकले, १६ हरले आणि २४ सामने अनिर्णीत राहिले. भारत विंडीज यांच्यात १९४८ पासून आतापर्यंत एकूण ९० कसोटी सामने झाले. त्यात १६ भारताने आणि ३० सामने विंडीजने जिंकले तर ४४ सामने अनिर्णीत राहिले. भारत सध्या विंडीजमध्ये चार सामने खेळणार आहे. या सामन्यांसह भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या ४९९ होणार आहे.

भारताने पहिल्यांदा १९५२-५३ साली विंडीजचा दौरा केला. तेव्हापासून कॅरेबियन भूमीत दहा मालिका खेळल्या आहेत. त्यातील तीन जिंकल्या आणि सात गमविल्या. मागच्या दोन्ही मालिका मात्र भारताने जिंकल्या. सध्याची मालिका खिशात घातल्यास मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधली जाईल. टीम इंडियाने विंडीजमध्ये २००६ साली चार सामन्यांची मालिका १-० ने आणि २०११ मध्ये तीन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती. त्याआधी भारतीय संघाने अजीत वाडेकर यांच्या नेतृत्वात १९७१ मध्ये पाच सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली होती.

२००६ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व राहुल द्रविडकडे आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीकडे होते. १९७५-७६मधील चार सामन्यांच्या मालिकेत तसेच २००२ च्या पाच सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी एक सामना भारताने जिंकला होता. १९७१ च्या ६ ते १० मार्च या कालावधीत झालेल्या पोर्ट आॅफ स्पेनच्या दुसऱ्या कसोटीत भारत सात गड्यांनी जिंकला. याच सामन्यात महान सुनील गावस्करचे पदार्पण झाले. आॅफ स्पिनर श्रीनिवास व्यंकटराघवन यांनी दुसऱ्या डावात ९५ धावांत पाच बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. मालिकेतील चार सामने अनिर्णीत संपले.

१९७५-७६ मध्ये पोर्ट आॅफ स्पेनच्या तिसऱ्या कसोटीत ४०३ धावांचे लक्ष्य गाठताना ४ बाद ४०६ धावा करीत विजय साजरा केला. गावस्कर १०२, गुंडप्पा विश्वनाथ ११२, मोहिंदर अमरनाथ ८५ आणि बृजेश पटेलने नाबाद ४९ धावांचे विजयात योगदान दिले.या ऐतिहासिक विजयाच्या २७ वर्षानंतर २००२ मध्ये भारताला पोर्ट आॅफ स्पेनमध्ये सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात ३७ धावांनी तिसरा विजय नोंदविता आला. पहिल्या डावात सचिनने शानदार ११७ तर गांगुली आणि लक्ष्मण यांनी दुसऱ्या डावात क्रमश: ७५ आणि ७४ धावा ठोकल्या. लक्ष्मणने पहिल्या डावातही नाबाद ६९ धावांचे योगदान दिले. जवागल श्रीनाथ आणि आशिष नेहरा यांनी

प्रत्येकी तीन गडी बाद करीत भारताचा शानदार विजय साकार केला. २००६ मध्ये किंग्स्टनच्या सबिना पार्कमध्ये भारताने ४९ धावांनी विजय साजरा केला. कर्णधार द्रविडने पहिल्या डावात ८१ आणि दुसऱ्या डावात ६८ धावा केल्या. सध्याचे कोच अनिल कुंबळे यांनी दुसऱ्या डावात ७८ धावांत सहा गडी बाद केले. त्याआधी हरभजनने १३ धावांत अर्धा संघ बाद केला होता.२०११ मध्ये सबिना पार्कवर धोनीच्या नेतृत्वात भारताने ६३ धावांनी विजय नोंदविला. रैनाने पहिल्या डावात ८२ आणि द्रविडने दुसऱ्या डावात ११२ धावा ठोकल्या. प्रवीण कुमार आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी सहा बळी घेत सामना फिरविला होता. याच सामन्यात सध्याचा कर्णधार विराट कोहली याने कसोटी पदार्पण केले. पाचव्या स्थानावर आलेल्या विराटने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात १५ धावा केल्या. कर्णधार या नात्याने पाच वर्षानंतर मालिका जिंकण्याची जबाबदारी विराटच्याच खांद्यावर आली. तो कसा विजय खेचून आणतो, याकडे लक्ष लागले आहे.